शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही

By बापू सोळुंके | Updated: August 26, 2022 18:46 IST

छत्रपती संभाजी राजें यांनी त्यांचा राजकीय पक्ष चालवावा, मराठा समाजाचे नेतृत्व करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

औरंगाबाद: मराठा समाजाच्या प्रश्नांसंबंधी शासनाने गुरूवारी बोलविलेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना माजी खासदार छत्रपती संभाजी राजेंनी बोलू दिले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचीच स्तूती ते करताना दिसले. आम्ही छत्रपतींच्या गादीचा सन्मान करतो, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही,अशी रोखठोक भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली.

क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. शिवानंद भानूसे म्हणाले की, मुंबईच्या बैठकीसाठी औरंगाबादेतून सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट, सतीश वेताळ आणि स्वत: भानुसे यांना बोलावण्यात आले होते. कोटकर, भराट आणि वेताळ यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला नाही. बैठकीच्या सुरवातीलाच छत्रपती संभाजी राजेंनी बैठकीत कोणीही बोलू नका, अन्यथा मी बैठक सोडून निघून जाईल असे सांगून प्रत्येकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. ते केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीच स्तूती करताना दिसत होते. यामुळे आम्ही संभाजी राजेंचा निषेध करतो. छत्रपती संभाजी राजें यांनी त्यांचा राजकीय पक्ष चालवावा, मराठा समाजाचे नेतृत्व करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. बैठकीत मराठा आरक्षणाचा विषय बाजूला ठेवून केवळ सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला मुबलक निधी देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र किती निधी देणार हे जाहिर केले नाही. 

रविंद्र काळे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चात फुट पाडली. यामुळे आरक्षण उपसमितीत चंद्रकांत पाटील यांचा समावेश करू नका, अशी मागणी केली. प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी बैठक असल्याचे सांगून बैठकीसाठी मुंबईला बोलावले मात्र बैठकीत प्रवेश दिला नाही. मराठवाड्यातील जनतेला आरक्षणाची खरी गरज असताना मराठा आरक्षणावर कोणतीही चर्चा या बैठकीत न होणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. सुनील कोटकर म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मेटे यांचाही बळी गेला. आणखी किती बळी शासनाला हवे आहेत असा सवाल केला. यावेळी सुरेश वाकडे, अरूण नवले, सुकन्या भोसले, रवींद्र वाहटुळे आदींची उपस्थिती होती.

कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांनी शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील उच्च न्यायालयात पडून आहेत. विशेष न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी घ्यावी अशी आमची मागणी असल्याचे रेखा वाहटुळे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण