शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Maharashtra Election 2019 : धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय...! हर्षवर्धन प्रकरणात शिवसेनेची झाली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 18:50 IST

Aurangabad Election 2019 : उत्तर दिल्यास जाधव यांना सामाजिक लाभ होईल, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्याचे पडसाद वेगळ्या प्रकारे उमटतील

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केल्यामुळे शिवसेना संतापली आहे; परंतु संतापापलीकडे शिवसेनेला सध्या काहीही करता येत नाही. जाधव यांना जशास तसे उत्तर दिल्यास त्याचा फायदा सेनेऐवजी जाधव यांनाच होईल. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्याचे पडसाद वेगळ्या प्रकारे उमटतील, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यामुळे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’अशा प्रकारची कोंडी शिवसेनेची जाधव यांच्या प्रकरणात होऊन बसली आहे. 

जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेला आव्हान दिले. लोकसभेच्या निकालाची कारणमीमांसा करताना काय घडले हे सर्वपरिचित आहे. लोकसभेत शिवसेनेच्या पराभवाचे शल्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातून जाण्यास तयार नाही. त्यांनी कन्नड आणि औरंगाबादमध्ये १० आॅक्टोबरच्या सभेत जाधव यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. येथील भगवा खाली उतरण्यास जाधव जबाबदार असल्याचा हल्ला ठाकरे यांनी चढविला. त्या टीकेचे उत्तर देताना जाधव यांनी कन्नडमधील एका प्रचार सभेत ठाकरेंबाबत खालचे शब्द वापरले. यातूनच शिवसेनाविरुद्ध जाधव असे चित्र उभे राहिले आहे. बुधवारी रात्री जाधव यांच्या घरावर हल्लादेखील याच प्रकरणातून झाला. 

शिवसेनेच्या औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील दिल्या. हे सगळे झाले तरी शिवसेना जाधव यांना थेट उत्तर देऊ शकत नाही. तसे उत्तर दिल्यास जाधव यांना सामाजिक लाभ होईल, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यामुळे इतर मतदारसंघातदेखील वेगळाच संदेश जाईल. परिणामी सबुरीच्या भूमिकेतून शिवसेना या प्रकरणाकडे सध्या तरी पाहत आहे.

Maharashtra Election 2019 : हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पाच वर्षे जमलेच नाहीमागील ५ वर्षे जाधव यांनी कन्नड मतदारसंघात शिवसेनेकडून काम केले; परंतु ते काम करीत असताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यात फारसे सख्ख्य राहिले नाही. मतदारसंघात खैरे लुडबुड करीत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला. त्यातूनच बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीत जाधव यांनी शिवसेनेच्या विरोधात जाऊन काम केले. स्वत:चे पॅनल उभे करून त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले. कालांतराने त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा पक्ष स्थापन केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kannad-acकन्नडHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019