शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारपेठेला ४०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:35 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले.

ठळक मुद्दे- शहरातील २७५ कोटींचे व्यवहार ठप्प - पेट्रोलपंप, हॉटेलसह विविध उद्योगांचा व्यवहार थांबला

औरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्यात शहरातील व्यवसायाचे आर्थिक नुकसान २७५ कोटींपर्यंत आहे. 

मराठा समाजाच्या आंदोलनात व्यापारी स्वत:हून सहभागी झाले होते. बहुतांश व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचे शटर गुरुवारी उघडलेच नाही. याचा मोठ्या प्रमाणात फटका शहराला बसला. विशेषत: येथील हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, पर्यटनाच्या व्यवसायाला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे. यासंदर्भात मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील ९९ टक्के बाजारपेठ बंद होती.

सरकारी तिजोरीत कर भरण्याच्या आकडेवारीचे गणित केल्यास जिल्ह्यातील बाजारपेठेत सध्या दररोज ४०० कोटींची उलाढाल होत आहे. या एकूण उलाढालीपैकी शहरातील व्यवसायाचा २५० ते २७५ कोटींचा वाटा असतो. जर एक दिवस बाजारपेठ बंद राहिली तर जिल्ह्यात ४०० कोटींचे व्यवहार ठप्प होतात. यात जाधववाडी, मोंढा, आॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, कपडा बाजार, सराफा बाजार यासारख्या व्यवसायाचा समावेश आहे.

पेट्रोलपंपांचे ५ कोटींचे व्यवहार ठप्प गुरुवारी शहरातील व आसपासच्या परिसरातील  ३५ पैकी ३० पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. या काळात अवघे ५ पेट्रोलपंप सुरू होते. मात्र, दुपारनंतर आंदोलनकर्त्यांनी यातील ३ पेट्रोलपंप बंद करायला भाग पाडले होते. सायंकाळी काहीच पेट्रोलपंप सुरू झाले होते. यासंदर्भात पेट्रोलपंपचालक असोसिएशनचे हितेश पटेल यांनी सांगितले की, पहिल्यांदाच शहरातील पेट्रोल कंपन्यांचे स्वत:चे पेट्रोलपंप बंद होते. शहरात दररोज ३ लाख लिटर पेट्रोल तर दोन लाख लिटर डिझेलची विक्री होते. व्यवस्थापनावरील खर्च, असे ५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

हॉटेल उद्योगाला फटका औरंगाबाद जिल्हा हॉटेल्स रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मगर यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचे १७२ सदस्य आहेत. तसेच अन्य मिळून शहरात लहान-मोठे २५० हॉटेल रेस्टॉरंट, लॉज आहेत. एका दिवसात दीड कोटीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. बंदचा परिणाम येणारा आठवडाभर दिसून येईल. 

८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्प बँकेतील सुमारे ८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. चित्रपटगृहांनाही आर्थिक फटका बसला. यासंदर्भात चित्रपटगृहाचे मालक रवी खिंवसरा यांनी सांगितले की, शहरात मल्टिप्लेक्स व सिंगल चित्रपटगृहांचे २७ स्क्रीन आहेत. या चित्रपटगृहांतील सर्व शो रद्द करण्यात आले होते. त्यामुळे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. खाद्यपदार्थांपासून ते पार्किंगपर्यंत विविध व्यवसायालाही तेवढाच फटका बसला. असा एकूण ५० लाख रुपयांचा फटका बसला आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMarketबाजार