शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

काही आरक्षण अभ्यासक अन् सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: October 12, 2023 18:54 IST

४० दिवसांत आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. असे असताना राज्यसरकारने आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

छत्रपती संभाजीनगर: ९ ऑगस्ट २०१६ रोजी मराठा समाजाचा पहिला मोर्चा शहरातून काढण्यात आला तेव्हापासून मराठा आरक्षण ही मागणी समाजाने लावून धरली.यानंतर राज्यसरकारने दिलेले एसईबीसी आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण, सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. आता मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणारे कथित अभ्यासक आणि राज्यसरकारकडून समाजाची दिशाभूल केली असल्याचा आरोप क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

काळे पाटील म्हणाले की, मराठा क्रांती मूक मोर्चाला छत्रपती संभाजीनगरमधून सुरवात झाली. यानंतर राज्यात तब्बल ५८ मोर्चे निघाले. शिवाय मराठा बांधवांनीही आत्मबलिदान दिले. रस्त्यावरील लढाईतून मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण मिळाले. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर रद्द झाले. तत्कालीन सरकारने योग्य बाजू न मांडल्याने हे आरक्षण रद्द झाले. तेव्हापासून मराठा समाज वाऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे,यासाठी रस्त्यावरील लढाई लढत आहेत. त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी जाहिरसभेचे आयोजनही केले आहे. आम्ही मराठा म्हणून त्या सभेला जाणार आहोत. 

जरांगे यांना ४० दिवसांत आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. असे असताना राज्यसरकारने आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. शिवाय काही मराठा अभ्यासकही न्यायालयातूनच आरक्षण मिळेल असे सांगत आहेत. यावरून हे अभ्यासक आणि सरकार समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काळे पाटील यांनी केला. जरांगे पाटील यांचे आंदालन सुरू झाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी  मराठा आरक्षण उपसमिती बैठक घेतल्याचा आरोप काळे यांनी केला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण