शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

...तर मराठीही हिंदीची उपभाषा होईल; सुधीर रसाळ यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:01 IST

मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांचे जपवणूक करणे मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

ठळक मुद्देपरराज्यातून कोणी येते तेव्हा त्यांना आधी मराठी भाषा शिकवावीहिंदी भाषेचे प्रादेशिक भाषेवर होत आहे आक्रमण

औरंगाबाद : भारतामध्ये कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा करण्याच्या पात्रतेची नाही. हिंदी भाषा बोलणारे अधिक आहेत, एवढा एकच मुद्दा आहे; पण तेवढ्यासाठी हिंदी राष्ट्रभाषा करून सर्वांवर लादावी हे लोकशाहीच्या विरोधात आहे. हिंदीचे मराठीवरचे आक्रमण असेच चालू राहिले, तर काही वर्षांनंतर मराठी भाषा स्वत:चे अस्तित्व गमावून बसेल आणि भोजपुरीप्रमाणे हिंदीची एक उपभाषा होऊन जाईल, अशा शब्दांत डॉ. सुधीर रसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना ‘मराठी वाचवा’ अभियानाबाबत मत व्यक्त केले.

नुकत्याच मांडलेल्या शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीची करावी या प्रस्तावाला विरोध केला. मराठी संवर्धनाविषयी बोलताना ते म्हणाले की, हिंदी भाषा ही आर्य कुळातल्या मराठी, गुजराती यांसारख्या प्रादेशिक भाषांवर आक्रमण करत आहे. मराठी भाषा अलीकडच्या काळात हिंदीच्या संपर्कामुळे विकृत होत आहे. जेव्हा एकाच कुळातल्या दोन भाषा एकत्र येऊ लागतात, तेव्हा जर एका भाषेचे वर्चस्व स्वीकारले गेले तर आपोआपच दुसरी मूळ भाषा नष्ट होऊ लागते, हे सध्या मराठीच्या बाबतीत होऊ पाहत आहे. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य या गोष्टींची जपवणूक करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. 

अमेरिकेत गेल्यावर प्रत्येक परभाषीय व्यक्तीला सर्वात आधी अमेरिकन इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही जेव्हा परराज्यातून कोणी येते तेव्हा त्यांना आधी मराठी भाषा शिकवून मगच वर्गात प्रवेश दिला पाहिजे. महाराष्ट्रात तर शिक्षणाचे माध्यम हे मराठीच पाहिजे. शालेय पातळीवर मराठी हीच प्रमुख भाषा असली पाहिजे. याशिवाय महाराष्ट्रात जर स्वत:चे स्वतंत्र बोर्ड आहे, तर मग इतर बोर्डांना येथे प्रवेश का द्यावा? या बोर्डांना महाराष्ट्रात प्रवेश मिळणे, हे देखील मराठी मुलांवर अप्रत्यक्ष पद्धतीने अन्याय करणारेच आहे. 

टॅग्स :marathiमराठीhindiहिंदीMaharashtraमहाराष्ट्र