शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

ओबीसी समाजामध्ये जगजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:04 AM

आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देगंगाधर बनबरे : डॉ. आंबेडकर नायक पुरस्कार वितरण समारंभ

औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ पुस्तकावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नायक- २०१९’ या राज्यस्तरीय वाचन, लेखन व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सायंकाळी संत तुकाराम नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, जीएसटीचे उपायुक्त रवी जोगदंड, आर. के. गायकवाड आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात होते.यावेळी बनबरे आपल्या भाषणात म्हणाले, सर्वांनी अगोदर बाबासाहेबांनी लिहिलेले मूळ ग्रंथ वाचले पाहिजेत. बाबासाहेबांनी लिहिलेला ‘शूद्र पूर्वी कोण होते’ हा शिवाजी महाराजांसंबंधी धर्माची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. अलीकडे मराठा-दलित हे एकमेकांचे शत्रू आहेत, असे चित्र उभे केले जात आहे; परंतु राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, केळूस्कर गुरुजी यांचा आणि बाबासाहेबांचा संबंध दोन्ही समाजाने समजून घेतला पाहिजे. ओबीसी समाज आपल्यापासून का दुरावला, याचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. थेट देवा-धर्माबद्दल टोकाची भूमिका न घेता मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने धर्म आणि मंदिराचा आपला संबंध आहे; पण बडव्यांना आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेतली आहे.वक्त्यांच्या भाषणानंतर विजेत्या स्पर्धकांना माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात वाचन, लेखन आणि वक्तृत्वाच्या आधारे सामाजिक परिवर्तन केले. त्यांचे अनुकरण आंबेडकरी समाजातील युवकांनीही करावे, स्पर्धेच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या साहित्य वाचनाची सवय लागावी म्हणून स्पर्धा घेण्यात आली होती. सात राज्यांतील २ हजार ७६५ जणांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६५१ युवकांची परीक्षेसाठी निवड केली होती. शंभर गुणांच्या या परीक्षेला ४०० जण बसले होते. नागपूर, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या चार विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण घेणाऱ्या ४७ जणांची वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात रविवारी दिवसभर ही स्पर्धा झाली. त्यानंतर विजेत्यांची निवड जाहीर केली.

टॅग्स :SocialसामाजिकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर