शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

परतीच्या प्रवासात प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:05 IST

औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपल्या अन् परतीचा प्रवास करणाऱ्यांची ‘एसटी’सह खाजगी बसेसना रविवारी एकच गर्दी झाली. दिवाळी हंगामातील अखेरच्या टप्प्यातील गर्दीचा फायदा घेत खाजगी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशा: लूट केली. मुंबईसाठी तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात आले.

अव्वाच्या सव्वा भाडे : खाजगी वाहतूकदारांची मनमानी, औरंगाबाद-मुंबई भाडे २ हजारांवरऔरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपल्या अन् परतीचा प्रवास करणाऱ्यांची ‘एसटी’सह खाजगी बसेसना रविवारी एकच गर्दी झाली. दिवाळी हंगामातील अखेरच्या टप्प्यातील गर्दीचा फायदा घेत खाजगी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशा: लूट केली. मुंबईसाठी तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात आले.

औरंगाबादहून विविध शहरांना जाण्यासाठी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकात रविवारी प्रवाशांची गर्दी झाली. मध्यवर्ती बसस्थानकात शिवनेरी, एशियाड बसेसचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी होती. त्यामुळे तासन्तास रांगेत उभे राहून तिकीट घेण्याची वेळ प्रवाशांवर आली. नोकरी, शिक्षणानिमित्त शहरातून पुण्याला वास्तवास असलेल्यांची मोठी संख्या आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी हे सर्व शहरात आले होते. दिवाळीच्या सुट्या संपताच अशांनी रविवारी आपापल्या नोकरी, कामाच्या आणि शिक्षणाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात एकच गर्दी केली. प्रवाशांच्या गर्दीमुळे बसेस वेळेवर जातील,यासाठी अधिकारी बसस्थानकात तळ ठोकून होते.

बसच्या प्रतिक्षेत प्रवाशांना वाट पहावी लागत होती. प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. प्रवाशांच्या गर्दीपुढे बस कमी पडत होत्या. त्यामुळे ऐनवेळी बसगाड्यांची जुळवाजुळव करण्याची वेळ अधिकारी-कर्मचाºयांवर आली. इतर मार्गावरील बसगाड्यांनाही मोठी गर्दी पहायला मिळाली. रेल्वेस्टेशनवरही प्रवाशांची चांगलीच गर्दी झाली होती.

दिवाळीच्या तोंडावर खाजगी बसच्या भाड्यात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. एस. टी. महामंडळाच्या भाडेदरापेक्षा दीडपट भाडे घेता येतात. त्यादृष्टीने वाढ करण्यात आली. मात्र दिवाळीनंतर खाजगी बसने प्रवास करणाºयांकडून मनमानी पद्धतीने दुप्पट, तिप्पट भाडे आकारण्यात येत असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली.

कारवाईकडे दुर्लक्षअधिक भाडे आकारणाºया खाजगी ट्रॅव्हल्सवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवण्यात आली. प्रारंभी काही बसेसवर कारवाई करण्यात आली. परंतु त्यानंतर खाजगी वाहतूकदारांवर कृपादृष्टी दाखविण्यात आली,अशी ओरड प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

असोसिएशनच्या नियंत्रणाबाहेरगर्दीचे दिवस म्हणून भाडे वाढविले जातात. काहींनी अधिक भाडे केले हे खरे आहे. परंतु मुंबई येथील काही बसमालकांनी अशाप्रकारे दर वाढविलेले आहे. त्या बसेस मूळ मुंबईच्या आहेत. त्यामुळे त्यावर आमच्या असोशिएशनचे नियंत्रण नाही.-राजन हौजवाला, अध्यक्ष, औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद