शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

घाटीत अन्नाऐवजी औषधी दान करा; प्रशासनाचे स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटनांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 17:52 IST

स्वयंसेवी संस्था व संघटनांनी अन्नदानाऐवजी औषधी दान करण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांत जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कचऱ्याच्या डब्यात टाकले असल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले आहे.

औरंगाबाद : घाटीत संपूर्ण मराठवाड्यासह खान्देश व विदर्भाच्या काही भागांतील रुग्ण उपचारार्थ येतात. त्यांच्या समवेत त्यांचे नातेवाईकही सोबत येत असतात. त्यांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने विविध स्वयंसेवी संस्था व संघटना अन्नदान करतात. मात्र, हे अन्नदान घाटी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. काही रुग्णांचे नातेवाईक अन्न न खाता ते कचऱ्यात टाकत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातून कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था व संघटनांनी अन्नदानाऐवजी औषधी दान करण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीत स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटना अन्नदान करतात. मात्र, रुग्णांचे नातेवाईक संपूर्ण अन्न न खाता ते बहुतांश अन्न कचऱ्यात टाकत असल्याचे आढळून आले आहे. यातून कचऱ्याची नवीनच समस्या निर्माण झाल्याचे घाटी प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कचऱ्याच्या डब्यात टाकले असल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले आहे. हा कचरा आता रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर घाटी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था आणि संघटनांना विनंती केली आहे. त्यांनी अन्नदानावर होणाऱ्या खर्चातून औषधी खरेदी करावी.गरजू आणि आर्थिक दुर्बल रुग्णांना ती पुरवावी. सलाईन, बँडेजसह इतर कमी खर्चाच्या औषधी रुग्णांना पुरविल्या जाऊ शकतात.

यासाठी या संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे अथवा संस्थांनी अन्नदानाचे साहित्य घाटी रुग्णालयास द्यावे. त्याचे अन्नपदार्थ तयार करून ते रुग्णांना दिले जाईल. घाटी प्रशासनाच्या वाचणाऱ्या पैशांतून गरजू रुग्णांना औषधी दिली जाईल, असाही पर्याय घाटी प्रशासनाने संस्थांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

औषधींचे दान करावेघाटी रुग्णालय परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच १५ ट्रक उरलेल्या अन्नाचा कचरा आहे. याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नच आहे. म्हणूनच संस्था आणि संघटनांना आम्ही आवाहन केले आहे की, त्यांनी गरजू रुग्णांना औषधींचे दान करावे.- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

आवाहनावर विचार केला जाईल

सकल जैन समाजाच्या अलर्ट ग्रुपच्या वतीने घाटीत दररोज ३०० ते ४०० रुग्णांच्या नातेवाईकांना एक कडधान्य, वरण भात, चपाती आणि शिरा असलेले भोजन मोफत दिले जाते. यासाठी एक वा दोन दात्यांकडून दररोज ४ हजार १०० रुपये घेतले जातात. यातून अन्नदान केले जाते. घाटीतील अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्याने नातेवाईक आम्ही दिलेले अन्न चवीने खातात, तरीही घाटी प्रशासनाच्या आवाहनावर ग्रुपच्या बैठकीत विचार केला जाईल.- अभय गांधी, स्वयंसवेक, भगवान महावीर रसोई घर, सकल जैन समाज.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीmedicineऔषधंdoctorडॉक्टर