शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

मैत्रेयेच्या संचालिका वर्षा सतपाळकर हिस पोलीस करणार अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 18:05 IST

नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा संकपाळ हिच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील कार्यालयामार्फत सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी मैत्रेमध्ये गुंतवणुक केली. नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे.

औरंगाबाद : कमी कालावधीत जास्तीचा मोबदला देण्याचे अमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांना गंडविल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांकडे तीन वर्षापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला. नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा सतपाळकरवर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नाशिक येथील मैत्रेय कंपनीने लाखो लोकांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवायला लावून त्यांना कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे अमिष दाखविले. मल्टी लेवल मार्केटींग पद्धतीने काम करणा-या या कंपनीने हजारो एजंट नियुक्त केले. या एजंटांना वाढिव कमिशन आणि वरिष्ठ पद देण्याचे अमिष दाखवून जास्तीत जास्त  लोकांना गुंतवणुक करायला लावण्याचे टार्गेट दिले जात. एजंटांनीही जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना मैत्रेय मध्ये गुंतवणुक करायला लावले. या कंपनीकडे गुंतवणुक करणा-याच्या विविध प्लॅन होते. विशेष म्हणजे मासिक तत्वावरही कंपनीकडून गुंतवणुक स्विकारली जात. प्रत्येक गुंतवणुकदाराला त्याची पावती आणि एक बॉण्ड मिळत. कंपनीचे उस्मानपुरा परिसरात एक अलिशान कार्यालय आहे. या कार्यालयात मोठा  कर्मचारी वर्गही होता. तीन वर्षापूर्वी हजारो गुंतवणुकदारांना मुदतीनंतरही त्यांचे पैसे मिळत नसल्याने पोलिसांत धाव घेतली. 

उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी तक्रारअर्ज नोंदविलेले आहेत. अशाचप्रकारच्या तक्रारी नाशिक, परभणी, पूर्णा आणि राज्यातील विविध ठिकाणी पोलिसांना प्राप्त झाल्या. नाशिक  पोलिसांनी मैत्रेयच्या संचालिका सतपाळकर यांना अटक केली होती. तेव्हा त्यांनी गुंतवणुकदारांचे सर्व पैसे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली परत देण्याची तयारी न्यायालयासमोर दर्शविली होती. तेव्हा न्यायालयाच्या आदेशाने संयुक्त खाते उघडण्यात आले होते. अशाचप्रकारची कार्यवाही औरंगाबादेत करून गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.

सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारसुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील कार्यालयामार्फत सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी मैत्रेमध्ये गुंतवणुक केली. यातील शेकडो गुंतवणुकदार असे आहेत की, मुदतीनंतर एजंटांच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांना मिळणारी सर्व रक्कम पुन्हा कंपनीत गुंतवली. अशा सर्व लोकांनी पोलिसांत धाव घेतलेली आहे. आर्थिक गुन्हेशाखेकडे या केसची कागदपत्रे  अद्याप आलेली नाही.