शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आंबा बाजारात पडून...

By admin | Updated: April 28, 2016 23:52 IST

औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याने बाजारात आंबा ‘भाव’ खात आहे. मात्र, महागड्या आंब्याला ग्राहक हात लावण्यासही तयार नाहीत.

औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याने बाजारात आंबा ‘भाव’ खात आहे. मात्र, महागड्या आंब्याला ग्राहक हात लावण्यासही तयार नाहीत. परिणामी फळांचा राजा आंबा अजूनही खवय्यांच्या प्रतीक्षेत आहे. जाधववाडीत दररोज ३० टनांपेक्षा अधिक आंब्याची आवक होत आहे. पण त्यातील निम्माही विकला जात नाही, अशी परिस्थिती आहे. बाजारात सध्या एकानंतर एक परराज्यांतून आंबे दाखल होत आहेत. प्रत्येकाचा रंग, आकार, गोडी वेगळी. बाजारात रत्नागिरी, देवगड येथील हापूस आंब्याला सर्वाधिक भाव असला तरी आता तेथील अस्सल हापूसची आवक संपत आली आहे. त्यामुळे बंगळुरूहून येणाऱ्या हापूस आंब्यालाच रत्नागिरी, देवगडचा हापूस म्हणून ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. ग्राहकांमधील हापूसबद्दलच्या अज्ञानाचा फायदा काही विक्रेते घेत आहेत. बाजारात सर्वप्रथम आंब्याचा हंगाम तामिळनाडू येथील हापूस आंब्याने सुरू झाला. त्यानंतर केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील आंबा बाजारात आला आहे. बाजारात हापूससोबत बदाम, लालबाग, कदुस, दसेरी आंबे मिळत आहेत. तुरळक प्रमाणात का होईना; परंतु गुजरातच्या केशर आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे. मे महिन्यात मराठवाड्यातील केशर, गुजरातमधील केशरची आवक मोठ्या प्रमाणात होईल. त्यानंतर मध्यप्रदेशातील व जूनमध्ये उत्तर प्रदेशातील आंबा बाजारात येईल. यंदा मराठवाड्यात आंब्याचे उत्पादन कमी असले तरीही परप्रांतातून आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहेत. जाधववाडीतील अडत बाजारात दररोज ३० टनांपेक्षा अधिक आंब्याची आवक होत आहे. यासंदर्भात मराठवाडा फळ आणि भाजीपाला अडत संघटनेचे अध्यक्ष युसूफ चौधरी यांनी सांगितले की, यंदा मराठवाड्यातच नाही तर परप्रांतांतही आंब्याचे उत्पादन घटले आहे. पण आपल्यापेक्षा परप्रांतांत उत्पादन चांगले आहे. यामुळे यंदाही परप्रांतांतील आंब्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. अडत विक्रीत केरळचा हापूस १२० ते १४० रुपये किलो, बंगळुरुचा हापूस १०० ते ११० रुपये, रत्नागिरीच्या हापूसची ४ ते ६ डझनची पेटी १३०० ते १५०० रुपये, गुजरातचा केशर ६० ते ८० रुपये, कदुस ६० रुपये तर दसेरी, बदाम (बेनिशान) ५० ते ७० रुपये किलो विकला जात आहे.