शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Maharashtra Election 2019 : १५ तासांत राजू शिंदेंची २० कि.मी. पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 17:21 IST

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा दिनक्रम 

ठळक मुद्देमतदारांच्या भेटीगाठी; भुकेची, थकव्याची तमा नाही

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने दिवसभरात फक्त आणि फक्त मतदारसंघातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह गल्लोगल्ली जाऊन  प्रचारफेरी, पदयात्रा, बैठका, सभेतून रात्री उशिरापर्यंत मतदारांशी संवाद हा आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा दिनक्रम. भूक, तहान आणि थकवा विसरून प्रचारासाठी १५ तास देऊन सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मतदारसंघाचा परिसर अक्षरश: पिंजून काढतात. विशेष म्हणजे पदयात्रेतून दिवसभरात जवळपास २० कि.मी.पेक्षा अधिक अंतर पायी फिरतात.

‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरुवारी राजू शिंदे यांच्यासमवेत संपूर्ण दिवस घालविला. या दिवसभरात शिंदे यांची प्रचाराची रणनीती जाणून घेतली. सकाळी ६ वाजेपासून त्यांचा दिनक्रम सुरू झाला.  सकाळपासून त्यांचा मोबाईल सतत वाजत होता. कार्यकर्त्यांचे फोन येत होते. नियोजनाप्रमाणे सकाळी ७ वाजता प्रचारासाठी ते घराबाहेर पडणार होते. त्यामुळे तोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते घराबाहेर पोहोचले होते. प्रारंभी काही वेळ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्नी माया शिंदे यांनी घराबाहेर पडताना त्यांचे औक्षण केले. औक्षण करतानाही फोनवरून ते संवाद साधत होते. त्यातून त्यांच्या व्यस्त दिनक्रमाची काहीशी झलकच पाहायला मिळाली.

निवासस्थानाहून रवाना झाल्यानंतर राजू शिंदे यांनी बीड बायपासवरील हिवाळे लॉन्स येथे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भेट घेतली. काही वेळ चर्चा केल्यानंतर बीड बायपास, शिवाजीनगरमार्गे राजू शिंदे सूतगिरणी चौकात पोहोचले. येथे उद्योजकांसोबत बैठक झाली. उद्योजकांशी विविध मुद्यांवर संवाद साधला. हा संवाद साधेपर्यंत सकाळचे १० वाजून गेले होते. यानंतर नियोजनाप्रमाणे ११ वाजता उस्मानपुरा, पीरबाजार येथील पदयात्रेसाठी ते रवाना झाले.याठिकाणी शिंदे यांचे आगमन होताच ढोल-ताशा वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. याठिकाणी शेकडो नागरिक, महिला, कार्यकर्ते जमले होते. प्रारंभी राजू शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याठिकाणी शिंदे यांनी सिद्धांत गाडे यांची भेट घेतली.

त्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली. पीरबाजार, फुलेनगर, एकनाथनगर, मिलिंदनगर, छोटा मुरलीधरनगर परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिक पुष्पहार घेऊन उभे होते. औक्षण करण्यासाठी ताट घेऊन घराघरांसमोर महिला उभ्या होत्या. राजू शिंदे पोहोचताच उत्साहात स्वागत करण्यात येत होते. महिलांकडून ओवळले जात होते. तब्बल २ तास पदयात्रा चालली. दुपारचे १२ वाजून गेले. ऊन चटकत होते. पदयात्रेत अनेक नागरिक  ‘पाण्याचा प्रश्न सोडवा’ अशी साद घालत होते. यावेळी कृष्णा बनकर, बंडू कांबळे, प्रकाश निकाळजे, मधुकर चव्हाण, विजय भुईगळ, दिनकर ओंकार आदी उपस्थित होते.

उस्मानपुरा परिसरातील पदयात्रेनंतर दुपारी १ वाजता राजू शिंदे छावणीतील पदयात्रेसाठी रवाना झाले. छावणी, गवळीपुरा येथील साईबाबा मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. तोफखाना, दानाबाजार, पटेल चौक, सुभाष पेठ  भागातून ही पदयात्रा काढण्यात आली. पटेल चौक येथे नागरिकांनी राजू शिंदे यांच्यावर पुप्षवृष्टी केली. पदयात्रेप्रसंगी विजय चौधरी, नीलेश धारकर, पाशा खान, सनी गारोळ, मयंक पांडे, रमेश लिंगायत, एम. ए. अझहर, ओमकार सिंग आदी उपस्थित होते.  

शिवाजीनगर रेल्वेगेटवर १९ मिनिटे अडकलेछत्रपतीनगर येथील सभेला पोहोचण्यापूर्वी शिवाजीनगर रेल्वेगेटवर तब्बल १९ मिनिटे वाहनांच्या गर्दीत अडकण्याची वेळ आली. रेल्वेगेटवर थांबल्यानंतर अवघ्या ७ मिनिटांत रेल्वे रवाना झाली. मात्र, वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढून बीड बायपासवर पोहोचेपर्यंत १९ मिनिटे लागली. त्यानंतर शिंदे सभास्थळी पोहोचले. सभेला विनायक हिवाळे पाटील, अप्पासाहेब हिवाळे, अनिल चोरडिया, अभिषेक देशमुख, यशवंत कदम, राजू काका नरवडे आदी उपस्थित होते. ४सभा सुरू असताना एकेकाचे मनोगत सुरू होते. यात काहींनी शिवाजीनगर रेल्वेगेटवरील समस्येचा मुद्दाही उपस्थित केला. सर्वांचे मनोगत होत असताना राजू शिंदे अनेक बाबी टिपून घेत होते. सभेच्या मंचावर पत्नी माया शिंदे यांचीही उपस्थिती होती. याठिकाणी राजू शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सभा संपेपर्यंत ९.३० वाजून गेले होते. 

१०२ वर्षांच्या आजींनी केले स्वागतमिलिंदनगर येथील पदयात्रेत १०२ वर्षांच्या सुपडाबाई वाकेकर यांनी राजू शिंदे यांचे केलेले स्वागत पाहण्यात प्रत्येक जण हरखून गेला. राजू शिंदे यांचे आगमन होताच या आजींनी अगदी मायेने त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरविला आणि आशीर्वाद दिला. 

एक कप चहा फक्त...छावणीनंतर दुपारी २.५० वाजता राजू शिंदे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले. येथे त्यांनी जिल्हा वकील संघाशी चर्चा केली. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणी, सचिव डॉ. संदीप शिरसाट, अ‍ॅड. संजय भिंगारदेव, अ‍ॅड. दीपक म्हस्के, अ‍ॅड. आर. के. मोकळे, अ‍ॅड. पी. एस. भालेराव, अ‍ॅड. व्ही. एस. वर्धे आदी उपस्थित होते. सकाळी बाहेर पडलेल्या राजू शिंदे यांनी वकिलांसोबत चर्चा करताना चहा घेतला. त्यानंतर वेगवेगळ्या कक्षात वकिलांची शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी अ‍ॅड. बी. एच. गायकवाड यांचीही भेट झाली.

फाटलेला विकास शिवायचा...- जिल्हा सत्र न्यायालयातून रवाना झाल्यानंतर राजू शिंदे दुपारी ४.१० वाजता हनुमाननगर येथे पोहोचले. याठिकाणी ओम चव्हाण यांच्या निवासस्थानी नागरिकांसोबत बैठक झाली. - यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करताना राजू शिंदे यांनी सोफ्याऐवजी नागरिकांसोबत सतरंजीवरच बसणे पसंत केले. ‘जो विकास फाटलेला आहे, तो आता शिवण्याची वेळ आली आहे’, असे ते म्हणाले. यावेळी सचिन जैन, अलीम पटेल, घनश्याम कुमावत, राजू पठाण, गणेश गोरे आदी उपस्थित होते. - यानंतर त्यांनी देवळाईतील हरिप्रसादनगरमधील नागरिकांशी संवाद साधला. येथून ते थेट  बालाजीनगर, पंचशीलनगर येथील पदयात्रेसाठी पोहोचले. तोपर्यंत सायंकाळचे ५.१५ वाजले होते. प्रारंभी नागरिकांशी संवाद साधून परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. - यावेळी विजय मगरे, जगन्नाथ कोºहाळे, विजय काळे आदी उपस्थित होते. पदयात्रा संपेपर्यंत अंधार पडला होता. सायंकाळी ७ वाजता साताऱ्यातील छत्रपतीनगर येथील जाहीर सभेसाठी राजू शिंदे रवाना झाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमAurangabadऔरंगाबाद