शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही

By बापू सोळुंके | Updated: August 26, 2022 18:46 IST

छत्रपती संभाजी राजें यांनी त्यांचा राजकीय पक्ष चालवावा, मराठा समाजाचे नेतृत्व करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

औरंगाबाद: मराठा समाजाच्या प्रश्नांसंबंधी शासनाने गुरूवारी बोलविलेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना माजी खासदार छत्रपती संभाजी राजेंनी बोलू दिले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचीच स्तूती ते करताना दिसले. आम्ही छत्रपतींच्या गादीचा सन्मान करतो, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही,अशी रोखठोक भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली.

क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. शिवानंद भानूसे म्हणाले की, मुंबईच्या बैठकीसाठी औरंगाबादेतून सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट, सतीश वेताळ आणि स्वत: भानुसे यांना बोलावण्यात आले होते. कोटकर, भराट आणि वेताळ यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला नाही. बैठकीच्या सुरवातीलाच छत्रपती संभाजी राजेंनी बैठकीत कोणीही बोलू नका, अन्यथा मी बैठक सोडून निघून जाईल असे सांगून प्रत्येकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. ते केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीच स्तूती करताना दिसत होते. यामुळे आम्ही संभाजी राजेंचा निषेध करतो. छत्रपती संभाजी राजें यांनी त्यांचा राजकीय पक्ष चालवावा, मराठा समाजाचे नेतृत्व करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. बैठकीत मराठा आरक्षणाचा विषय बाजूला ठेवून केवळ सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला मुबलक निधी देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र किती निधी देणार हे जाहिर केले नाही. 

रविंद्र काळे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चात फुट पाडली. यामुळे आरक्षण उपसमितीत चंद्रकांत पाटील यांचा समावेश करू नका, अशी मागणी केली. प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी बैठक असल्याचे सांगून बैठकीसाठी मुंबईला बोलावले मात्र बैठकीत प्रवेश दिला नाही. मराठवाड्यातील जनतेला आरक्षणाची खरी गरज असताना मराठा आरक्षणावर कोणतीही चर्चा या बैठकीत न होणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. सुनील कोटकर म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मेटे यांचाही बळी गेला. आणखी किती बळी शासनाला हवे आहेत असा सवाल केला. यावेळी सुरेश वाकडे, अरूण नवले, सुकन्या भोसले, रवींद्र वाहटुळे आदींची उपस्थिती होती.

कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांनी शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील उच्च न्यायालयात पडून आहेत. विशेष न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी घ्यावी अशी आमची मागणी असल्याचे रेखा वाहटुळे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण