शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

औरंगाबाद आणि जालनामधील युतीच्या उमेदवारांना पाणीटंचाईने फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:08 IST

पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी विभागीय आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले.

ठळक मुद्दे शिष्टमंडळाची विभागीय आयुक्तांकडे बैठकमहापालिका आयुक्तांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

औरंगाबाद : शिवसेना-भाजप महायुतीच्या औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना पाणीटंचाईने घाम फोडला आहे. पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी विभागीय आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले.

जालना लोकसभा मतदारसंघातील ११ वॉर्डांतील पाणीटंचाईच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची तक्रारही करण्यात आल्याची माहिती युतीच्या सूत्रांनी आयुक्तांच्या भेटीनंतर दिली. निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या पाणीपुरवठ्यावरून रान पेटले आहे. औरंगाबाद व जालना-औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघांतील वॉर्डांमध्ये महापालिकेचा विस्तार आहे. मागील काही महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. शहरातील ११ वॉर्ड जालना मतदारसंघात असल्यामुळे तिकडील मतदार प्रचार पदयात्रांमधून उमेदवाराला प्रश्न करीत आहेत, तर औरंगाबाद शहरातील उमेदवारावरही मतदार पाणीटंचाईमुळे खापर फोडू लागले आहेत.

शहरात १३० एमएलडी पाणी येते. त्याचे वितरण चुकीच्या पद्धतीने होत आहे. काही ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा होतो, तर कुठे सात दिवस पाणी येत नाही. एक्स्प्रेस जलवाहिनीवर गळती करणारे बायपास आहेत. पदाधिकाऱ्यांच्या एसएमएस, फोनला आयुक्तांसह अभियंते आचारसंहितेचे नाव पुढे करून उत्तर देत नाहीत, अशा तक्रारी शिष्टमंडळाने केल्या.

आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात महापौर नंदकुमार घोडेले, उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाट, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींचा समावेश होता. शिष्टमंडळ गेल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे मनपा आयुक्त डॉ. विनायक व इतर अधिकाऱ्यांमध्ये दोन ते अडीच तास औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावरून खल झाला. यात पालिकेने १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत रोज किती पाणी जायकवाडीतून शहरात आणले, त्याची माहिती दिली. त्याचा विचार केला तर शहरात रोज १२० ते १२५ एमएलडीदरम्यान पाणी आले आहे. यातील ५० एमएलडी पाणी सिडको परिसराला नियमित दिल्याची नोंद आहे. जर सिडकोला रोज ५० एमएलडीच्या आसपास पाणीपुरवठा होत आहे, तर मग पाणीपुरवठ्यावरून बोंब का होत आहे, असा प्रश्न आहे.

आयुक्तांकडे दुसऱ्यांदा बैठक

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे पाणीपुरवठ्यावरून सोमवारी झालेली दुसरी बैठक होती. आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाणीपुरवठ्यावरून बैठक झाली. वितरणात ब्रेकडाऊनमुळे अडचण येत असल्याची माहिती समोर आली आहे. जलकुंभ भरण्यासाठी १७ ते १८ तास लागतात, ब्रेकडाऊन झाल्यास पाणीपुरवठ्याला विलंब होतो. शिवाय टँकरचा भरणा होत असल्याची व पाणीपुरवठा शिफ्टची माहिती बैठकीत मनपा अधिकाऱ्यांनी दिली. शेंद्रा आणि वाळूज येथे टँकर भरणा करण्यासाठी सुचविले आहे. गळत्यांची दुरुस्ती व्हावी, तसेच पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच किमान दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल याचे नियोजन करण्यासाठी चर्चा झाली. बैठकीला मनपा आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर व मनपा आयुक्त डॉ. विनायक यांनी दुपारनंतर एक्स्प्रेस जलवाहिनी, त्यावरील बायपास व गळत्यांची पाहणी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई