शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

पे्रयसीला़़़ प्रेमाचा माहिती अधिकार

By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड प्रेम का करत नाहीस माझ्यावऱ़़ हे आता मला कळणार आहे़़़ कारण मी आता माहितीचा अधिकार वापरणार आहे़़़

श्रीनिवास भोसले,  नांदेडप्रेम का करत नाहीस माझ्यावऱ़़ हे आता मला कळणार आहे़़़ कारण मी आता माहितीचा अधिकार वापरणार आहे़़़ ही कविता सादर करत नारायण चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्वप्निल मुळे याने काव्यवाचन स्पर्धेत टाळ्या मिळविल्या़ या कवितेतून मुळे यांनी माहितीचा अधिकार व उपयोग याविषयीचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे़ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्त्रीभ्रूण हत्या, राजकारण, समाजकारण, शिक्षण आदी विषयांवरील कविता सादर करीत मने जिंकली़ औंढा येथील नागनाथ महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव पोले याने स्त्रीभू्रण हत्येवर आधारित कविता सादर केली़ यामध्ये स्त्रीचे महत्व आणि जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आदींचा इतिहास उपस्थित केला़ तर इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसीच्या प्रिया देशमुख हिने मैत्रीतील प्रीत कविता सादर करीत मैत्रीचे महत्व पटवून दिले़ एका विद्यार्थ्याने दुनियादारी या कवितेतून मित्राच्या आग्रहातून लागलेले व्यसन, दारू पिण्याचा शोक आणि त्याचा विपरित परिणाम आपल्या कवितेतून मांडला़ कै़ बाबासाहेब गोरठेकर कॉलेज, उमरीच्या श्रीकांत दारेबोईनवाड याने ‘व्यथा’तर सिडको येथील इंदिरा कॉलेजच्या वर्षा खानजोडे हिने बेटीयॉ कविता सादर केली़ ‘इलेक्शन आली भौ इलेक्शन आली़़़सगळेच हाले बदलू लागले पखाली़़़लाल बावटेवाले आता भगव्याचे झाले़़़राजकारणात दिवस भौ नागव्याचे आले’ या इलेक्शनची तयारी़़़ या कवितेतून अहमदपूर येथील यशवंत अध्यापक महाविद्यालयाच्या स्वरूपा चव्हाण हिने आजच्या राजकारणावर प्रखर टीका केली़ लोहा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयातील शेख समीर याने ‘लाचारीचं जगणं’ तर जिजाऊ अध्यापक महाविद्यालय, धनेगाव येथील गजानन डोणे याने स्वप्न पावसातलं़़ ही कविता सादर केली़ ‘इथे कुणीही राहिला नाही कुणाचा, स्वार्थाचा वाहतो वारा़़़ रक्ताची भरती नद्या हा खोटारड्यांचा तोरा़़़ अंधश्रद्धेसाठी लढणारे दाभोळकर मात्र इथल्यांना नको आहेत़़़ हत्येस एक वर्ष होऊनही त्यांचा मारेकरी अजूनही मोकाटच आहे़़़ आणि तरीही आम्ही म्हणतो, भारत महासत्ता होणार आहे़़़कष्टाने पिकवलेल्या मालाला शेतात भाव नाही़़़ वेतनवाढ होते सर्वांचीच पण इथं शेतकऱ्यालाच वाव नाही़़़ पाण्याची गारपीट, दुष्काळाची मारपीट महाराष्ट्रात होते आहे़़़ हवालदिल झालेला शेतकरी गळ्याला फास लावतो आहे़़़आणि तरीही आम्ही म्हणतो भारत ‘महासत्ता’ होणार आहे़़़ अशाप्रकारे विविधांगी काव्यरचनेतून वास्तव मांडण्याचा प्रयत्न नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या अविनाश रामकिशन गायकवाड याने केला़ या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांची साथ दिली़ कॉम्प्युटरच्या चिप सारखा, माणूस मनाने खुजा झालाय़़़अन् मदर-फादर नावाचा बोर्ड, त्याच्या आयुष्यातून वजा झालाय़ ‘विज्ञानयुग’ या कवितेतून कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजच्या अविनाश कळकेकर याने आधुनिक काळातील यंत्रसामग्री आणि व्यस्त झालेले जीवन मांडताना माणूस नाती विसरत चालला आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला़