शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीला धडकणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:16 IST

Maratha Kranti Morcha : ९ सप्टेंबर रोजी एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तत्पूर्वी मराठा समाजाच्या ज्या उमेदवारांची शासकीय सेवेसाठी निवड झाली होती त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे देऊन रुजू करून घ्यावे

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यासाठी समन्वयकांचे एकमत १०२ वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणाला अडसर ठरत नाही

औरंगाबाद: घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा लोकसभा हिवाळी अधिवेशन सुरू होताच दिल्लीला धडकणार असल्याची माहिती, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

चव्हाण म्हणाले की , मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. तेव्हापासून समाजाचे तरुण हवालदिल झाले आहे. नोकरी आणि शिक्षणाचे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी समाज पुन्हा संघटित झाला आहे. मराठा समाजाला केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी तात्काळ पावले उचलावे याकरिता मराठा क्रांती मोर्चा दिल्ली येथे धडकणार आहे. या मोर्चाला जाण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीकरीता रेल्वे गाड्या बुक करणार आहेत. या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्थगिती पूर्वीच्या नियुक्त्या द्या ९ सप्टेंबर रोजी एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तत्पूर्वी मराठा समाजाच्या ज्या उमेदवारांची शासकीय सेवेसाठी निवड झाली होती त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे देऊन रुजू करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली. मराठा विद्यार्थ्याना ईडब्ल्यूएसचे १० टक्के आरक्षण सरसकट न देता ऐच्छिक करावे, राज्य सरकारने मॅनेजमेन्ट कोटा म्हणून मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा आणि त्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे. यावेळी अभिजीत देशमुख, सुरेश वाकडे, मनोज गायके,सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे, मनिषा मराठे आदी उपस्थित होते. 

१०२ वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणाला अडसर ठरत नाहीकेंद्रीय मागासवर्गीय आयोगाने १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्याच्या इतर मागासवर्गीयासाठी आरक्षण देण्याच्या अधिकाराला धक्का लागत नाही. राज्य सरकार स्वतःच्या अधिकारांत कोणत्याही जातीला आरक्षण देऊ शकते. यासाठी त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. यासंदर्भात राज्य सरकारने केंद्रीय मागास आयोगाकडे शिफारसीसह पत्र पाठवून त्यांचे स्पष्टीकरण घ्यावे असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण