शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही इतकी मदत युती सरकारने केली - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 14:52 IST

आघाडी सरकारने  ७०,००० कोटींची कर्जमाफी केली, पण ते हे सांगत नाही की, महाराष्ट्रात केवळ ४००० कोटी रुपये फक्त दिले, १५ वर्षात त्यांनी फक्त एकदा दिले, तर डांगोरा पिटतात. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही, इतकी मदत युती सरकारने केली असा दावा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला 

औरंगाबाद -  आघाडी सरकारने  ७०,००० कोटींची कर्जमाफी केली, पण ते हे सांगत नाही की, महाराष्ट्रात केवळ ४००० कोटी रुपये फक्त दिले, १५ वर्षात त्यांनी फक्त एकदा दिले, तर डांगोरा पिटतात. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही, इतकी मदत युती सरकारने केली असा दावा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला. 

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एअर स्ट्राइकनंतर संपूर्ण देश हवाई दलाचं कौतुक करत होता तर काहीजण एअर स्ट्राइकवर संशय घेत होते यावर मी काही बोलणार नाही. हा देश देशप्रेमींच्या सोबतच राहणार आहे, देशभक्तीने ओतप्रोत सरकार पुन्हा निवडण्याची जबाबदारी आपली आहे. हा नवा भारत आहे. आपली ताकद दाखविणारा हा भारत आहे. शत्रुची वाकडी नजर ठेचणारा हा भारत आहे त्यामुळे कोणाला निवडून द्यायचं हे लोकं ठरवतील. 

तसेच खोतकर-दानवे फेविकॉलचा जोड होणार आहे, कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन प्रचार करावा, भाजपा आणि शिवसेना एकमेकांना बोलले, पण मनाने आपण कधीच वेगळे झाले नव्हतो. सत्तेसाठी हे दोन पक्ष कधीच एकत्र आले नाही. मातृभूमीवर प्रेम करणारे नेहमीच एकमेकांच्या सोबत राहतात त्याचसोबत २४ तारखेला कोल्हापूर येथे महायुतीचे सर्व सहयोगी उपस्थित असतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगत विरोधकांनो काळजी करू नका. तुम्ही कितीही काडी केली, तरी सगळे सोबत राहणार आहेत असा टोला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लगावला. 

औरंगाबादच्या समांतर पाणी पुरवठ्याच्या योजनेचा प्रश्न केवळ युतीचे सरकारच सोडवू शकते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाच्या सुविधा निर्माण होत आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ८ ही जागा भाजपा-शिवसेनेच्याच निवडून येतील, यात अजिबात शंका नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना