शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

औरंगाबाद आणि जालनामधील युतीच्या उमेदवारांना पाणीटंचाईने फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:08 IST

पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी विभागीय आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले.

ठळक मुद्दे शिष्टमंडळाची विभागीय आयुक्तांकडे बैठकमहापालिका आयुक्तांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

औरंगाबाद : शिवसेना-भाजप महायुतीच्या औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना पाणीटंचाईने घाम फोडला आहे. पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी विभागीय आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले.

जालना लोकसभा मतदारसंघातील ११ वॉर्डांतील पाणीटंचाईच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची तक्रारही करण्यात आल्याची माहिती युतीच्या सूत्रांनी आयुक्तांच्या भेटीनंतर दिली. निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या पाणीपुरवठ्यावरून रान पेटले आहे. औरंगाबाद व जालना-औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघांतील वॉर्डांमध्ये महापालिकेचा विस्तार आहे. मागील काही महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. शहरातील ११ वॉर्ड जालना मतदारसंघात असल्यामुळे तिकडील मतदार प्रचार पदयात्रांमधून उमेदवाराला प्रश्न करीत आहेत, तर औरंगाबाद शहरातील उमेदवारावरही मतदार पाणीटंचाईमुळे खापर फोडू लागले आहेत.

शहरात १३० एमएलडी पाणी येते. त्याचे वितरण चुकीच्या पद्धतीने होत आहे. काही ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा होतो, तर कुठे सात दिवस पाणी येत नाही. एक्स्प्रेस जलवाहिनीवर गळती करणारे बायपास आहेत. पदाधिकाऱ्यांच्या एसएमएस, फोनला आयुक्तांसह अभियंते आचारसंहितेचे नाव पुढे करून उत्तर देत नाहीत, अशा तक्रारी शिष्टमंडळाने केल्या.

आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात महापौर नंदकुमार घोडेले, उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाट, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींचा समावेश होता. शिष्टमंडळ गेल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे मनपा आयुक्त डॉ. विनायक व इतर अधिकाऱ्यांमध्ये दोन ते अडीच तास औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावरून खल झाला. यात पालिकेने १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत रोज किती पाणी जायकवाडीतून शहरात आणले, त्याची माहिती दिली. त्याचा विचार केला तर शहरात रोज १२० ते १२५ एमएलडीदरम्यान पाणी आले आहे. यातील ५० एमएलडी पाणी सिडको परिसराला नियमित दिल्याची नोंद आहे. जर सिडकोला रोज ५० एमएलडीच्या आसपास पाणीपुरवठा होत आहे, तर मग पाणीपुरवठ्यावरून बोंब का होत आहे, असा प्रश्न आहे.

आयुक्तांकडे दुसऱ्यांदा बैठक

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे पाणीपुरवठ्यावरून सोमवारी झालेली दुसरी बैठक होती. आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाणीपुरवठ्यावरून बैठक झाली. वितरणात ब्रेकडाऊनमुळे अडचण येत असल्याची माहिती समोर आली आहे. जलकुंभ भरण्यासाठी १७ ते १८ तास लागतात, ब्रेकडाऊन झाल्यास पाणीपुरवठ्याला विलंब होतो. शिवाय टँकरचा भरणा होत असल्याची व पाणीपुरवठा शिफ्टची माहिती बैठकीत मनपा अधिकाऱ्यांनी दिली. शेंद्रा आणि वाळूज येथे टँकर भरणा करण्यासाठी सुचविले आहे. गळत्यांची दुरुस्ती व्हावी, तसेच पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच किमान दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल याचे नियोजन करण्यासाठी चर्चा झाली. बैठकीला मनपा आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर व मनपा आयुक्त डॉ. विनायक यांनी दुपारनंतर एक्स्प्रेस जलवाहिनी, त्यावरील बायपास व गळत्यांची पाहणी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई