शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Maharashtra Election 2019 : राजकारणाने दुरावलेल्या ‘पिया- किशू’ना एकत्र आणले ‘कॉमन फ्रेंड’नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 16:29 IST

युतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ अर्ज मागे घेतल्याचे तनवाणीने जाहीर केले

ठळक मुद्देउमेदवारी मिळाल्यानंतर जैस्वाल यांनीही मैत्रीसाठी दोन पावले पुढे जाण्याचा निर्णय घेतला.तनवाणी यांनीही मागील कटुता बाजूला सारून जैस्वाल यांना प्रतिसाद दिला.

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खा. प्रदीप जैस्वाल आणि भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची मैत्री तब्बल चार दशकांपासून आहे. परंतु राजकारणातून मागील पाच-सात वर्षांमध्ये या मैत्रीत मोठी दरी निर्माण झाली होती. या जिवलग मित्रांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या काही कॉमन मित्रांनी पुढाकार घेतला. दोघांच्या मनातील वितुष्ट संपविण्यात त्यांना यश आले. रविवारी मध्यरात्रीपासून जैस्वाल-तनवाणी यांनी स्वत:हून मैत्रीसाठी दोन पावले पुढे येण्याचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम सोमवारी औरंगाबादकरांना पाहायला मिळाले. तनवाणी यांनी जैस्वाल यांना सोबत नेऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ४० वर्षांची मैत्री पुन्हा बहरली.

पिया आणि किशू यांची मैत्री सर्वश्रुत आहे. परंतु या मैत्रीत लहानसहान कारणांवरून दुरावा आला. सेनेतून भाजपमध्ये गेलेल्या तनवाणी यांनी जैस्वालविरुद्ध २०१४ मध्ये औरंगाबाद मध्यची निवडणूक लढविली. दोघेही पराभूत झाले; परंतु कॉमन मित्रांसोबत वर्षातून एकदा तिरुपतीला दर्शनासाठी जाण्याचा पायंडा दोघांनीही पाडला. मात्र, संवादातील आपुलकी संपली होती. एखाद्या कार्यक्रमात आमने सामने आले तर हस्तांदोलन होत असे. यंदा शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून जैस्वाल यांना उमेदवारी मिळाली. तनवाणी यांनी त्वरित बंडाचा झेंडा उभारला. दोघांच्या झुंजीत कोंडी होणार हे दोघांच्या कॉमन मित्रांनी हेरले. त्यांनी मागील दोन-तीन दिवसांमध्ये दोघांच्या मनातील कटुता दूर करण्याचे काम केले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर तनवाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ मी अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी नमूद केले. मला कोणाचाही फोन आलेला नाही. हा माझा निर्णय असल्याचे ते म्हणाले.

रविवारी रात्री काय झाले?उमेदवारी मिळाल्यानंतर जैस्वाल यांनीही मैत्रीसाठी दोन पावले पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तनवाणी यांनीही मागील कटुता बाजूला सारून जैस्वाल यांना प्रतिसाद दिला. दोघांचे रात्री फोनवर बोलणे झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. सोमवारी सकाळी मनोमिलन झाले. दुपारी २.३० वाजता एकाच वाहनात दोघेही मित्र शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात दाखल झाले. क्षणार्धात तनवाणी यांनी मित्रासाठी अर्ज मागे घेतला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यShiv SenaशिवसेनाBJPभाजपा