शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

Maratha Reservation: सरकार टिकवण्यासाठी जे प्रयत्न केले तसेच मराठा आरक्षणासाठी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:26 IST

Vinod Patil on state govt's reconsideration petition in supreme court over maratha reservation : राज्य सरकारने याचिका दाखल करण्यापूर्वी विनोद पाटील यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद : राज्य आणि केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचीका दाखल केली आहे. आता दोघांनी मिळून मराठा आरक्षण टिकविण्यासाठी ताकद लावण्याची गरज आहे. हे राज्य सरकार सुप्रीम कोर्टांत मराठा आरक्षण गेले त्यानंतर अस्तिवात आले आहे. त्याच दरम्यान, दोन दिवसांचे सरकार टिकविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने जसे प्रयत्न केले होते तसेच मराठा आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करा असा टोला मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारला लगावला. ( Vinod Patil on state govt's reconsideration petition in supreme court over maratha reservation ) 

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप खासदार संभाजीराजे यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. राज्य सरकारने याचिका दाखल करण्यापूर्वी विनोद पाटील यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर यावर विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया देत आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून जोर लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. 

तसेच मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला होता त्यानंतर हे सरकार अस्तित्वात आले आहे. त्याच दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात सरकार थाटले. या दोन दिवसीय सरकारची आठवण पाटील यांनी राज्य सरकारला करून दिली. त्यावेळी सरकार वाचविण्यासाठी जे जे प्रयत्न करण्यात आले तसेच प्रयत्न मराठा आरक्षण टिकवण्यासाठी करण्यात यावेत असा टोलाही विनोद पाटील यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार