शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल

By admin | Updated: June 26, 2014 00:58 IST

औरंगाबाद : वेगवेगळे निवाडे पाहता सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल, असे मत आज येथे न्या. बी. एन. देशमुख यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : वेगवेगळे निवाडे पाहता सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल, असे मत आज येथे न्या. बी. एन. देशमुख यांनी व्यक्त केले. व्यंकटेश पाटील लिखित ‘मराठा आरक्षण : भूमिका आणि वास्तव’ या ग्रंथाच्या विमोचनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विंग कमांडर टी. आर. जाधव, कॉ. मनोहर टाकसाळ, बाबा भांड, अ‍ॅड. डी. आर. शेळके, जयाजी सूर्यवंशी, अण्णासाहेब आहेर व प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते या ग्रंथाचे विमोचन झाले. प्रारंभी लेखक व्यंकटेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. गव्हाणे यांनी या ग्रंथावर व एकूणच मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मीमांसा केली. न्या. देशमुख यांनी सांगितले की, सोळा टक्के आरक्षण लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. याचे आपण स्वागत करूया; पण आता ही लढाई वेगळ्या ठिकाणी सुरू होईल. महाराष्ट्र शासन आणि समाजही मराठा आरक्षण लागू करून घेण्यात यशस्वी झालेले आहे. महाराष्ट्रीयन शेतकरी संशोधन आणि विकास परिषदेचे बाळासाहेब सराटे यांनी सूत्रसंचालन केले, तर दत्तात्रय परभणे यांनी आभार मानले. आरक्षण देण्यात काहीही वावगे नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरीविरोधी घटना लिहिण्याचे कारण नाही. जो समाज माथाडी आहे, हमाल आहे, कष्टकरी, शेतमजूर आहे, झोपडपट्ट्यांमध्ये राहतो, त्याला आरक्षण नको, असे घटनाही सांगत नाही. मंडल आयोगाच्या लढाईत आम्ही अग्रभागी होतो.पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यावेळी मंडल आयोगाची बाजू घेतली. त्यावेळी आम्ही हे सांगत राहिलो की, एकदा मंडल लागू होऊ द्या. मग मराठा आरक्षणाचे पाऊल पुढे पडू शकते. साडेतीनशे वर्षांनंतर जिवासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची गरज होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्याही दुर्बलच असतो हे लक्षात घेतले पाहिजे. ७० टक्के मराठा समाज दरिद्री आहे. त्याला आरक्षण देण्यात काहीही वावगे नाही. मंडल आयोग छाननी समितीत न्या. पी. बी. सावंत होते. त्यांनी या ग्रंथातील आपल्या लेखात मराठा आरक्षण टिकेल, असे मत दिले आहे. माझेही तेच मत आहे, असे न्या. देशमुख यांनी स्पष्ट केले.