शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

"पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी"; जरांगेंचा मोर्चा मविआ नेत्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 11:54 IST

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :  गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनही सुरू आहे.  दरम्यान, आता जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केले आहे. त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. काही दिवसातच ते शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पार करणार आहेत. मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या मुळ गावी जाणार आहे, त्याआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा आरक्षाबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत आव्हान केले. 

शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी या आरक्षणाला विरोध सुरू केला असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.  पत्रकारांसोबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीचे विरोधक नाही.आम्ही जो चुकला त्याला बोलतो. फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवं. मराठा समाज ५० , ५५ टक्के आहे. आम्ही कोणालाच आव्हान करत नाही. आम्ही आणि आमच्या समाजाला आव्हान करतो, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मराठ्यांसमोर तुम्ही शांत बसला नाही, मराठ्यांना असंच डिवचत राहिला तर, मला उघड पाण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकीय जीवनातून मराठा तुम्हाला संपवणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाज अनेक दिवसापासून कष्ट करत आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आमची मुल हमालासारख काम करत आहेत. आमची सुद्धा आता मुल मोठं झाली पाहिजेत. त्यामुळे आता शहरापासून ग्रामीण भागातील मराठा समाज चिडला आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मराठा समाजात आता यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे. हे लोक सत्तेत असून टारगेट करत आहेत. मराठा समाज आता जशास तसे उत्तर देत आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले. मी आता सात ते आठ दिवस काही बोलणार नाही. आता आमचं लक्ष २०२४ आहे, सगळी पाडापाडी करणार, असंही पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीतील नेत्यांना आव्हान

जरांगे पाटील म्हणाले, काही दिवसापूर्वी एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी. यावर आता मी सांगतो, ही जी त्यांनी तीन नावे घेतली यांनी क्लिअक भूमिका घेतली पाहिजे. यांनी मराठ्यांना ओबीसीतून मिळावे अशी भूमिका घेतली पाहिजे, असं आव्हानही मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

"तुम्ही त्यांना एकदा भूमिका विचारली तर त्यांनी काही सांगितली नाही, आता तुम्ही सरळ आरक्षण दिले पाहिजे. ते नाही म्हटले म्हणून तुम्ही आमचं वाटोळ करता का? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.  भूमिका घ्यायची की नाही हे त्यांनी ठरवले पाहिजे, 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNana Patoleनाना पटोलेSharad Pawarशरद पवार