शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मॉल होणार अनलॉक; चार महिन्यांनंतर मॉलमधील कर्मचारी होणार कामावर रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:45 IST

पार्किंगपासून ते विविध दालनांपर्यंत अनेक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था असणार आहे.

ठळक मुद्देशहरातील मॉल पुन्हा गजबजणारसॅनिटायझेशनसाठी स्वच्छता कर्मचारी वाढणार

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या पर्वानंतर आता अनलॉकचे एकेक सत्र सुरू होत आहे आणि अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत होण्याच्या मार्गावर येत आहे. याच अनुषंगाने आता दि. ५ आॅगस्टपासून  शहरातील मॉल ‘अनलॉक’ होत आहेत. मॉल सुरू होत असले तरी शासनाच्या सर्वच नियमांचे काटेकोर  पालन करण्यात येणार असल्याचे मॉल व्यवस्थापकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. 

शहरातील एका मॉलची एका महिन्यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. हे सर्वच अर्थचक्र  चार महिन्यांपासून ठप्प होते. याला आता पुन्हा चालना मिळणार असल्याने मॉल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील सर्व मोठ्या मॉलमध्ये एकत्रितपणे अंदाजे तीन ते चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी चार महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा कामावर  रुजू होणार आहेत.

प्रत्येक व्यक्तीचे चेकअप करून नंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाईल. प्रत्येकाला मास्क  अनिवार्य असेल. प्रत्येक वस्तूला स्पर्श करून पाहण्याची सवय आणि कोणतीही खरेदी न करता विनाकारण मॉलमध्ये फेरफटका मारण्याची सवय आता ग्राहकांना सोडून द्यावी लागणार आहे. कारण गर्दी नियंत्रित करण्यासाठी व कर्मचारी, तसेच मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या सुरक्षेसाठी मॉल व्यवस्थापकांना काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागेज. प्रोझोनचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आकाश जोशी म्हणाले की, आता मॉलमध्येही अपॉइंटमेंट पद्धत सुरू केली जाईल. अपॉइंटमेंट, आरोग्यसेतू अ‍ॅप असल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

सॅनिटायझेशनसाठी स्वच्छता कर्मचारी वाढणारपार्किंगपासून ते विविध दालनांपर्यंत अनेक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था असणार आहे. मॉलमधील कर्मचाऱ्यांनाही पीपीई कीट परिधान करण्याची सूचना देण्यात आली असून, त्यांची दररोज तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनामुळे स्वच्छतेला अधिक महत्त्व आल्यामुळे मॉलचे वारंवार सॅनिटायझेशन करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकMarketबाजार