शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सर्वांचीच दारोमदार मतविभागणीवर, महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमचेही सारे लक्ष ‘वंचित’कडे

By शांतीलाल गायकवाड | Updated: May 3, 2024 09:21 IST

शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ उभ्या फुटीमुळे यावेळेस शिवसेना विरुद्ध  शिवसेना असे युद्ध लढणार आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने सतत सहाव्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच  पसंती दिली आहे.

शांतीलाल गायकवाड

छत्रपती संभाजीनगर : राज्याची पर्यटन राजधानी व मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेत तुल्यबळ  उमेदवारांचे भवितव्य मतविभागणी कशी होते, यावर ठरणार आहे.  महायुती, महाविकास आघाडी व ‘एमआयएम’चे उमेदवार  जीवतोड मेहनत करीत असले तरी बहुतेक उमेदवाराने  प्रतिस्पर्ध्यांची मते विभाजीत करण्यासाठी मोठ्या संख्येने ‘मतकटवे’ उभे केलेत. त्यामुळे एकूण उमेदवारांची संख्या तब्बल ३७ वर पोहोचली असून आतापर्यंतच्या  निवडणुकीतील हा उच्चांक ठरला.

शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ उभ्या फुटीमुळे यावेळेस शिवसेना विरुद्ध  शिवसेना असे युद्ध लढणार आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने सतत सहाव्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच  पसंती दिली आहे. गेल्या निवडणुकीचा (२०१९) अपवाद वगळता सतत चार वेळेस या मतदारसंघातून खैरे  यांनी विजयश्री प्राप्त केली.

प्रचारात गाजत असलेले मुद्दे

            ‘मंदिरवाला पाहिजे की, दारूवाला’ ही घोषणाच खैरे यांचे कार्यकर्ते देत आहेत.

            खैरे या मतदारसंघातून सतत चार वेळेस खासदार होते. त्यांनी विकासाऐवजी मंदिराच्या वाऱ्या केल्याच्या तक्रारी अधिक आहेत.

            शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोणीच  सोडवू शकले नाही, अशी सार्वत्रिक तक्रार आहे.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...

 महायुतीकडून राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट, आ. रमेश बोरनारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली  आहे.

 चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रयत्नशील आहेत. खैरेंच्या विजयामुळे त्यांचे नेतृत्व झळाळून निघेल.

 जलील यांच्यासाठी पक्षप्रमुख असदोद्दीन ओवेसी यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

दोन दशकांपासून औरंगाबादचा पाणीप्रश्न गाजतो आहे; परंतु अद्यापही औरंगाबादकरांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा.

औरंगाबादेत डीएमआयसी येऊन एक दशक झाले. या वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध; परंतु एकही अँकर प्रोजेक्ट नाही.

चंद्रकांत खैरे चार वेळेस या मतदारसंघाचे खासदार राहिले; परंतु त्यांना मतदारसंघाचा विकास करता आला नाही.

संदीपान भुमरे हे मतदारसंघाबाहेरचे असून त्यांनी त्यांचा दारू व्यवसाय प्रारंभी लपविल्याने प्रचारात आली दारू.

२०१९ मध्ये काय घडले ?

इम्तियाज जलील        एमआयएम (विजयी)     ३,८९,०४२

चंद्रकांत खैरे     (शिवसेना)      ३,८४,५५०

हर्षवर्धन जाधव  ( अपक्ष )       २,८३,७९८

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

वर्ष     विजयी उमेदवार पक्ष    टक्के

२०१४   चंद्रकांत खैरे     शिवसेना ५३.०३

२००९   चंद्रकांत खैरे     शिवसेना ४२.०८

२००४   चंद्रकांत खैरे     शिवसेना ५२.०४

१९९९   चंद्रकांत खैरे     शिवसेना ४२.३

१९९८   रामकृष्ण बाबा पाटील    काँग्रेस  ४९.५

कुणाकडे किती पाठबळ?

            भुमरे यांच्या मागे भाजपसह शिंदेसेना व अजित पवार गटाचे पाठबळ आहे.

            खैरे यांच्या मागे शिवसेनेचे संघटनात्मक बळ मोठे आहे.

            खा. इम्तियाज जलील यांनी नशेखोरी, आदर्श बँक घोटाळ्यात घेतलेल्या पुढाकाराने गुंतवणूकदार पाठीशी.

एकूण मतदार    २०,६१,२२०

१०,७७,८०९

पुरुष

९,८१,७७३

महिला

१२८ इतर

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४