शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांमुळे कमळ फुलले

By admin | Updated: May 18, 2014 01:23 IST

पैठण विधानसभा मतदारसंघात खा. रावसाहेब दानवे यांच्याबद्दल नाराजी असतानाही त्यांना तालुक्यातून मताधिक्य मिळाले, ही बाब काँग्रेस आघाडीला आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

 पैठण विधानसभा मतदारसंघात खा. रावसाहेब दानवे यांच्याबद्दल नाराजी असतानाही त्यांना तालुक्यातून मताधिक्य मिळाले, ही बाब काँग्रेस आघाडीला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. महायुतीच्या दुसर्‍या फळीतील कायकर्त्यांना व तरुणांना दानवे यांनी पकडून प्रचार करून घेतला. त्यात मोदी लाट असल्याने ‘कमळ’ फुलले. आ. संजय वाघचौरे यांच्याविषयीची नाराजीही काँग्रेस आघाडीला भोवली. जालना लोकसभा मतदारसंघातून खा. रावसाहेब दानवे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर तालुक्यात प्रचंड नाराजी पसरली होती. यामुळे काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना पैठणकडून खूप आशा वाटली. त्यांनी यासाठी परिश्रमही घेतले; परंतु तालुक्यातील काँग्रेस व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत एकी नसल्याने आघाडी प्रचारात प्रभाव पाडू शकली नाही. त्यात आ. संजय वाघचौरे यांनी केलेल्या प्रचाराचा फायदा आघाडीला झाला नाही. कारण वाघचौरे यांच्याविषयी तालुक्यात प्रचंड रोष आहे. महायुतीचे पहिल्या फळीतील दिग्गज दानवेंवर नाराज असले तरी त्यांनी शेवटी काम केले; परंतु धूर्त दानवेंनी दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांकरवी प्रचार करून घेतल्याने महायुतीचे मताधिक्य वाढण्यास मदत झाली. पैठणने नेहमीप्रमाणे आघाडीच्या पाठीशी भक्कम साथ दिली. त्याचा आता आगामी विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल, याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महायुतीचे यश काँग्रेस आघाडीस गांभीर्याने घ्यावे लागणार, हे मात्र स्पष्ट आहे. की फॅक्टर काय ठरला? महायुतीच्या दुसर्‍या फळीतील कायकर्त्यांना व तरुणांना दानवे यांनी पकडून प्रचार करून घेतला. त्यात मोदी लाट असल्याने ‘कमळ’ फुलले. आ. संजय वाघचौरे यांच्याविषयीची नाराजीही काँग्रेस आघाडीला भोवली. स्वत: मतदारच मोदी लाटेमुळे उत्साहाने मतदान करायला गेला, हेही विसरून चालणार नाही. आघाडीमधील अतिआत्मविश्वासही नडल्याने औताडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. औताडे यांनी तालुक्यातील ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांना मतदारांनी लाथाळले, हे निकालानंतर औताडेंना कळून चुकले. तालुक्यातील महायुतीच्या इच्छुकांच्या आशेला अंकुर मात्र फुटले. माजी आमदार संदीपान भुमरे यांची भूमिकाही दानवेंसाठी फायद्याची ठरली. तालुक्यातून दानवे यांना जे मतदान झाले ते फक्त मोदी लाटेमुळेच.