शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
3
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
4
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
5
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
6
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
7
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
8
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
9
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
10
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
11
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
12
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
13
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
14
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
15
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
16
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
17
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
18
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
19
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
20
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 20:45 IST

सहव्यवस्थापक संचालकपदी ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी हवा

औरंगाबाद : महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची दीड महिन्यापूर्वी बदली झाल्यानंतर शहरातील महावितरणची सेवा ढेपाळली आहे. शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांच्या तक्रारी ऐकून न घेणे, चुकीची बिले अदा करणे, अभियंते- कर्मचाऱ्यांची मनमानी वाढणे, बदली केलेल्या कामचुकार अभियंते- कर्मचाऱ्यांना पुन्हा शहरात सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देण्याचे प्रकार वाढले आहेत. 

दोन वर्षांपूर्वी महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी ओम प्रकाश बकोरिया यांची नेमणूक झाली. सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कामचुकार अभियंते- कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारला. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला बरीच शिस्त आली होती. दोन वर्षांत शहराच्या वीज वितरण सेवेत आमूलाग्र सुधारणा झाल्या होत्या. आता किरकोळ पावसातही वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणने केलेल्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ महिनाभरातच उघडे पडले. पाऊस नसतानाही अनेक वसाहतींमध्ये रोज रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज ग्राहक यासंबंधी अभियंत्यांना फोन करतात; परंतु अभियंते किंवा कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. याप्रकरणी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी कार्यकारी अभियंत्यास निलंबित केले. मात्र, त्यानंतरही फारशी परिस्थिती सुधारलेली नाही. सातत्याने याठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणने केंद्रीय वीज बिल प्रणाली स्वीकारली आहे. यामुळे अचूक व वेळेवर वीज बिल मिळेल, असा दावा कंपनीने केला होता. मात्र, स्थानिक प्रशासनाने या ग्राहकोपयोगी प्रणालीलाच हरताळ फासला आहे. चुकीचे मीटर रीडिंग अथवा रीडिंग न घेताच ग्राहकांना बिले मिळत आहेत. यावर मीटर रीडिंग एजन्सीवर कडक कारवाई करण्यात महावितरण हयगय करीत आहे. अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर बिल मिळत नाही, त्यामुळे ग्राहकांना लेट पेमेंटचा भुर्दंड बसत आहे. चुकीच्या रीडिंगबाबत महावितरण फेरपडताळणी करण्याचा देखावा करीत आहे. मात्र त्यातूनही ठोस काही निष्पन्न होत नसल्याने ग्राहक संतापले आहेत. 

वरिष्ठांचे नियंत्रण राहिले नाहीबकोरिया यांच्या कार्यप्रणालीमुळे अनेक अभियंत्यांचे हितसंबंध दुखावले गेले. अनेक संघटनांनी त्यांच्या बदलीसाठी जोर लावला होता. अखेर मेमध्ये त्यांची बदली झाली. ही बातमी समजताच काही अभियंत्यांनी दौलताबादजवळील एका हॉटेलमध्ये मोठा जल्लोषही केला होता. त्यात मराठवाड्यातील बऱ्याच वरिष्ठ अभियंत्यांनी हजेरी लावली होती. बदली झाल्यानंतर ते तात्काळ कार्यमुक्त झाले. मात्र, त्यानंतर अभियंते व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचे नियंत्रण राहिलेले नसल्यामुळे ते कुणालाही जुमानत नसल्याचे सध्याचे चित्र अनुभवास येत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादelectricityवीज