शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Maharashtra Election 2019 : माझी लढत एमआयएमशी; भाजपचीही भक्कम साथ : संजय शिरसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 19:32 IST

Maharashtra Election 2019 : मागील दहा वर्षांत मतदारसंघातील जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे.

औरंगाबाद : मागील दहा वर्षांत मतदारसंघातील जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे. लोकसभा निवडणुकीपासून एमआयएमचे मोठे आव्हान असून, यंदा औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात माझी लढत एमआयएमच्या उमेदवाराशी होणार असल्याचे मत शिवसेनेचे उमेदवार आ. संजय शिरसाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

औरंगाबाद शहरावर अनेक वर्षांपासून शिवसेनेचा वरचष्मा आहे. लोकसभा निवडणुकीत काही चुकांमुळे आमचे उमेदवार चंद्रकांत खैरे पराभूत झाले. मात्र या पराभवाची सल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. कोणत्याही परिस्थितीत फाटाफुटीतून एमआयएमचा उमेदवार विजयी होणार नाही, याचा निश्चय शिवसेना- भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असून, मी एमआयएमच्या उमेदवाराचा सामना करण्यास खंबीर आहे. या मतदारसंघात अपक्ष म्हणून काही जण निवडणुकीच्या मैदानात असले तरी मतदारांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. काहीजण जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र जनता त्यांना थारा देणार नाही.कार्यकर्ता हा शिवसेनेचा ‘बेस’ आहे आणि या कार्यकर्त्याचे मूळ संघर्षात आहे. शिवसेनाप्रमुखांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते नेते झाले. काम करताना सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण ठेवणे हीच आम्हाला शिवसेनाप्रमुख आणि आता पक्षप्रमुखांनी दिलेली प्रेरणा आहे. नागरिकांची सुरक्षा आणि संघर्षाबरोबरच विकास हा मुद्दा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असे आ. शिरसाट म्हणाले. माझ्या मतदारसंघातील नागरिकांना उत्तम जाण आहे. यामुळे मला विजयाची खात्री आहे, असे ते म्हणाले. 

कार्यकर्ताच प्रचार करतोयआपल्या प्रचाराच्या पद्धतीविषयी आ. शिरसाट यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघात कार्यकर्ताच प्रचार करतोय. तोच लोकांच्या घरी जातोय. त्यांना भेटतोय. हे कार्यकर्ते म्हणजे सामान्य शिवसैनिक असेल, शाखाप्रमुख असेल, पदाधिकारी असेल, नगरसेवक असेल किंवा आणखी मोठा नेता असेल. सर्व जण झोकून प्रचार करीत आहेत. या प्रचारामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नगरसेवकही भक्कमपणे माझ्या पाठीशी आहेत. आपणच आमदार आहोत, या भूमिकेतून सर्व कार्यकर्ते काम करीत आहेत. 

मी केलेली कामे गोलवाडी रस्त्याचे रुंदीकरण. याठिकाणी अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. हे लक्षात घेऊन या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले. वाळूज महानगरासह बजाजनगरात रस्ते तयार केले. शहरासाठी नवी पाण्याची योजना युती सरकारने मंजूर केलीच आहे. यामध्ये सातारा आणि देवळाईचा समावेश केला. अपघातापासून मुक्ती मिळावी म्हणून बीड बायपासच्या रुंदीकरणासाठी कोट्यवधींचा निधी आणला. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या ंिसमेंट रस्त्याचे काम मार्गी लावले.विविध वॉर्डांत रस्ते आणि जलवाहिन्यांची सोय केली.

माझे व्हिजनसातारा, देवळाईसाठी राज्य सरकारकडून विशेष पॅकेज मिळविणे, तसेच या परिसरातील म्हाडा कॉलनीसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे.गोलवाडी परिसरात वसलेल्या नवीन वाळूज महानगराचे काम पूर्ण करणे.गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलाला आंतरराष्टÑीय दर्जाचे बनविण्यासाठी आराखडा.लघु उद्योजकांसाठी वाळूज महानगरात वेगळे हब तयार करणे.ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह उभारणे.स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मोफत प्रशिक्षण केंद्र उभारणे.

शिवसैनिकांनी गाफील राहू नयेवाळूज महानगर : जिल्ह्यात एमआयएमच्या रूपाने पुन्हा रझाकारी येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नये. आपली खरी लढत ही एमआयएमशी आहे, असे औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे उमेदवार आ. संजय शिरसाट यांनी गुरुवारी (दि.१७) बजाजनगर येथे सभेत सांगितले. यावेळी माजी महापौर विकास जैन, भाजपचे माजी सभापती गजानन बारवाल, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, विजय वाघचौरे, हनुमान भोंडवे, रामचंद्र कसुरे आदी उपस्थित होते. या सभेत बारवाल, मते, भोंडवे आदींनी आ. शिरसाट यांनी बजाजनगरचा कायापालट केल्याचे सांगितले. 

मदतीला धावून येतो, तो खरा शिवसैनिक. हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश शिवसैनिकाच्या नसानसात भिनला आहे. या बळावरच या शहरात शिवसेना अग्रक्रमावर आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमShiv Senaशिवसेना