शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ओबीसी समाजामध्ये जगजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:05 IST

आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देगंगाधर बनबरे : डॉ. आंबेडकर नायक पुरस्कार वितरण समारंभ

औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आज येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ पुस्तकावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नायक- २०१९’ या राज्यस्तरीय वाचन, लेखन व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सायंकाळी संत तुकाराम नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, जीएसटीचे उपायुक्त रवी जोगदंड, आर. के. गायकवाड आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात होते.यावेळी बनबरे आपल्या भाषणात म्हणाले, सर्वांनी अगोदर बाबासाहेबांनी लिहिलेले मूळ ग्रंथ वाचले पाहिजेत. बाबासाहेबांनी लिहिलेला ‘शूद्र पूर्वी कोण होते’ हा शिवाजी महाराजांसंबंधी धर्माची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. अलीकडे मराठा-दलित हे एकमेकांचे शत्रू आहेत, असे चित्र उभे केले जात आहे; परंतु राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, केळूस्कर गुरुजी यांचा आणि बाबासाहेबांचा संबंध दोन्ही समाजाने समजून घेतला पाहिजे. ओबीसी समाज आपल्यापासून का दुरावला, याचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. थेट देवा-धर्माबद्दल टोकाची भूमिका न घेता मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने धर्म आणि मंदिराचा आपला संबंध आहे; पण बडव्यांना आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेतली आहे.वक्त्यांच्या भाषणानंतर विजेत्या स्पर्धकांना माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात वाचन, लेखन आणि वक्तृत्वाच्या आधारे सामाजिक परिवर्तन केले. त्यांचे अनुकरण आंबेडकरी समाजातील युवकांनीही करावे, स्पर्धेच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या साहित्य वाचनाची सवय लागावी म्हणून स्पर्धा घेण्यात आली होती. सात राज्यांतील २ हजार ७६५ जणांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६५१ युवकांची परीक्षेसाठी निवड केली होती. शंभर गुणांच्या या परीक्षेला ४०० जण बसले होते. नागपूर, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या चार विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण घेणाऱ्या ४७ जणांची वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात रविवारी दिवसभर ही स्पर्धा झाली. त्यानंतर विजेत्यांची निवड जाहीर केली.

टॅग्स :SocialसामाजिकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर