शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

भाजपच्या कराड यांना लॉटरी; सेनेच्या खैरेंचा पत्ता कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 19:13 IST

या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. 

ठळक मुद्देभाजपकडून निष्ठावंताला न्याय उमेदवारी न मिळाल्याने खैरे नाराज

औरंगाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने त्यांना आश्चर्यकारकरीत्या लॉटरी लागली आहे. तर शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा पक्ष प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यामुळे पत्ता कट झाला आहे. या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. कराड म्हणाले, सामान्य कार्यकर्त्याचा पक्षाने विचार केल्यामुळे आनंद झाला आहे. शिवसेनेला ही मोठी चपराक आहे. बुधवारी माझा बायोडाटा पक्षाने मागविला होता. परंतु अचानक उमेदवारी जाहीर होईल, असे वाटले नव्हते. पक्षनिष्ठेमुळे हे सगळे शक्य झाले आहे. शिवसेनेचे सात आमदार जिल्ह्यात असले तरी खासदार एमआयएमचा आहे. गेल्या लोकसभेत ३ ते ४ हजार मतांनी खैरेंचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मागील ३० वर्षांत पक्षासाठी केलेले काम पक्ष नेतृत्व विचारात घेईल, असे त्यांना वाटले होते. परंतु प्रियांका चतुर्वेदी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्यसभा सदस्यत्व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १३ मार्च अंतिम तारीख आहे. २६ मार्चला निवडणूक होणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्यामुळे प्रियांकांना उमेदवारीउमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी खा.खैरे म्हणाले, आज सकाळपर्यंत वाटत होते की, पक्षाकडून माझ्या नावाचा विचार राज्यसभा सदस्यत्वासाठी होईल. परंतु ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांचे नाव पुढे आल्यामुळे मन उद्विग्न झाले आहे. निष्ठावंताला न्याय मिळेल असे वाटले होते. परंतु पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. आता यापुढे आपण काय बोलणार.माझ्यासारख्यावर जर अन्याय होत असेल तर इतर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करावे, असा प्रश्न आहे. चतुर्वेदी या काँग्रेसमध्ये होत्या. त्यापूर्वी त्या गुरुदास कामत यांच्या समर्थक होत्या. त्यानंतर खा.राहुल गांधी यांच्याकडे गेल्या. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे फळ त्यांना मिळाले. याच शहरात आजवर जे काही सांप्रदायिक वातावरण निर्माण झाले, त्या प्रत्येक वेळी मी धावून गेलेलो आहे. त्यामुळे राज्यसभेत का होईना परंतु हिंदुत्वाच्या मुद्यावर मला बोलता आले असते. मला उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच तिकडे भाजपने डाव खेळला, त्यांनी डॉ.कराड यांना उमेदवारी देऊन पक्षाला बळ दिले. माझी पण ताकद आहे, ती येणाऱ्या काळात दिसेलच. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाAurangabadऔरंगाबाद