शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रंगभूमीचा शिलेदार हरपला; नाट्य कलावंत सोपान बोर्डे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 19:40 IST

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामधील 'शिवाजी' महाराजांच्या भूमिकेमुळे ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले.

सोयगाव ( औरंगाबाद ) : संपूर्ण महाराष्ट्राला ग्रामीण नाट्यसृष्टीची वेगळी ओळख ज्या संस्थेने करून दिली आणि कलेवर नितांत प्रेम करणाऱ्या ग्रामीण भागातील कलावंतांच्या योगदानाचा आदर्श घालून दिला, ती संस्था म्हणजे 'श्रीराम संगीत मंडळी'...या संस्थेतील सगळ्यात ज्येष्ठ कलावंत सोयगांवचे आदर्श व्यक्तिमत्त्व सोपानमामा बोर्डे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामधील 'शिवाजी' महाराजांच्या भूमिकेमुळे ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. या नाटकातील त्यांची शिवाजी राजांची भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या या भूमिकेची दखल घेऊन या नाटकाचे मुख्य लेखक वसंत कानेटकर यांनी या नाटकाच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रयोगांसाठी त्यांना घेण्याचे ठरवले. परंतु सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशामुळे ग्रामीण भागातील लोकांसाठी काम करायचे ठरवले असल्याने हा प्रस्ताव त्यांनी नाकारला होता.

इ.स. १९४९ मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी सोपानमामा बोर्डे यांनी 'संत तुकाराम' या नाटकामध्ये 'सखी'ची भूमिका साकारून आपल्या नाट्यकलेला प्रारंभ केला. इ.स. १९४९ ते १९६६ म्हणजे जवळपास दोन दशकं नाटकांच्या रुपाने त्यांनी मराठी रंगभूमीची सेवा केली. 'श्री पुंडलिक' मध्ये 'पुंडलिक', 'नेकजात मराठा' मध्ये 'विश्वास', 'देव माणूस' मध्ये 'दादा', 'साष्टांग नमस्कार' मध्ये 'भद्रायू', 'तिसरा जावई' मध्ये 'विनायक', 'नवरा बायको' मध्ये 'विश्वास', 'डॉ.कैलास' मध्ये 'हरबा', 'वेगळं व्हायचय मला' मध्ये 'कर्नलकाका', 'पुण्यप्रभाव' मध्ये 'भूपाल' अशा अनेक नाटकांमध्ये मामांनी भूमिका केल्या.

नाटकांकडे केवळ व्यवसायचे साधन म्हणून न पाहता सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणिक, सामाजिक निधीसाठी त्यांनी विना मोबदला नाटकांचे प्रयोग केले. सन १९६२-६३ च्या काळात भारत-चीन युद्धाच्या वेळी नाटकांच्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून संरक्षण निधी जमा करण्यात त्यांनी मदत केली.राज्यात श्रीराम संगीत मंडळी या नाट्य संस्थेचे नाव त्यांनी सोयगावचं रूपाने कोरले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू