शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

औरंगाबाद आणि जालनामधील युतीच्या उमेदवारांना पाणीटंचाईने फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:08 IST

पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी विभागीय आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले.

ठळक मुद्दे शिष्टमंडळाची विभागीय आयुक्तांकडे बैठकमहापालिका आयुक्तांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

औरंगाबाद : शिवसेना-भाजप महायुतीच्या औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना पाणीटंचाईने घाम फोडला आहे. पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी विभागीय आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले.

जालना लोकसभा मतदारसंघातील ११ वॉर्डांतील पाणीटंचाईच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची तक्रारही करण्यात आल्याची माहिती युतीच्या सूत्रांनी आयुक्तांच्या भेटीनंतर दिली. निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या पाणीपुरवठ्यावरून रान पेटले आहे. औरंगाबाद व जालना-औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघांतील वॉर्डांमध्ये महापालिकेचा विस्तार आहे. मागील काही महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. शहरातील ११ वॉर्ड जालना मतदारसंघात असल्यामुळे तिकडील मतदार प्रचार पदयात्रांमधून उमेदवाराला प्रश्न करीत आहेत, तर औरंगाबाद शहरातील उमेदवारावरही मतदार पाणीटंचाईमुळे खापर फोडू लागले आहेत.

शहरात १३० एमएलडी पाणी येते. त्याचे वितरण चुकीच्या पद्धतीने होत आहे. काही ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा होतो, तर कुठे सात दिवस पाणी येत नाही. एक्स्प्रेस जलवाहिनीवर गळती करणारे बायपास आहेत. पदाधिकाऱ्यांच्या एसएमएस, फोनला आयुक्तांसह अभियंते आचारसंहितेचे नाव पुढे करून उत्तर देत नाहीत, अशा तक्रारी शिष्टमंडळाने केल्या.

आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात महापौर नंदकुमार घोडेले, उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाट, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींचा समावेश होता. शिष्टमंडळ गेल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे मनपा आयुक्त डॉ. विनायक व इतर अधिकाऱ्यांमध्ये दोन ते अडीच तास औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावरून खल झाला. यात पालिकेने १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत रोज किती पाणी जायकवाडीतून शहरात आणले, त्याची माहिती दिली. त्याचा विचार केला तर शहरात रोज १२० ते १२५ एमएलडीदरम्यान पाणी आले आहे. यातील ५० एमएलडी पाणी सिडको परिसराला नियमित दिल्याची नोंद आहे. जर सिडकोला रोज ५० एमएलडीच्या आसपास पाणीपुरवठा होत आहे, तर मग पाणीपुरवठ्यावरून बोंब का होत आहे, असा प्रश्न आहे.

आयुक्तांकडे दुसऱ्यांदा बैठक

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे पाणीपुरवठ्यावरून सोमवारी झालेली दुसरी बैठक होती. आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाणीपुरवठ्यावरून बैठक झाली. वितरणात ब्रेकडाऊनमुळे अडचण येत असल्याची माहिती समोर आली आहे. जलकुंभ भरण्यासाठी १७ ते १८ तास लागतात, ब्रेकडाऊन झाल्यास पाणीपुरवठ्याला विलंब होतो. शिवाय टँकरचा भरणा होत असल्याची व पाणीपुरवठा शिफ्टची माहिती बैठकीत मनपा अधिकाऱ्यांनी दिली. शेंद्रा आणि वाळूज येथे टँकर भरणा करण्यासाठी सुचविले आहे. गळत्यांची दुरुस्ती व्हावी, तसेच पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच किमान दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल याचे नियोजन करण्यासाठी चर्चा झाली. बैठकीला मनपा आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर व मनपा आयुक्त डॉ. विनायक यांनी दुपारनंतर एक्स्प्रेस जलवाहिनी, त्यावरील बायपास व गळत्यांची पाहणी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई