शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Maratha Reservation : माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दिलासादायक पाऊले उचलावी : संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 12:41 IST

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे भेटणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार.

ठळक मुद्देमराठा समाजाच्या प्रश्न शासनदरबारी पोहचवण्यासाठी ५८ मोर्चे काढून झाले. आता रस्त्यावर आंदोलनाची गरज नाही. कोविडच्या कालावधीत आंदोलन करून जनतेचा जीव धोक्यात कशासाठी घालायचा असा सवाल त्यांनी उपस्थित

औरंगाबाद : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने समाजासाठी काय करता येईल यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. याकरिता दोन दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल नांदेड आणि जालना जिल्ह्याचा दौरा करुन ते रात्री औरंगाबाद शहरात मुक्कामी होते. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि मराठा क्रांती मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याशी  चर्चा केली. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रश्न शासनदरबारी पोहचवण्यासाठी ५८ मोर्चे काढून झाले. आता रस्त्यावर आंदोलनाची गरज नाही. कोविडच्या कालावधीत आंदोलन करून जनतेचा जीव धोक्यात कशासाठी घालायचा असा सवाल त्यांनी उपस्थित करुन आमदार विनायक मेटे यांनी ५ जून रोजी आयोजित केलेल्या मोर्चा चुकीचा असल्याचे एकप्रकारे संकेत दिले.  

तसेच मराठा आरक्षणापेक्षाही सारथी संस्था महत्वाची आहे. मात्र, ज्या व्यक्तीना मराठा समाजाबद्दल आस्था नाही अशा लोकांच्या हातात सारथीचे सुत्र आहेत. सारथीमध्ये मराठा समाजाचा व्यक्ती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाने कोणत्याही परिस्थितीत  मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी पावले उचलावीत .यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आपसांततील हेवेदावे बाजूला ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. याकरिता दोन दिवसात शरद पवार , देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर २८ मे रोजी त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीAurangabadऔरंगाबाद