शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Maharashtra Bullet Train: आता मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन धावणार?, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 19:37 IST

Maharashtra Bullet Train: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात एक महत्वाचं विधान केलं आहे.

Maharashtra Bullet Train: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात एक महत्वाचं विधान केलं आहे. मुंबई-अहमदाबाद आणि दिल्ली-वाराणसी या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाप्रमाणेच मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठीचा प्रयत्न करणार असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. 

रेल्वे राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर दानवे यांनी पहिल्यांदाच आपल्या मतदार संघाचा दौरा केला. राज्यातील इतर चार नवनिर्वाचित मंत्र्यांप्रमाणेच दानवे देखील जन आशीर्वाद यात्रा करणार आहेत. याच संदर्भात त्यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. दानवेंनी याच पत्रकार परिषदेत बुलेट ट्रेन संदर्भातील संकेत दिले. 

"मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन संदर्भात मी अभ्यास केला. अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली. या प्रकल्पाच्या शक्यतेबाबत चर्चा झाली आणि यात आम्हाला सकारात्मक संकेत मिळाले आहेत", असं रावसाहेब दानवे म्हणाले. 

मुंबई-औरंगाबाद दिड तासात होणार प्रवासमुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प झाला तर मुंबई ते औरंगाबाद अंतर अवघ्या दिड तासात गाठता येणार आहे. तर तीन ते साडेतीन तासांत मुंबईहून नागपुरला पोहोचता येणार आहे. यामुळे या परिसरातील विकासाचे मार्ग खुले होतील. त्यासाठीच या प्रकल्पासाठी गांभीर्यानं विचार सुरू आहे, असंही दानवे म्हणाले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेBullet Trainबुलेट ट्रेन