शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जिल्ह्यातील अनेक उद्योग अर्थसाह्य योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 15:10 IST

‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी पतपुरवठ्याची गत 

ठळक मुद्देदोन महिन्यांत जवळपास दीड हजार उद्योगांनी १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील उद्योगांसाठी ५५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झालेले आहे.मोठ्या प्रमाणात हा पतपुरवठा दोन राष्ट्रीयीकृत बँकांनीच केला आहे. 

औरंगाबाद : येथील सर्वाधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) व्यवहार सहकारी बँकांमध्ये आहेत. मात्र, या बँका केंद्रीय अर्थसाह्य योजनेच्या तांत्रिक निकषांची पूर्तता करू शकत नसल्यामुळे बहुतांशी उद्योग या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. 

केंद्र सरकारने देशातील ‘एमएसएमई’ उद्योगांना ऊर्जितावस्था देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची अर्थसाह्य योजना जाहीर केली. यामध्ये उद्योगांना विनातारण व जामीनदाराशिवाय कर्ज मिळणार आहे. यासाठी साडेचार ते पाच हजार उद्योगांनी कर्जाची मागणी केली होती. गेल्या दोन महिन्यांत जवळपास दीड हजार उद्योगांनी १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मोठ्या प्रमाणात हा पतपुरवठा दोन राष्ट्रीयीकृत बँकांनीच केला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील उद्योगांसाठी ५५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झालेले आहे. 

सहकारी बँका मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या डबघाईला (एनपीए) आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईननुसार पतपुरवठा करण्याच्या मर्यादा आहेत. केंद्र सरकारच्या या अर्थसाह्य योजनेचे निकष शिथिल करावेत. ज्यामुळे सहकारी बँकांना पतपुरवठा करणे सहज सोपे होईल, यासंदर्भात ‘सीएमआयए’ तसेच ‘मसिआ’ या उद्योग संघटनांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर केले आहे. सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे, असे ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले. 

‘मसिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ म्हणाले की, या योजनेपासून सूक्ष्म आणि लघु उद्योग बऱ्यापैकी वंचित राहिले आहेत. अगोदरच हे उद्योग कोरोनामुळे भरडले गेले आहेत. सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विसकटली असून, अनेक उद्योग शेवटची घटका मोजत आहेत. यामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसाह्य योजनेतून आशेचा किरण दिसला; परंतु सहकारी व खाजगी बँका या योजनेच्या निकषात बसत नाहीत. निकषांमध्ये थोडी शिथिलता आणून या लहान उद्योगांना आर्थिक बळ द्यावे, अशी आमची मागणी आहे. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादfundsनिधीbankबँक