शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

...तर मराठीही हिंदीची उपभाषा होईल; सुधीर रसाळ यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:01 IST

मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांचे जपवणूक करणे मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

ठळक मुद्देपरराज्यातून कोणी येते तेव्हा त्यांना आधी मराठी भाषा शिकवावीहिंदी भाषेचे प्रादेशिक भाषेवर होत आहे आक्रमण

औरंगाबाद : भारतामध्ये कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा करण्याच्या पात्रतेची नाही. हिंदी भाषा बोलणारे अधिक आहेत, एवढा एकच मुद्दा आहे; पण तेवढ्यासाठी हिंदी राष्ट्रभाषा करून सर्वांवर लादावी हे लोकशाहीच्या विरोधात आहे. हिंदीचे मराठीवरचे आक्रमण असेच चालू राहिले, तर काही वर्षांनंतर मराठी भाषा स्वत:चे अस्तित्व गमावून बसेल आणि भोजपुरीप्रमाणे हिंदीची एक उपभाषा होऊन जाईल, अशा शब्दांत डॉ. सुधीर रसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना ‘मराठी वाचवा’ अभियानाबाबत मत व्यक्त केले.

नुकत्याच मांडलेल्या शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीची करावी या प्रस्तावाला विरोध केला. मराठी संवर्धनाविषयी बोलताना ते म्हणाले की, हिंदी भाषा ही आर्य कुळातल्या मराठी, गुजराती यांसारख्या प्रादेशिक भाषांवर आक्रमण करत आहे. मराठी भाषा अलीकडच्या काळात हिंदीच्या संपर्कामुळे विकृत होत आहे. जेव्हा एकाच कुळातल्या दोन भाषा एकत्र येऊ लागतात, तेव्हा जर एका भाषेचे वर्चस्व स्वीकारले गेले तर आपोआपच दुसरी मूळ भाषा नष्ट होऊ लागते, हे सध्या मराठीच्या बाबतीत होऊ पाहत आहे. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य या गोष्टींची जपवणूक करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. 

अमेरिकेत गेल्यावर प्रत्येक परभाषीय व्यक्तीला सर्वात आधी अमेरिकन इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही जेव्हा परराज्यातून कोणी येते तेव्हा त्यांना आधी मराठी भाषा शिकवून मगच वर्गात प्रवेश दिला पाहिजे. महाराष्ट्रात तर शिक्षणाचे माध्यम हे मराठीच पाहिजे. शालेय पातळीवर मराठी हीच प्रमुख भाषा असली पाहिजे. याशिवाय महाराष्ट्रात जर स्वत:चे स्वतंत्र बोर्ड आहे, तर मग इतर बोर्डांना येथे प्रवेश का द्यावा? या बोर्डांना महाराष्ट्रात प्रवेश मिळणे, हे देखील मराठी मुलांवर अप्रत्यक्ष पद्धतीने अन्याय करणारेच आहे. 

टॅग्स :marathiमराठीhindiहिंदीMaharashtraमहाराष्ट्र