शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

आंबा बाजारात पडून...

By admin | Updated: April 28, 2016 23:52 IST

औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याने बाजारात आंबा ‘भाव’ खात आहे. मात्र, महागड्या आंब्याला ग्राहक हात लावण्यासही तयार नाहीत.

औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याने बाजारात आंबा ‘भाव’ खात आहे. मात्र, महागड्या आंब्याला ग्राहक हात लावण्यासही तयार नाहीत. परिणामी फळांचा राजा आंबा अजूनही खवय्यांच्या प्रतीक्षेत आहे. जाधववाडीत दररोज ३० टनांपेक्षा अधिक आंब्याची आवक होत आहे. पण त्यातील निम्माही विकला जात नाही, अशी परिस्थिती आहे. बाजारात सध्या एकानंतर एक परराज्यांतून आंबे दाखल होत आहेत. प्रत्येकाचा रंग, आकार, गोडी वेगळी. बाजारात रत्नागिरी, देवगड येथील हापूस आंब्याला सर्वाधिक भाव असला तरी आता तेथील अस्सल हापूसची आवक संपत आली आहे. त्यामुळे बंगळुरूहून येणाऱ्या हापूस आंब्यालाच रत्नागिरी, देवगडचा हापूस म्हणून ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. ग्राहकांमधील हापूसबद्दलच्या अज्ञानाचा फायदा काही विक्रेते घेत आहेत. बाजारात सर्वप्रथम आंब्याचा हंगाम तामिळनाडू येथील हापूस आंब्याने सुरू झाला. त्यानंतर केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील आंबा बाजारात आला आहे. बाजारात हापूससोबत बदाम, लालबाग, कदुस, दसेरी आंबे मिळत आहेत. तुरळक प्रमाणात का होईना; परंतु गुजरातच्या केशर आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे. मे महिन्यात मराठवाड्यातील केशर, गुजरातमधील केशरची आवक मोठ्या प्रमाणात होईल. त्यानंतर मध्यप्रदेशातील व जूनमध्ये उत्तर प्रदेशातील आंबा बाजारात येईल. यंदा मराठवाड्यात आंब्याचे उत्पादन कमी असले तरीही परप्रांतातून आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहेत. जाधववाडीतील अडत बाजारात दररोज ३० टनांपेक्षा अधिक आंब्याची आवक होत आहे. यासंदर्भात मराठवाडा फळ आणि भाजीपाला अडत संघटनेचे अध्यक्ष युसूफ चौधरी यांनी सांगितले की, यंदा मराठवाड्यातच नाही तर परप्रांतांतही आंब्याचे उत्पादन घटले आहे. पण आपल्यापेक्षा परप्रांतांत उत्पादन चांगले आहे. यामुळे यंदाही परप्रांतांतील आंब्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. अडत विक्रीत केरळचा हापूस १२० ते १४० रुपये किलो, बंगळुरुचा हापूस १०० ते ११० रुपये, रत्नागिरीच्या हापूसची ४ ते ६ डझनची पेटी १३०० ते १५०० रुपये, गुजरातचा केशर ६० ते ८० रुपये, कदुस ६० रुपये तर दसेरी, बदाम (बेनिशान) ५० ते ७० रुपये किलो विकला जात आहे.