शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

"पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी"; जरांगेंचा मोर्चा मविआ नेत्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 11:54 IST

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :  गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनही सुरू आहे.  दरम्यान, आता जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केले आहे. त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. काही दिवसातच ते शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पार करणार आहेत. मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या मुळ गावी जाणार आहे, त्याआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा आरक्षाबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत आव्हान केले. 

शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी या आरक्षणाला विरोध सुरू केला असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.  पत्रकारांसोबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीचे विरोधक नाही.आम्ही जो चुकला त्याला बोलतो. फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवं. मराठा समाज ५० , ५५ टक्के आहे. आम्ही कोणालाच आव्हान करत नाही. आम्ही आणि आमच्या समाजाला आव्हान करतो, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मराठ्यांसमोर तुम्ही शांत बसला नाही, मराठ्यांना असंच डिवचत राहिला तर, मला उघड पाण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकीय जीवनातून मराठा तुम्हाला संपवणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाज अनेक दिवसापासून कष्ट करत आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आमची मुल हमालासारख काम करत आहेत. आमची सुद्धा आता मुल मोठं झाली पाहिजेत. त्यामुळे आता शहरापासून ग्रामीण भागातील मराठा समाज चिडला आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मराठा समाजात आता यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे. हे लोक सत्तेत असून टारगेट करत आहेत. मराठा समाज आता जशास तसे उत्तर देत आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले. मी आता सात ते आठ दिवस काही बोलणार नाही. आता आमचं लक्ष २०२४ आहे, सगळी पाडापाडी करणार, असंही पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीतील नेत्यांना आव्हान

जरांगे पाटील म्हणाले, काही दिवसापूर्वी एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी. यावर आता मी सांगतो, ही जी त्यांनी तीन नावे घेतली यांनी क्लिअक भूमिका घेतली पाहिजे. यांनी मराठ्यांना ओबीसीतून मिळावे अशी भूमिका घेतली पाहिजे, असं आव्हानही मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

"तुम्ही त्यांना एकदा भूमिका विचारली तर त्यांनी काही सांगितली नाही, आता तुम्ही सरळ आरक्षण दिले पाहिजे. ते नाही म्हटले म्हणून तुम्ही आमचं वाटोळ करता का? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.  भूमिका घ्यायची की नाही हे त्यांनी ठरवले पाहिजे, 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNana Patoleनाना पटोलेSharad Pawarशरद पवार