शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

पे्रयसीला़़़ प्रेमाचा माहिती अधिकार

By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड प्रेम का करत नाहीस माझ्यावऱ़़ हे आता मला कळणार आहे़़़ कारण मी आता माहितीचा अधिकार वापरणार आहे़़़

श्रीनिवास भोसले,  नांदेडप्रेम का करत नाहीस माझ्यावऱ़़ हे आता मला कळणार आहे़़़ कारण मी आता माहितीचा अधिकार वापरणार आहे़़़ ही कविता सादर करत नारायण चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्वप्निल मुळे याने काव्यवाचन स्पर्धेत टाळ्या मिळविल्या़ या कवितेतून मुळे यांनी माहितीचा अधिकार व उपयोग याविषयीचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे़ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्त्रीभ्रूण हत्या, राजकारण, समाजकारण, शिक्षण आदी विषयांवरील कविता सादर करीत मने जिंकली़ औंढा येथील नागनाथ महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव पोले याने स्त्रीभू्रण हत्येवर आधारित कविता सादर केली़ यामध्ये स्त्रीचे महत्व आणि जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आदींचा इतिहास उपस्थित केला़ तर इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसीच्या प्रिया देशमुख हिने मैत्रीतील प्रीत कविता सादर करीत मैत्रीचे महत्व पटवून दिले़ एका विद्यार्थ्याने दुनियादारी या कवितेतून मित्राच्या आग्रहातून लागलेले व्यसन, दारू पिण्याचा शोक आणि त्याचा विपरित परिणाम आपल्या कवितेतून मांडला़ कै़ बाबासाहेब गोरठेकर कॉलेज, उमरीच्या श्रीकांत दारेबोईनवाड याने ‘व्यथा’तर सिडको येथील इंदिरा कॉलेजच्या वर्षा खानजोडे हिने बेटीयॉ कविता सादर केली़ ‘इलेक्शन आली भौ इलेक्शन आली़़़सगळेच हाले बदलू लागले पखाली़़़लाल बावटेवाले आता भगव्याचे झाले़़़राजकारणात दिवस भौ नागव्याचे आले’ या इलेक्शनची तयारी़़़ या कवितेतून अहमदपूर येथील यशवंत अध्यापक महाविद्यालयाच्या स्वरूपा चव्हाण हिने आजच्या राजकारणावर प्रखर टीका केली़ लोहा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयातील शेख समीर याने ‘लाचारीचं जगणं’ तर जिजाऊ अध्यापक महाविद्यालय, धनेगाव येथील गजानन डोणे याने स्वप्न पावसातलं़़ ही कविता सादर केली़ ‘इथे कुणीही राहिला नाही कुणाचा, स्वार्थाचा वाहतो वारा़़़ रक्ताची भरती नद्या हा खोटारड्यांचा तोरा़़़ अंधश्रद्धेसाठी लढणारे दाभोळकर मात्र इथल्यांना नको आहेत़़़ हत्येस एक वर्ष होऊनही त्यांचा मारेकरी अजूनही मोकाटच आहे़़़ आणि तरीही आम्ही म्हणतो, भारत महासत्ता होणार आहे़़़कष्टाने पिकवलेल्या मालाला शेतात भाव नाही़़़ वेतनवाढ होते सर्वांचीच पण इथं शेतकऱ्यालाच वाव नाही़़़ पाण्याची गारपीट, दुष्काळाची मारपीट महाराष्ट्रात होते आहे़़़ हवालदिल झालेला शेतकरी गळ्याला फास लावतो आहे़़़आणि तरीही आम्ही म्हणतो भारत ‘महासत्ता’ होणार आहे़़़ अशाप्रकारे विविधांगी काव्यरचनेतून वास्तव मांडण्याचा प्रयत्न नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या अविनाश रामकिशन गायकवाड याने केला़ या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांची साथ दिली़ कॉम्प्युटरच्या चिप सारखा, माणूस मनाने खुजा झालाय़़़अन् मदर-फादर नावाचा बोर्ड, त्याच्या आयुष्यातून वजा झालाय़ ‘विज्ञानयुग’ या कवितेतून कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजच्या अविनाश कळकेकर याने आधुनिक काळातील यंत्रसामग्री आणि व्यस्त झालेले जीवन मांडताना माणूस नाती विसरत चालला आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला़