शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

औरंगाबादमध्ये लवकरच महाज्योतीचे उपकेंद्र सुरू होणार : विजय वडेट्टीवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 19:16 IST

Vijay Vadettiwar : इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून दिला असता, तर आज ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले नसते.

ठळक मुद्देपंधरा दिवसात जागेचे काम पूर्ण होण्याची शक्यताजागेचकाम झाले तर लवकरात लवकर हे उपकेंद्र कार्यान्वित

औरंगाबाद : मागच्या सरकारने व आमच्या सरकारनेही काय गंमत म्हणून केंद्राकडे पत्रव्यवहार केला काय? देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनीही पत्रव्यवहार केला. तेव्हाच ओबीसींचा इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून दिला असता, तर आज ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले नसते. ते टिकले असते, आमचे सरकार आले आणि कोरोना सुरू झाला. मग तो काय आम्ही आणला काय? असा घणाघात महाराष्ट्राचे ओबीसी खात्याचे व मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी घातला. ( Mahajyoti substation to start soon in Aurangabad, Vijay Vadettiwar declares )

मंडल दिनानिमित्त दोदडगाव, ता. गेवराई येथील मंडल स्तंभाला अभिवादन करायला जाण्यापूर्वी ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. याच वेळी त्यांनी औरंगाबादेत महाज्योतीचे उपकेंद्र स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा केली. येत्या पंधरा दिवसात जागेचे काम झाले तर लवकरात लवकर हे उपकेंद्र कार्यान्वित करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीत ओबीसींसाठी राज्यात ७२ वसतिगृहांना मान्यता देण्यात आली. तांडा वस्ती सुधार योजना व वसंतराव नाईक घरकुल योजनेला निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. महाज्योतीला १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ४० कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आमदार राजेश राठोड, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, बालाजी शिंदे, बाळासाहेब सानप आदींची यावेळी उपस्थिते होती.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जाती