शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Maharashtra Election 2019 : धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय...! हर्षवर्धन प्रकरणात शिवसेनेची झाली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 18:50 IST

Aurangabad Election 2019 : उत्तर दिल्यास जाधव यांना सामाजिक लाभ होईल, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्याचे पडसाद वेगळ्या प्रकारे उमटतील

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केल्यामुळे शिवसेना संतापली आहे; परंतु संतापापलीकडे शिवसेनेला सध्या काहीही करता येत नाही. जाधव यांना जशास तसे उत्तर दिल्यास त्याचा फायदा सेनेऐवजी जाधव यांनाच होईल. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्याचे पडसाद वेगळ्या प्रकारे उमटतील, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यामुळे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’अशा प्रकारची कोंडी शिवसेनेची जाधव यांच्या प्रकरणात होऊन बसली आहे. 

जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेला आव्हान दिले. लोकसभेच्या निकालाची कारणमीमांसा करताना काय घडले हे सर्वपरिचित आहे. लोकसभेत शिवसेनेच्या पराभवाचे शल्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातून जाण्यास तयार नाही. त्यांनी कन्नड आणि औरंगाबादमध्ये १० आॅक्टोबरच्या सभेत जाधव यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. येथील भगवा खाली उतरण्यास जाधव जबाबदार असल्याचा हल्ला ठाकरे यांनी चढविला. त्या टीकेचे उत्तर देताना जाधव यांनी कन्नडमधील एका प्रचार सभेत ठाकरेंबाबत खालचे शब्द वापरले. यातूनच शिवसेनाविरुद्ध जाधव असे चित्र उभे राहिले आहे. बुधवारी रात्री जाधव यांच्या घरावर हल्लादेखील याच प्रकरणातून झाला. 

शिवसेनेच्या औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील दिल्या. हे सगळे झाले तरी शिवसेना जाधव यांना थेट उत्तर देऊ शकत नाही. तसे उत्तर दिल्यास जाधव यांना सामाजिक लाभ होईल, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यामुळे इतर मतदारसंघातदेखील वेगळाच संदेश जाईल. परिणामी सबुरीच्या भूमिकेतून शिवसेना या प्रकरणाकडे सध्या तरी पाहत आहे.

Maharashtra Election 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पाच वर्षे जमलेच नाहीमागील ५ वर्षे जाधव यांनी कन्नड मतदारसंघात शिवसेनेकडून काम केले; परंतु ते काम करीत असताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यात फारसे सख्ख्य राहिले नाही. मतदारसंघात खैरे लुडबुड करीत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला. त्यातूनच बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीत जाधव यांनी शिवसेनेच्या विरोधात जाऊन काम केले. स्वत:चे पॅनल उभे करून त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले. कालांतराने त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा पक्ष स्थापन केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kannad-acकन्नडHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019