शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेने गाठला ९१ टक्क्यांचा पल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 6:35 PM

आता ३१ मार्चपर्यंत डेडलाईन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमार्चपर्यंत डेडलाईन १५६९ गावांत काम केल्याची माहिती 

औरंगाबाद : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी निवडलेल्या १५६९ गावांमध्ये जानेवारी २०२० अखेरपर्यंत ९१ टक्के  काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे. कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबरअखेरची डेडलाईन होती. आता ३१ मार्चपर्यंत डेडलाईन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

या वर्षामध्ये २२ हजार ४१५ कामांपैकी आतापर्यंत २० हजार ३२४ कामे पूर्ण झाली असून, २ हजार ९१ कामे अपूर्ण आहेत. आतापर्यंत हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर लातूर जिल्ह्यात सर्वात कमी कामे झाली आहेत.

५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार या योजनेचा अंमलबजावणी कालावधी डिसेंबर २०१९ पर्यंतचा होता. २०१८-१९ पर्यंत निवडलेल्या गावांतील कामे पूर्ण करण्यास डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता मार्च २०२० पर्यंत या कामांना मुदतवाढ मिळण्याचा अंदाज आहे. विभागात ९१.१४ टक्के  कामे पूर्ण झाल्याचा दावा अहवालानुसार प्रशासन करीत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणी