शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महाराष्ट्र बजेट २०२० : मुद्रांक शुल्क कपातीचा शहराला मिळावा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 18:31 IST

मुंबई, पुणे, नागपूरपेक्षा औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर यासारख्या शहरांतील बांधकाम क्षेत्राला व ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देक्रेडाईतर्फे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांना देणार निवेदनमुंबईसह पुणे, नागपूरमध्ये पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत औरंगाबाद शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण

औरंगाबाद : नोटाबंदीनंतर मंदीचा सर्वाधिक फटका ‘ड’ वर्ग महानगरपालिका हद्दीतील बांधकाम क्षेत्राला बसला आहे. यामुळे राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात एक टक्का केलेल्या कपातीमध्ये औरंगाबादसह नाशिक, कोल्हापूरचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाई स्थानिक शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली. मुंबईसह पुणे, नागपूरमध्ये पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत देण्यात आली आहे. यामुळे औरंगाबाद शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. 

यासंदर्भात प्राईड ग्रुपचे चेअरमन आर्कि. नितीन बगडिया यांनी सांगितले की, नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला आहे. मागील ४ ते ५ वर्षांपासून या क्षेत्राला मोठ्या मंदीतून जावे लागत आहे. ‘ड’ महानगरपालिका हद्दीतील बांधकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. कारण, महागाई जशी वाढत आहे त्या तुलनेत येथील नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढले नाही. विशेष म्हणजे मंदीची परिस्थिती लक्षात घेता येथील बांधकाम व्यावसायिकांनी घराच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. 

मुंबई, पुणे, नागपूरपेक्षा औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर यासारख्या शहरांतील बांधकाम क्षेत्राला व ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. औरंगाबादेत ६ टक्के मुद्रांक शुल्क व १ टक्का रजिस्ट्री चार्जेस (नोंदणी शुल्क), असे ७ टक्के कर शुल्क आकारले जात आहे. जर येथे मुद्रांक शुल्कात १ टक्का कपात केली, तर ज्या नागरिकांनी ३० लाखांचे घर खरेदी केले त्यांच्या मुद्रांक शुल्कात ३० हजार रुपये वाचतील. याचा विचार करण्यात यावा. 

क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा यांनी सांगितले की, परवडणारे घर खरेदी करणाऱ्यांसाठी १ टक्का रक्कम खूप मोठी असते. औरंगाबाद शहरातील बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई, पुणे व नागपूरप्रमाणे मुद्रांक शुल्कात १ टक्का कपात करण्यात यावी, या मागणीचे निवदेन तयार करण्यात येत आहे. लवकरच क्रेडाईचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदन देणार आहे.

मंदीचा परिणाम येथेही आहेच ना !क्रेडाईचे कोषाध्यक्ष पंजाबराव तौर यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरात घर खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. घर खरेदी करणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतील सवलतीचा फायदाही मिळत आहे. मात्र, देशभर मंदीच्या वातावरणाचा परिणाम येथेही दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक येथेच मंदी नसून, सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे. औरंगाबादसारख्या शहरातील नागरिकांना घर खरेदीसाठी आणखी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा व येथेही १ टक्का मुद्रांक शुल्क कपातीचे धोरण लागू करावे. 

टॅग्स :budget 2020बजेटAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय