शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही इतकी मदत युती सरकारने केली - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 14:52 IST

आघाडी सरकारने  ७०,००० कोटींची कर्जमाफी केली, पण ते हे सांगत नाही की, महाराष्ट्रात केवळ ४००० कोटी रुपये फक्त दिले, १५ वर्षात त्यांनी फक्त एकदा दिले, तर डांगोरा पिटतात. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही, इतकी मदत युती सरकारने केली असा दावा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला 

औरंगाबाद -  आघाडी सरकारने  ७०,००० कोटींची कर्जमाफी केली, पण ते हे सांगत नाही की, महाराष्ट्रात केवळ ४००० कोटी रुपये फक्त दिले, १५ वर्षात त्यांनी फक्त एकदा दिले, तर डांगोरा पिटतात. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही, इतकी मदत युती सरकारने केली असा दावा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला. 

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एअर स्ट्राइकनंतर संपूर्ण देश हवाई दलाचं कौतुक करत होता तर काहीजण एअर स्ट्राइकवर संशय घेत होते यावर मी काही बोलणार नाही. हा देश देशप्रेमींच्या सोबतच राहणार आहे, देशभक्तीने ओतप्रोत सरकार पुन्हा निवडण्याची जबाबदारी आपली आहे. हा नवा भारत आहे. आपली ताकद दाखविणारा हा भारत आहे. शत्रुची वाकडी नजर ठेचणारा हा भारत आहे त्यामुळे कोणाला निवडून द्यायचं हे लोकं ठरवतील. 

तसेच खोतकर-दानवे फेविकॉलचा जोड होणार आहे, कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन प्रचार करावा, भाजपा आणि शिवसेना एकमेकांना बोलले, पण मनाने आपण कधीच वेगळे झाले नव्हतो. सत्तेसाठी हे दोन पक्ष कधीच एकत्र आले नाही. मातृभूमीवर प्रेम करणारे नेहमीच एकमेकांच्या सोबत राहतात त्याचसोबत २४ तारखेला कोल्हापूर येथे महायुतीचे सर्व सहयोगी उपस्थित असतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगत विरोधकांनो काळजी करू नका. तुम्ही कितीही काडी केली, तरी सगळे सोबत राहणार आहेत असा टोला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लगावला. 

औरंगाबादच्या समांतर पाणी पुरवठ्याच्या योजनेचा प्रश्न केवळ युतीचे सरकारच सोडवू शकते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाच्या सुविधा निर्माण होत आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ८ ही जागा भाजपा-शिवसेनेच्याच निवडून येतील, यात अजिबात शंका नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना