शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गुंठेवारी क्षेत्राचा विकास, पाणी, रोजगार आणि उद्योगाला प्राधान्य : अतुल सावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 15:08 IST

 युवकांसाठी एक अद्ययावत केंद्र उभारणार; सर्व समाजघटकांसाठी काम करणार

ठळक मुद्देशहराला रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढण्यासाठी प्रयत्न करणार. नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांच्या आत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न. माझी पुन्हा एकदा एमआयएमशी लढत होणार आहे.

- नजीर शेख  

औरंगाबाद : मागील पाच वर्षांत आमदार म्हणून आणि अल्पकाळ मिळालेल्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत मी शहरातील नागरिकांसाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळेच मला पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाची पक्षसंघटना, शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची साथ या बळावर मी पुन्हा विजयी होईन, असा दावा भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार अतुल सावे यांनी केला आहे. 

‘लोकमत’शी संवाद साधताना त्यांनी मागील आणि भविष्यातील पाच वर्षांच्या कामाची रूपरेषाच मांडली. सावे म्हणाले, भारतीय जनता पक्षाची बूथ यंत्रणा, शक्तिकेंद्र या माध्यमातून एक सक्षम प्रचार यंत्रणा आहे. ती यंत्रणा माझ्या मतदारसंघात राबत आहे. याशिवाय शिवसेनेचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते माझ्या प्रचारात सक्रिय आहे. बूथप्रमुखांमार्फत पक्षाची कामे आणि ध्येयधोरणे नागरिकांपर्यंत पोहोचली आहेत. याशिवाय उज्ज्वला गॅस योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रा लोन आणि कौशल्य विकास योजनेच्या लाभार्थ्यांना भेटून त्यांना इतर नागरिकांना पक्षासाठी मतदान करावे, असे आवाहन करीत आहोत. याशिवाय ग्रामीण भागात शेततळी, विहिरी यांचे लाभार्थी मात्र जे शहरात राहतात अशांनाही संपर्क करून सक्रिय करीत आहोत. माझ्या प्रचारात युवक, युवती सर्व वयोगटातील आणि समाजातील व्यक्ती कार्यरत आहेत. 

वैयक्तिकरीत्या मी पदयात्रा, कॉर्नर बैठका आणि नागरिकांच्या भेटी तसेच युवकांशी आणि ज्येष्ठांशी संवाद या पद्धतीने प्रचार करीत आहे. हा संवाद साधताना मी नागरिकांचे प्रश्नही समजून घेत आहे. औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ ४० टक्के गुंठेवारी वसाहतींचा आहे. उच्चभ्रू वस्ती तसेच मध्यमवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाचीही मोठी संख्या माझ्या मतदारसंघात आहे. या सर्वांसाठी मला काम करावयाचे आहे आणि या सर्वांचा मला पाठिंबाही मिळत असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले.   

शहराचा पाण्याचा प्रश्न काही कारणांमुळे मार्गी लागलेला नव्हता, असे सांगून अतुल सावे म्हणाले, आता नव्याने १३०० कोटी रुपयांची योजना मंजूर झाली असून, त्याचे काम जीवन विकास प्राधिकरणामार्फत होणार आहे. या कामाची निविदाही निघाली आहे. ही योजना राबविण्यासाठी मी अगदी रात्री १ वाजता मुख्यमंत्री बंगल्यावर जाऊन त्यांची सही आणली आहे. मंत्रिपद मिळाल्यावर स्वागत, सत्कार न स्वीकारता नव्या जलवाहिनीसंदर्भात थेट नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसेकर यांना भेटायला गेलो. विभागीय आयुक्त आणि मनपा आयुक्तांची बैठक लावून सर्व अडथळे दूर करून या योजनेचा ५०              दिवसांचा ‘बार चार्ट’ तयार केला. जे करायचे ते मनापासून अशी माझी कामाची पद्धत आहे. मागील पाच वर्षांच्या काळात गुंठेवारी भागासाठी ५० टक्के कामे केली. येणाऱ्या काही वर्षांत उरलेली ५० टक्के कामे पूर्ण करण्याचा            मानस आहे. उद्योगांच्या ‘स्टॅम्प ड्यूटी’चा प्रश्नही मार्गी लावला आहे. आतापर्यंत एकूण १२४ कोटींचे व्हाईट टॉपिंगचे रस्ते मंजूर करवून आणले आहेत. मतदारसंघातील १६ रस्ते व्हाईट टॉपिंगचे तयार केले. यामध्ये माझ्या मतदारसंघासह शहरातील इतरही मतदारसंघ आहेत. 

