शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

भाजपच्या कराड यांना लॉटरी; सेनेच्या खैरेंचा पत्ता कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 19:13 IST

या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. 

ठळक मुद्देभाजपकडून निष्ठावंताला न्याय उमेदवारी न मिळाल्याने खैरे नाराज

औरंगाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने त्यांना आश्चर्यकारकरीत्या लॉटरी लागली आहे. तर शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा पक्ष प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यामुळे पत्ता कट झाला आहे. या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. कराड म्हणाले, सामान्य कार्यकर्त्याचा पक्षाने विचार केल्यामुळे आनंद झाला आहे. शिवसेनेला ही मोठी चपराक आहे. बुधवारी माझा बायोडाटा पक्षाने मागविला होता. परंतु अचानक उमेदवारी जाहीर होईल, असे वाटले नव्हते. पक्षनिष्ठेमुळे हे सगळे शक्य झाले आहे. शिवसेनेचे सात आमदार जिल्ह्यात असले तरी खासदार एमआयएमचा आहे. गेल्या लोकसभेत ३ ते ४ हजार मतांनी खैरेंचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मागील ३० वर्षांत पक्षासाठी केलेले काम पक्ष नेतृत्व विचारात घेईल, असे त्यांना वाटले होते. परंतु प्रियांका चतुर्वेदी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्यसभा सदस्यत्व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १३ मार्च अंतिम तारीख आहे. २६ मार्चला निवडणूक होणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्यामुळे प्रियांकांना उमेदवारीउमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी खा.खैरे म्हणाले, आज सकाळपर्यंत वाटत होते की, पक्षाकडून माझ्या नावाचा विचार राज्यसभा सदस्यत्वासाठी होईल. परंतु ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांचे नाव पुढे आल्यामुळे मन उद्विग्न झाले आहे. निष्ठावंताला न्याय मिळेल असे वाटले होते. परंतु पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. आता यापुढे आपण काय बोलणार.माझ्यासारख्यावर जर अन्याय होत असेल तर इतर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करावे, असा प्रश्न आहे. चतुर्वेदी या काँग्रेसमध्ये होत्या. त्यापूर्वी त्या गुरुदास कामत यांच्या समर्थक होत्या. त्यानंतर खा.राहुल गांधी यांच्याकडे गेल्या. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे फळ त्यांना मिळाले. याच शहरात आजवर जे काही सांप्रदायिक वातावरण निर्माण झाले, त्या प्रत्येक वेळी मी धावून गेलेलो आहे. त्यामुळे राज्यसभेत का होईना परंतु हिंदुत्वाच्या मुद्यावर मला बोलता आले असते. मला उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच तिकडे भाजपने डाव खेळला, त्यांनी डॉ.कराड यांना उमेदवारी देऊन पक्षाला बळ दिले. माझी पण ताकद आहे, ती येणाऱ्या काळात दिसेलच. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाAurangabadऔरंगाबाद