शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

महिलांनी समस्यांचा पाढा वाचताच 'माऊली... माऊली' म्हणत आदेश भाऊजींनी दिली बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:00 IST

मूलभूत सुविधांकडे जरी शिवसेनेने लक्ष दिले असते, तरी कुणी नाव ठेवले नसते

ठळक मुद्देपाणी, रस्ते, ड्रेनेजच्या प्रश्नांची सरबत्तीसमस्या सुटत नसल्याने महिलांनी केला प्रश्नांचा भडिमार

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिलांची मते मिळविण्यासाठी शिवसेनेने बुधवारी पक्ष सचिव आदेश बांदेकर (भाऊजी) यांचा ‘माऊली संवाद’ कार्यक्रम ठेवला खरा; पण शहरातील पाणी, रस्ते, ड्रेनेज यासह विविध समस्या सुटत नसल्याने महिलांनी प्रश्नांचा जोरदार भडिमार केला त्यामुळे भाऊजींवर केवळ ‘माऊली... माऊली...’ असे उत्तर देऊन प्रश्नांना बगल देण्याची वेळ आली. 

महिलांच्या समस्यांचे गाºहाणे ऐकून आदेश बांदेकर यांनी नंतर उपस्थित शिवसेना नेत्यांचे कान टोचले. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज या मूलभूत सुविधांकडे जरी शिवसेनेने लक्ष दिले असते तरी कुणी नाव ठेवले नसते. आगामी काळात जे आमदार निवडून येतील, त्यांनी या सुविधांकडे लक्ष दिले, तर शिवसेनेला कुणीही नाव ठेवणार नाही, असे सांगितले. 

श्रीहरी पॅव्हेलियन येथे विधानसभा निवडणुकीनिमित्त बांदेकर यांच्या उपस्थितीत महिलाकेंद्रित ‘माऊली संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थिती होती. सव्वातासाच्या संवाद कार्यक्रमात बांदेकर यांनी महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र महिलांनी समस्यांचा एवढा भडिमार केला की बांदेकर यांना विनोदी उत्तरे द्यावी लागली. 

खासदार तुमचे होते, आमदार तुमच्याच पक्षाचे आहेत. तरीही काही कामे केली नाहीत, असा प्रश्न नाईकनगर सातारा परिसरातील महिलेने उपस्थित केला. बांदेकर यांनी याप्रकरणी थेट उत्तर देणे टाळले. खैरे यांनी रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल, असे सांगून वेळ मारून नेली. कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव, प्रतिभा जगताप, अंजली मांडवकर, अनिता मंत्री, नलिनी महाजन, सुनंदा खरात, आशा दातार, विद्या अग्निहोत्री, प्राजक्ता राजपूत, दुर्गा भाटी, लक्ष्मी नरहिरे, नलिनी बाहेती, मीरा देशपांडे, जयश्री घाडगे आदींची उपस्थिती होती.

पश्चिम मतदारसंघात समस्यांचा पाढापश्चिम मतदारसंघातील अनेक समस्या महिलांनी मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीजपुरवठा आदी समस्यांचा पाढाच महिलांनी वाचला. शहरी भाग वगळता ग्रामीण भागातून जास्तीच्या महिला कार्यक्रमाला आल्या होत्या. २५ दिवस राहिले आहेत. आ. शिरसाट यांना ताकद द्या, अशी साद घालीत बांदेकर यांनी खेळी-मेळीच्या वातावरणात संवाद साधून अनेक महिलांच्या प्रश्नांना ‘माऊली-माऊली’ करीत बगल दिली.  

महिला विचारतात ‘ताई’ आमचे काय?महिला आघाडीची एक पदाधिकारी बांदेकर यांना म्हणाली, प्रचार करण्यासाठी आम्ही जेव्हा महिला कार्यकर्त्यांना सोबत चला म्हणतो, तेव्हा त्या महिला म्हणतात, ‘ताई’ आमचे काय? प्रचारात आमचा वेळ जातो. त्याचे आम्हाला काहीही मिळत नाही. महिला सक्षम व्हाव्यात यासाठी, झुणका-भाकर केंद्रासारखी योजना पुन्हा सुरू करावी. जेणेकरून पक्षाचे काम करणाऱ्या महिलांना उभारी मिळेल. यावर सचिव बांदेकर म्हणाले, इच्छाशक्तीने काम केल्यास सर्व काही मिळते. झुणका- भाकर केंद्र योजनेचा मुद्दा पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना