शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

...तर मराठीही हिंदीची उपभाषा होईल; सुधीर रसाळ यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:01 IST

मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांचे जपवणूक करणे मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

ठळक मुद्देपरराज्यातून कोणी येते तेव्हा त्यांना आधी मराठी भाषा शिकवावीहिंदी भाषेचे प्रादेशिक भाषेवर होत आहे आक्रमण

औरंगाबाद : भारतामध्ये कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा करण्याच्या पात्रतेची नाही. हिंदी भाषा बोलणारे अधिक आहेत, एवढा एकच मुद्दा आहे; पण तेवढ्यासाठी हिंदी राष्ट्रभाषा करून सर्वांवर लादावी हे लोकशाहीच्या विरोधात आहे. हिंदीचे मराठीवरचे आक्रमण असेच चालू राहिले, तर काही वर्षांनंतर मराठी भाषा स्वत:चे अस्तित्व गमावून बसेल आणि भोजपुरीप्रमाणे हिंदीची एक उपभाषा होऊन जाईल, अशा शब्दांत डॉ. सुधीर रसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना ‘मराठी वाचवा’ अभियानाबाबत मत व्यक्त केले.

नुकत्याच मांडलेल्या शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीची करावी या प्रस्तावाला विरोध केला. मराठी संवर्धनाविषयी बोलताना ते म्हणाले की, हिंदी भाषा ही आर्य कुळातल्या मराठी, गुजराती यांसारख्या प्रादेशिक भाषांवर आक्रमण करत आहे. मराठी भाषा अलीकडच्या काळात हिंदीच्या संपर्कामुळे विकृत होत आहे. जेव्हा एकाच कुळातल्या दोन भाषा एकत्र येऊ लागतात, तेव्हा जर एका भाषेचे वर्चस्व स्वीकारले गेले तर आपोआपच दुसरी मूळ भाषा नष्ट होऊ लागते, हे सध्या मराठीच्या बाबतीत होऊ पाहत आहे. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य या गोष्टींची जपवणूक करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. 

अमेरिकेत गेल्यावर प्रत्येक परभाषीय व्यक्तीला सर्वात आधी अमेरिकन इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही जेव्हा परराज्यातून कोणी येते तेव्हा त्यांना आधी मराठी भाषा शिकवून मगच वर्गात प्रवेश दिला पाहिजे. महाराष्ट्रात तर शिक्षणाचे माध्यम हे मराठीच पाहिजे. शालेय पातळीवर मराठी हीच प्रमुख भाषा असली पाहिजे. याशिवाय महाराष्ट्रात जर स्वत:चे स्वतंत्र बोर्ड आहे, तर मग इतर बोर्डांना येथे प्रवेश का द्यावा? या बोर्डांना महाराष्ट्रात प्रवेश मिळणे, हे देखील मराठी मुलांवर अप्रत्यक्ष पद्धतीने अन्याय करणारेच आहे. 

टॅग्स :marathiमराठीhindiहिंदीMaharashtraमहाराष्ट्र