लढत एमआयएमशीचमाझी पुन्हा एकदा एमआयएमशी लढत होणार आहे. आमदार म्हणून, तसेच अल्पसंख्याक विभागाचा राज्यमंत्री असल्याने मी अल्पसंख्याक समाजासाठीही काम केले आहे. उर्दू अकादमीचा राज्याचा कार्यक्रम मी या शहरात आणला. मला सर्व समाजासाठी काम करावयाचे आहे. एमआयएमच्या उमेदवाराबद्दल मला काहीच म्हणावयाचे नाही. मला मतदारांचा पाठिंबा आहे, एवढेच मी म्हणू शकतो. 

आमदार म्हणून आणि मंत्रीपदाच्या अल्पकाळात केलेली कामे - गुंठेवारी भागातील अनेक वसाहतींमध्ये पाणी, ड्रेनेज आणि अंतर्गत रस्त्यांची सुविधा निर्माण केली. गुंठेवारी भागात सध्या २५० कोटी रुपयांची कामे चालू आहेत.- मतदारसंघात मोठ्या संख्येने रस्त्यांची कामे केली. आधी २४ कोटी आणि नंतर १०० कोटी रुपये मंजूर करवून आणले. आणखी शंभर कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. - ग्रामपंचायत आणि उद्योगांमध्ये कर वसूल करण्यावरून वाद होता, तो प्रश्न मिटविण्यामध्ये यश आले. - राज्यातील सर्वात मोठी औरंगाबाद शहरासाठी १३०० कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा मंजूर करवून आणली आणि त्याचे कामही मार्गी लावले. - उद्योग क्षेत्रात अत्यंत कमी काळात ३३०० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली. - औरंगाबादहून दिल्ली, जयपूर आणि मुंबईसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. - जातीपातीचा विचार न करता मुख्यमंत्री सहायता निधीतून तसेच आरोग्य शिबिरे घेऊन सामान्य मतदारांची आरोग्यविषयक सेवा केली. 

माझे व्हिजन- औरंगाबाद हे शहर राज्याची पर्यटन राजधानी आहे. या शहराला रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढण्यासाठी प्रयत्न करणार.

- पर्यटनाशी संबंधित शहरातील सर्व घटकांची एक समन्वय समिती स्थापन करणार. - नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांच्या आत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न. - गुंठेवारी भागातील नागरिकांची घरे नियमितीकरण आणि रस्ते, पाणी, ड्रेनेजची सुविधा निर्माण करण्यावर भर.- आगामी काळात औद्योगिक क्षेत्रात पाच ते सहा नवे उद्योग आणणार. तसेच दोन आयटी पार्क आणण्यासाठी प्रयत्न करणार.- आगामी पाच वर्षांत किमान १५ हजार तरुणांना रोजगार आणि नोकरीची संधी उपलब्ध करणे.- युवक आणि विद्यार्थी यांना विविध प्रकारच्या मार्गदर्शनासाठी मतदारसंघात एक अद्ययावत केंद्र उभारणे. - मतदारसंघात अल्पसंख्याक कौशल्य विकासाची नवी आठ केंद्रे स्थापन करणे. - औरंगाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेच्या सहकार्याने प्रयत्न करणे. 

मी काम करताना कोणताही दुजाभाव करीत नाही. मंत्रिपदाच्या अल्पकाळात मी शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. पाण्याचा प्रश्न सर्व समाजघटकांचा आहे. आमदार म्हणून काम करताना सर्व समाज घटकांकडे आणि विविध भागांकडे लक्ष दिले. याचा मला या निवडणुकीत निश्चितच फायदा होणार आहे. - राज्यमंत्री अतुल सावे, उद्योग, अल्पसंख्याक राज्यमंत्री

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Atul Saveअतुल सावेaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वBJPभाजपा