शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मराठवाड्यात रबी पेरणीत बीड अव्वल, तर औरंगाबाद पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 13:01 IST

६ लाख ६४ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ लाख ६६ हजार ८५० हेक्टरवर रबी पेरणी पूर्ण

ठळक मुद्देविभागात ७० टक्के पेरण्या पूर्णऔरंगाबादमध्ये गहू, हरभऱ्याची पेरणी अधिक

औरंगाबाद : बीड, जालना, औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यांत ७० टक्के रबी पीकपेरणी पूर्ण झाली आहे. त्यात बीड जिल्ह्यात ९६ टक्के पेरणी झाली असून, जालना जिल्ह्यात ६३ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात ४२ टक्के पेरणी झाल्याची नोंद विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात झाली आहे. 

६ लाख ६४ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ लाख ६६ हजार ८५० हेक्टरवर रबी तृणधान्य, कडधान्ये, गळीत धान्याची ७० टक्के लागवड पूर्ण झाली असून, पेरणीत बीड जिल्हा अव्वल असून, औरंगाबाद पिछाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.जालना जिल्ह्यात रबी ज्वारी ५२ हजार १९४, गहू १८ हजार ३५३, मका ५ हजार ३१२, हरभरा ३३ हजार २५२ हेक्टरवर पेरणी झाली. बीड जिल्ह्यात रबी ज्वारी १ लाख ४३ हजार ७१७, गहू १९ हजार ५२८, मका २ हजार २८२, हरभरा १ लाख ४ हजार ७६ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यात रबी ज्वारी २३ हजार ३११, गहू ३० हजार २३, मका १३ हजार ९५१, हरभरा १९ हजार ५६८ हेक्टरवर लागवड झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यात रबीचे सरासरी २ लाख ८ हजारपैकी ८७ हजार २६३ हेक्टर, जालना जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ३६८ पैकी १ लाख ९ हजार ७७१ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात २ लाख ८१ हजार ४८० हेक्टरपैकी २ लाख ६९ हजार ८१६ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली. बीडमध्ये अनुक्रमे रबी ज्वारी, हरभरा, गव्हाच्या क्षेत्रावर, जालना जिल्ह्यातही बीड सारखेच प्रमाण असून, औरंगाबादमध्ये गहू, हरभऱ्याची पेरणी अधिक असून, मक्याचे क्षेत्र सरासरीच्या दीडपट वाढले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा