शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

'एनएसडी'च्या धर्तीवर 'महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामाची' होणार स्थापना : अमित देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 18:49 IST

महाराष्ट्र स्कुल आॅफ ड्रामाची स्थापना करण्यात येत असून यासाठी कलावंतांनी सूचना कराव्यात

ठळक मुद्देराज्यात ५ बालनाट्य कला केंद्र सुरू करणार 

लातूर : राज्यात दहा ठिकाणी बाल नाट्य कला केंद्र सुरू आहेत़ आणखीन नवीन ५ केंद्र सुरू करण्यात येत असून त्यातील एक केंद्र लातूर येथे सुरू करण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी येथे केली़ दरम्यान, नॅशनल स्कुल आॅफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कुल आॅफ ड्रामाची स्थापना करण्यात येत असून यासाठी कलावंतांनी सूचना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले़ 

सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने लातूर येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित १७ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, प्रदीप पाटील खंडापूरकर, ज्येष्ठ रंगकर्मी गिरीष सहदेव, अ‍ॅड़ शैलेश गोजमगुंडे, मनोज पाटील, परिक्षक अरूंधती भालेराव, वीणा लोकूर, शंकर घोरपडे, प्रकाश पारखी, एकनाथ आव्हाड, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांची प्रमुख  उपस्थिती होती़ 

यावेळी सांस्कृतिक मंत्री देशमुख म्हणाले, जिल्हा, तालुका स्तरावर कलावंतांना पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे़ यासाठी नॅशनल स्कुल आॅफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कुल आॅफ ड्रामा सुरू करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ याठिकाणी बालकलाकारांना तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल, तसेच त्यांना नाट्य, चित्रपट निर्मात्यांकडे संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल़ स्पर्धेत ३५० नाटके सादर झाली, यातील सहभागी कलाकरांना व्यक्तीगत प्रमाणपत्र देण्यात येईल़ राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा घेण्याचा उपक्रम तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुरू केला़ आज लातूरला अंतिम फेरी होत आहे, याचा आंनद होत असल्याचे त्यांनी सांगितले़

प्रारंभी बाल कलाकार स्वंयम शिंदे, सिध्दी देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले़ महापौर विक्रांत गोजमगुंडे, गिरीष सहदेव यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक बिभीषण चवरे यांनी केले़ सूत्रसंचालन हास्य कलाकार बालाजी सूळ यांनी केले़ यावेळी अहमदनगर येथील आराधना ग्रुपच्या वतीने वाणरायण ही नाटीका सादर करण्यात आली़ यातून वाढत्या वृक्षतोडीमुळे वन्यजिवांना होणारा धोका, मानवी वस्तीत वाढलेला वावर यावर प्रकाश टाकला़ 

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुखMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकारlaturलातूर