शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

काही आरक्षण अभ्यासक अन् सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: October 12, 2023 18:54 IST

४० दिवसांत आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. असे असताना राज्यसरकारने आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

छत्रपती संभाजीनगर: ९ ऑगस्ट २०१६ रोजी मराठा समाजाचा पहिला मोर्चा शहरातून काढण्यात आला तेव्हापासून मराठा आरक्षण ही मागणी समाजाने लावून धरली.यानंतर राज्यसरकारने दिलेले एसईबीसी आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण, सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. आता मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणारे कथित अभ्यासक आणि राज्यसरकारकडून समाजाची दिशाभूल केली असल्याचा आरोप क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

काळे पाटील म्हणाले की, मराठा क्रांती मूक मोर्चाला छत्रपती संभाजीनगरमधून सुरवात झाली. यानंतर राज्यात तब्बल ५८ मोर्चे निघाले. शिवाय मराठा बांधवांनीही आत्मबलिदान दिले. रस्त्यावरील लढाईतून मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण मिळाले. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर रद्द झाले. तत्कालीन सरकारने योग्य बाजू न मांडल्याने हे आरक्षण रद्द झाले. तेव्हापासून मराठा समाज वाऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे,यासाठी रस्त्यावरील लढाई लढत आहेत. त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी जाहिरसभेचे आयोजनही केले आहे. आम्ही मराठा म्हणून त्या सभेला जाणार आहोत. 

जरांगे यांना ४० दिवसांत आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. असे असताना राज्यसरकारने आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. शिवाय काही मराठा अभ्यासकही न्यायालयातूनच आरक्षण मिळेल असे सांगत आहेत. यावरून हे अभ्यासक आणि सरकार समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काळे पाटील यांनी केला. जरांगे पाटील यांचे आंदालन सुरू झाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी  मराठा आरक्षण उपसमिती बैठक घेतल्याचा आरोप काळे यांनी केला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण