शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

जिल्ह्यातील अनेक उद्योग अर्थसाह्य योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 15:10 IST

‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी पतपुरवठ्याची गत 

ठळक मुद्देदोन महिन्यांत जवळपास दीड हजार उद्योगांनी १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील उद्योगांसाठी ५५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झालेले आहे.मोठ्या प्रमाणात हा पतपुरवठा दोन राष्ट्रीयीकृत बँकांनीच केला आहे. 

औरंगाबाद : येथील सर्वाधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) व्यवहार सहकारी बँकांमध्ये आहेत. मात्र, या बँका केंद्रीय अर्थसाह्य योजनेच्या तांत्रिक निकषांची पूर्तता करू शकत नसल्यामुळे बहुतांशी उद्योग या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. 

केंद्र सरकारने देशातील ‘एमएसएमई’ उद्योगांना ऊर्जितावस्था देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची अर्थसाह्य योजना जाहीर केली. यामध्ये उद्योगांना विनातारण व जामीनदाराशिवाय कर्ज मिळणार आहे. यासाठी साडेचार ते पाच हजार उद्योगांनी कर्जाची मागणी केली होती. गेल्या दोन महिन्यांत जवळपास दीड हजार उद्योगांनी १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मोठ्या प्रमाणात हा पतपुरवठा दोन राष्ट्रीयीकृत बँकांनीच केला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील उद्योगांसाठी ५५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झालेले आहे. 

सहकारी बँका मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या डबघाईला (एनपीए) आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईननुसार पतपुरवठा करण्याच्या मर्यादा आहेत. केंद्र सरकारच्या या अर्थसाह्य योजनेचे निकष शिथिल करावेत. ज्यामुळे सहकारी बँकांना पतपुरवठा करणे सहज सोपे होईल, यासंदर्भात ‘सीएमआयए’ तसेच ‘मसिआ’ या उद्योग संघटनांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर केले आहे. सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे, असे ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले. 

‘मसिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ म्हणाले की, या योजनेपासून सूक्ष्म आणि लघु उद्योग बऱ्यापैकी वंचित राहिले आहेत. अगोदरच हे उद्योग कोरोनामुळे भरडले गेले आहेत. सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विसकटली असून, अनेक उद्योग शेवटची घटका मोजत आहेत. यामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसाह्य योजनेतून आशेचा किरण दिसला; परंतु सहकारी व खाजगी बँका या योजनेच्या निकषात बसत नाहीत. निकषांमध्ये थोडी शिथिलता आणून या लहान उद्योगांना आर्थिक बळ द्यावे, अशी आमची मागणी आहे. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादfundsनिधीbankबँक