शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

परतीच्या प्रवासात प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:05 IST

औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपल्या अन् परतीचा प्रवास करणाऱ्यांची ‘एसटी’सह खाजगी बसेसना रविवारी एकच गर्दी झाली. दिवाळी हंगामातील अखेरच्या टप्प्यातील गर्दीचा फायदा घेत खाजगी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशा: लूट केली. मुंबईसाठी तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात आले.

अव्वाच्या सव्वा भाडे : खाजगी वाहतूकदारांची मनमानी, औरंगाबाद-मुंबई भाडे २ हजारांवरऔरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपल्या अन् परतीचा प्रवास करणाऱ्यांची ‘एसटी’सह खाजगी बसेसना रविवारी एकच गर्दी झाली. दिवाळी हंगामातील अखेरच्या टप्प्यातील गर्दीचा फायदा घेत खाजगी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशा: लूट केली. मुंबईसाठी तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात आले.

औरंगाबादहून विविध शहरांना जाण्यासाठी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकात रविवारी प्रवाशांची गर्दी झाली. मध्यवर्ती बसस्थानकात शिवनेरी, एशियाड बसेसचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी होती. त्यामुळे तासन्तास रांगेत उभे राहून तिकीट घेण्याची वेळ प्रवाशांवर आली. नोकरी, शिक्षणानिमित्त शहरातून पुण्याला वास्तवास असलेल्यांची मोठी संख्या आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी हे सर्व शहरात आले होते. दिवाळीच्या सुट्या संपताच अशांनी रविवारी आपापल्या नोकरी, कामाच्या आणि शिक्षणाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात एकच गर्दी केली. प्रवाशांच्या गर्दीमुळे बसेस वेळेवर जातील,यासाठी अधिकारी बसस्थानकात तळ ठोकून होते.

बसच्या प्रतिक्षेत प्रवाशांना वाट पहावी लागत होती. प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. प्रवाशांच्या गर्दीपुढे बस कमी पडत होत्या. त्यामुळे ऐनवेळी बसगाड्यांची जुळवाजुळव करण्याची वेळ अधिकारी-कर्मचाºयांवर आली. इतर मार्गावरील बसगाड्यांनाही मोठी गर्दी पहायला मिळाली. रेल्वेस्टेशनवरही प्रवाशांची चांगलीच गर्दी झाली होती.

दिवाळीच्या तोंडावर खाजगी बसच्या भाड्यात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. एस. टी. महामंडळाच्या भाडेदरापेक्षा दीडपट भाडे घेता येतात. त्यादृष्टीने वाढ करण्यात आली. मात्र दिवाळीनंतर खाजगी बसने प्रवास करणाºयांकडून मनमानी पद्धतीने दुप्पट, तिप्पट भाडे आकारण्यात येत असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली.

कारवाईकडे दुर्लक्षअधिक भाडे आकारणाºया खाजगी ट्रॅव्हल्सवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवण्यात आली. प्रारंभी काही बसेसवर कारवाई करण्यात आली. परंतु त्यानंतर खाजगी वाहतूकदारांवर कृपादृष्टी दाखविण्यात आली,अशी ओरड प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

असोसिएशनच्या नियंत्रणाबाहेरगर्दीचे दिवस म्हणून भाडे वाढविले जातात. काहींनी अधिक भाडे केले हे खरे आहे. परंतु मुंबई येथील काही बसमालकांनी अशाप्रकारे दर वाढविलेले आहे. त्या बसेस मूळ मुंबईच्या आहेत. त्यामुळे त्यावर आमच्या असोशिएशनचे नियंत्रण नाही.-राजन हौजवाला, अध्यक्ष, औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद