शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 20:45 IST

सहव्यवस्थापक संचालकपदी ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी हवा

औरंगाबाद : महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची दीड महिन्यापूर्वी बदली झाल्यानंतर शहरातील महावितरणची सेवा ढेपाळली आहे. शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांच्या तक्रारी ऐकून न घेणे, चुकीची बिले अदा करणे, अभियंते- कर्मचाऱ्यांची मनमानी वाढणे, बदली केलेल्या कामचुकार अभियंते- कर्मचाऱ्यांना पुन्हा शहरात सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देण्याचे प्रकार वाढले आहेत. 

दोन वर्षांपूर्वी महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी ओम प्रकाश बकोरिया यांची नेमणूक झाली. सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कामचुकार अभियंते- कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारला. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला बरीच शिस्त आली होती. दोन वर्षांत शहराच्या वीज वितरण सेवेत आमूलाग्र सुधारणा झाल्या होत्या. आता किरकोळ पावसातही वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणने केलेल्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ महिनाभरातच उघडे पडले. पाऊस नसतानाही अनेक वसाहतींमध्ये रोज रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज ग्राहक यासंबंधी अभियंत्यांना फोन करतात; परंतु अभियंते किंवा कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. याप्रकरणी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी कार्यकारी अभियंत्यास निलंबित केले. मात्र, त्यानंतरही फारशी परिस्थिती सुधारलेली नाही. सातत्याने याठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणने केंद्रीय वीज बिल प्रणाली स्वीकारली आहे. यामुळे अचूक व वेळेवर वीज बिल मिळेल, असा दावा कंपनीने केला होता. मात्र, स्थानिक प्रशासनाने या ग्राहकोपयोगी प्रणालीलाच हरताळ फासला आहे. चुकीचे मीटर रीडिंग अथवा रीडिंग न घेताच ग्राहकांना बिले मिळत आहेत. यावर मीटर रीडिंग एजन्सीवर कडक कारवाई करण्यात महावितरण हयगय करीत आहे. अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर बिल मिळत नाही, त्यामुळे ग्राहकांना लेट पेमेंटचा भुर्दंड बसत आहे. चुकीच्या रीडिंगबाबत महावितरण फेरपडताळणी करण्याचा देखावा करीत आहे. मात्र त्यातूनही ठोस काही निष्पन्न होत नसल्याने ग्राहक संतापले आहेत. 

वरिष्ठांचे नियंत्रण राहिले नाहीबकोरिया यांच्या कार्यप्रणालीमुळे अनेक अभियंत्यांचे हितसंबंध दुखावले गेले. अनेक संघटनांनी त्यांच्या बदलीसाठी जोर लावला होता. अखेर मेमध्ये त्यांची बदली झाली. ही बातमी समजताच काही अभियंत्यांनी दौलताबादजवळील एका हॉटेलमध्ये मोठा जल्लोषही केला होता. त्यात मराठवाड्यातील बऱ्याच वरिष्ठ अभियंत्यांनी हजेरी लावली होती. बदली झाल्यानंतर ते तात्काळ कार्यमुक्त झाले. मात्र, त्यानंतर अभियंते व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचे नियंत्रण राहिलेले नसल्यामुळे ते कुणालाही जुमानत नसल्याचे सध्याचे चित्र अनुभवास येत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादelectricityवीज