शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

जिल्ह्यातील अनेक उद्योग अर्थसाह्य योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 15:10 IST

‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी पतपुरवठ्याची गत 

ठळक मुद्देदोन महिन्यांत जवळपास दीड हजार उद्योगांनी १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील उद्योगांसाठी ५५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झालेले आहे.मोठ्या प्रमाणात हा पतपुरवठा दोन राष्ट्रीयीकृत बँकांनीच केला आहे. 

औरंगाबाद : येथील सर्वाधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) व्यवहार सहकारी बँकांमध्ये आहेत. मात्र, या बँका केंद्रीय अर्थसाह्य योजनेच्या तांत्रिक निकषांची पूर्तता करू शकत नसल्यामुळे बहुतांशी उद्योग या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. 

केंद्र सरकारने देशातील ‘एमएसएमई’ उद्योगांना ऊर्जितावस्था देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची अर्थसाह्य योजना जाहीर केली. यामध्ये उद्योगांना विनातारण व जामीनदाराशिवाय कर्ज मिळणार आहे. यासाठी साडेचार ते पाच हजार उद्योगांनी कर्जाची मागणी केली होती. गेल्या दोन महिन्यांत जवळपास दीड हजार उद्योगांनी १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मोठ्या प्रमाणात हा पतपुरवठा दोन राष्ट्रीयीकृत बँकांनीच केला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील उद्योगांसाठी ५५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झालेले आहे. 

सहकारी बँका मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या डबघाईला (एनपीए) आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईननुसार पतपुरवठा करण्याच्या मर्यादा आहेत. केंद्र सरकारच्या या अर्थसाह्य योजनेचे निकष शिथिल करावेत. ज्यामुळे सहकारी बँकांना पतपुरवठा करणे सहज सोपे होईल, यासंदर्भात ‘सीएमआयए’ तसेच ‘मसिआ’ या उद्योग संघटनांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर केले आहे. सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे, असे ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले. 

‘मसिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ म्हणाले की, या योजनेपासून सूक्ष्म आणि लघु उद्योग बऱ्यापैकी वंचित राहिले आहेत. अगोदरच हे उद्योग कोरोनामुळे भरडले गेले आहेत. सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विसकटली असून, अनेक उद्योग शेवटची घटका मोजत आहेत. यामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसाह्य योजनेतून आशेचा किरण दिसला; परंतु सहकारी व खाजगी बँका या योजनेच्या निकषात बसत नाहीत. निकषांमध्ये थोडी शिथिलता आणून या लहान उद्योगांना आर्थिक बळ द्यावे, अशी आमची मागणी आहे. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादfundsनिधीbankबँक