शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण देणार दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:18 IST

महसुली तूट भरून काढण्यासाठी महावितरण कंपनी ही सर्वसामान्य वीज ग्राहकांना १५ टक्के दरवाढीचा ‘शॉक’ देणार आहे. यासंदर्भात महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला असून, त्यावर वीज ग्राहकांची भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाने महसूल विभागाच्या मुख्यालयी जनसुनवाई आयोजित केली आहे. औरंगाबादेत ही सुनावणी ११ आॅगस्ट रोजी होणार आहे.

ठळक मुद्दे१५ टक्के दरवाढ प्रस्तावित : विद्युत नियामक आयोग जाणून घेणार ग्राहकांची मते

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महसुली तूट भरून काढण्यासाठी महावितरण कंपनी ही सर्वसामान्य वीज ग्राहकांना १५ टक्के दरवाढीचा ‘शॉक’ देणार आहे. यासंदर्भात महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला असून, त्यावर वीज ग्राहकांची भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाने महसूल विभागाच्या मुख्यालयी जनसुनवाई आयोजित केली आहे. औरंगाबादेत ही सुनावणी ११ आॅगस्ट रोजी होणार आहे.यासंदर्भात महावितरणने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ७ रुपये ७४ पैसे प्रतियुनिट अशी दरवाढ विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्तावित करण्यात आली. यावर महावितरणचे म्हणणे आहे की, प्रस्तावित दरवाढ ही विद्युत नियामक आयोगाने यापूर्वी मंजूर केलेल्या ६ रुपये ७१ पैसे (प्रचलित दर) या सरासरी पुरवठा आकाराच्या तुलनेत केवळ १५ टक्के एवढी आहे. पुढील २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी मात्र, महावितरणने कोणतीही दरवाढ प्रस्तावित केलेली नाही.महावितरणचा स्थिर खर्च हा स्थिर आकारातूनच भागविण्यात यावा, असे आयोगाचे धोरण आहे. दुसरीकडे ऊर्जा मंत्रालयाच्या सूचना आहेत की, तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत वीज वितरण कंपनीच्या स्थिर खर्चाच्या ७५ ते १०० टक्के रकमेची वसुली ही स्थिर आकाराच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने करावी.आयोगाने २००८ मध्ये दिलेल्या आदेशान्वये भारनियमनाच्या कारणास्तव महावितरणच्या ग्राहकांचे स्थिर आकार अर्ध्यापर्यंत कमी करण्यात आले होते. परंतु २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून महावितरणकडे मुबलक वीज उपलब्ध असूनही त्या प्रमाणात स्थिर आकार प्रदान करण्यात आलेले नाहीत. सध्या महावितरणचा स्थिर खर्च हा एकूण खर्चाच्या ५५ टक्के असून या आकारातून येणारा महसूल हा एकूण महसुलाच्या केवळ १५ टक्के आहे. प्रस्तावित स्थिर आकार वाढीतून येणारा महसूलही एकूण महसुलाच्या फक्त २४ टक्क्यांपर्यंतच होणार आहे. महावितरणने ३०० युनिटपर्यंतच्या वीज वापरावर १७० रुपये प्रतिमहिना एवढाच स्थिर आकार प्रस्तावित केला असून, तो इतर राज्यांच्या तुलनेत कमीच आहे.आयोगाच्या (३ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या) आदेशाप्रमाणे राज्यात उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्याचा औद्योगिक वीजदर इतर राज्यांतील दरांच्या समतुल्य आहे. महाराष्ट्रातील कृषी ग्राहकांचे वीजदर हे सरासरी वीजपुरवठा आकारापेक्षा कमी असल्याने ‘क्रॉस सबसिडी’ सर्वात जास्त आहे. राष्ट्रीय वीजदर धोरण २०१६ मधील तरतुदीनुसार ‘क्रॉस सबसिडी’चा भार कमी करण्यासाठी कृषी वर्गवारीच्या दरात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.महावितरण कंपनी ही मीटरिंग व बिलिंगसह विविध क्षेत्रात कठोर परिश्रम करीत असून, वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यातूनच २००६-०७ या वर्षातील सुरुवातीची ३०.२ टक्के एवढी असलेली वितरण हानी २०१७-१८ मध्ये १३.९२ टक्के एवढी कमी झाली आहे. वीज खर्च कमी होऊन महसुलात वाढ व्हावी व परिणामी ग्राहकांना फायदा व्हावा, यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे, असे समर्थनही महावितरणने केले आहे.या ठिकाणी होतील आयोगाच्या सुनावणीअमरावती विभागासाठी अमरावती विभागीय आयुक्तालयात ६ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता.नागपूर विभागासाठी नागपूर येथे वानामती हॉलमध्ये ७ आॅगस्ट रोजी सकाळी १० वा.पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे येथे कौन्सिल हॉलमध्ये ९ आॅगस्ट रोजी सकाळी १० वा.मराठवाडा विभागासाठी औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयात ११ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादelectricityवीज