शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

ओबीसी समाजामध्ये जगजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:05 IST

आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देगंगाधर बनबरे : डॉ. आंबेडकर नायक पुरस्कार वितरण समारंभ

औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ पुस्तकावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नायक- २०१९’ या राज्यस्तरीय वाचन, लेखन व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सायंकाळी संत तुकाराम नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, जीएसटीचे उपायुक्त रवी जोगदंड, आर. के. गायकवाड आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात होते.यावेळी बनबरे आपल्या भाषणात म्हणाले, सर्वांनी अगोदर बाबासाहेबांनी लिहिलेले मूळ ग्रंथ वाचले पाहिजेत. बाबासाहेबांनी लिहिलेला ‘शूद्र पूर्वी कोण होते’ हा शिवाजी महाराजांसंबंधी धर्माची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. अलीकडे मराठा-दलित हे एकमेकांचे शत्रू आहेत, असे चित्र उभे केले जात आहे; परंतु राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, केळूस्कर गुरुजी यांचा आणि बाबासाहेबांचा संबंध दोन्ही समाजाने समजून घेतला पाहिजे. ओबीसी समाज आपल्यापासून का दुरावला, याचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. थेट देवा-धर्माबद्दल टोकाची भूमिका न घेता मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने धर्म आणि मंदिराचा आपला संबंध आहे; पण बडव्यांना आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेतली आहे.वक्त्यांच्या भाषणानंतर विजेत्या स्पर्धकांना माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात वाचन, लेखन आणि वक्तृत्वाच्या आधारे सामाजिक परिवर्तन केले. त्यांचे अनुकरण आंबेडकरी समाजातील युवकांनीही करावे, स्पर्धेच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या साहित्य वाचनाची सवय लागावी म्हणून स्पर्धा घेण्यात आली होती. सात राज्यांतील २ हजार ७६५ जणांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६५१ युवकांची परीक्षेसाठी निवड केली होती. शंभर गुणांच्या या परीक्षेला ४०० जण बसले होते. नागपूर, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या चार विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण घेणाऱ्या ४७ जणांची वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात रविवारी दिवसभर ही स्पर्धा झाली. त्यानंतर विजेत्यांची निवड जाहीर केली.

टॅग्स :SocialसामाजिकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर