शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत अन्नाऐवजी औषधी दान करा; प्रशासनाचे स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटनांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 17:52 IST

स्वयंसेवी संस्था व संघटनांनी अन्नदानाऐवजी औषधी दान करण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांत जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कचऱ्याच्या डब्यात टाकले असल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले आहे.

औरंगाबाद : घाटीत संपूर्ण मराठवाड्यासह खान्देश व विदर्भाच्या काही भागांतील रुग्ण उपचारार्थ येतात. त्यांच्या समवेत त्यांचे नातेवाईकही सोबत येत असतात. त्यांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने विविध स्वयंसेवी संस्था व संघटना अन्नदान करतात. मात्र, हे अन्नदान घाटी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. काही रुग्णांचे नातेवाईक अन्न न खाता ते कचऱ्यात टाकत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातून कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था व संघटनांनी अन्नदानाऐवजी औषधी दान करण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीत स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटना अन्नदान करतात. मात्र, रुग्णांचे नातेवाईक संपूर्ण अन्न न खाता ते बहुतांश अन्न कचऱ्यात टाकत असल्याचे आढळून आले आहे. यातून कचऱ्याची नवीनच समस्या निर्माण झाल्याचे घाटी प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कचऱ्याच्या डब्यात टाकले असल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले आहे. हा कचरा आता रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर घाटी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था आणि संघटनांना विनंती केली आहे. त्यांनी अन्नदानावर होणाऱ्या खर्चातून औषधी खरेदी करावी.गरजू आणि आर्थिक दुर्बल रुग्णांना ती पुरवावी. सलाईन, बँडेजसह इतर कमी खर्चाच्या औषधी रुग्णांना पुरविल्या जाऊ शकतात.

यासाठी या संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे अथवा संस्थांनी अन्नदानाचे साहित्य घाटी रुग्णालयास द्यावे. त्याचे अन्नपदार्थ तयार करून ते रुग्णांना दिले जाईल. घाटी प्रशासनाच्या वाचणाऱ्या पैशांतून गरजू रुग्णांना औषधी दिली जाईल, असाही पर्याय घाटी प्रशासनाने संस्थांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

औषधींचे दान करावेघाटी रुग्णालय परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच १५ ट्रक उरलेल्या अन्नाचा कचरा आहे. याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नच आहे. म्हणूनच संस्था आणि संघटनांना आम्ही आवाहन केले आहे की, त्यांनी गरजू रुग्णांना औषधींचे दान करावे.- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

आवाहनावर विचार केला जाईल

सकल जैन समाजाच्या अलर्ट ग्रुपच्या वतीने घाटीत दररोज ३०० ते ४०० रुग्णांच्या नातेवाईकांना एक कडधान्य, वरण भात, चपाती आणि शिरा असलेले भोजन मोफत दिले जाते. यासाठी एक वा दोन दात्यांकडून दररोज ४ हजार १०० रुपये घेतले जातात. यातून अन्नदान केले जाते. घाटीतील अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्याने नातेवाईक आम्ही दिलेले अन्न चवीने खातात, तरीही घाटी प्रशासनाच्या आवाहनावर ग्रुपच्या बैठकीत विचार केला जाईल.- अभय गांधी, स्वयंसवेक, भगवान महावीर रसोई घर, सकल जैन समाज.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीmedicineऔषधंdoctorडॉक्टर