शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीला धडकणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:16 IST

Maratha Kranti Morcha : ९ सप्टेंबर रोजी एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तत्पूर्वी मराठा समाजाच्या ज्या उमेदवारांची शासकीय सेवेसाठी निवड झाली होती त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे देऊन रुजू करून घ्यावे

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यासाठी समन्वयकांचे एकमत १०२ वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणाला अडसर ठरत नाही

औरंगाबाद: घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा लोकसभा हिवाळी अधिवेशन सुरू होताच दिल्लीला धडकणार असल्याची माहिती, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

चव्हाण म्हणाले की , मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. तेव्हापासून समाजाचे तरुण हवालदिल झाले आहे. नोकरी आणि शिक्षणाचे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी समाज पुन्हा संघटित झाला आहे. मराठा समाजाला केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी तात्काळ पावले उचलावे याकरिता मराठा क्रांती मोर्चा दिल्ली येथे धडकणार आहे. या मोर्चाला जाण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीकरीता रेल्वे गाड्या बुक करणार आहेत. या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्थगिती पूर्वीच्या नियुक्त्या द्या ९ सप्टेंबर रोजी एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तत्पूर्वी मराठा समाजाच्या ज्या उमेदवारांची शासकीय सेवेसाठी निवड झाली होती त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे देऊन रुजू करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली. मराठा विद्यार्थ्याना ईडब्ल्यूएसचे १० टक्के आरक्षण सरसकट न देता ऐच्छिक करावे, राज्य सरकारने मॅनेजमेन्ट कोटा म्हणून मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा आणि त्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे. यावेळी अभिजीत देशमुख, सुरेश वाकडे, मनोज गायके,सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे, मनिषा मराठे आदी उपस्थित होते. 

१०२ वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणाला अडसर ठरत नाहीकेंद्रीय मागासवर्गीय आयोगाने १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्याच्या इतर मागासवर्गीयासाठी आरक्षण देण्याच्या अधिकाराला धक्का लागत नाही. राज्य सरकार स्वतःच्या अधिकारांत कोणत्याही जातीला आरक्षण देऊ शकते. यासाठी त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. यासंदर्भात राज्य सरकारने केंद्रीय मागास आयोगाकडे शिफारसीसह पत्र पाठवून त्यांचे स्पष्टीकरण घ्यावे असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण