शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

lok sabha election 2019 : काँग्रेसचा उमेदवार कोण? याचीच चर्चा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:33 IST

हर्षवर्धन जाधव यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

- नजीर शेख  

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अद्याप कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी आता काँग्रेसकडून आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव समोर आल्याने आणि वंचित आघाडीतर्फे एमआयएमचा उमेदवार मैदानात असेल, या घोषणेमुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चांगलाच रंग भरण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मराठवाडास्तरीय मेळाव्याने युतीच्या प्रचाराची सुरुवात झाली. युतीतर्फे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचे नाव निश्चित आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही. आ. सुभाष झांबड यांचे नाव काँग्रेसतर्फे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. 

काँग्रेस पक्षाने केंद्रीय समितीकडे पाठविलेल्या नावांमध्येदेखील सुभाष झांबड यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. या यादीत काँग्रेसने राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव टाकून काँग्रेस कार्यकर्त्यांना अचंबित करून टाकले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी तिसरे नाव कन्नडचे शिवसेना बंडखोर आमदार हर्षवर्धन पाटील यांचे असल्याचे सांगून आणखी मोठा धक्का दिला. आता जाधव यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

एमआयएममुळे कॉंग्रेसची अडचण

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे हे राजकीयदृष्ट्या प्रबळ आहेत. युती झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु असतानाच एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर करून काँग्रेसची अडचण केली आहे. या मतदारसंघातील दलित आणि मुस्लिम मतांची संख्या पाहता युती आणि काँग्रेस आघाडी या दोन्हींच्या संघर्षात वंचित आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, अशी त्यांची अटकळ आहे. एमआयएमकडून औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांचे नाव सर्वात पुढे आहे. काँग्रेसकडून नावे चर्चेत आहेत. मात्र, कोणता उमेदवार असेल हे निश्चित मानले जाऊ शकत नाही. 

काँग्रेससमोर मोठे आव्हाननगरसेवकपदापासून खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करेपर्यंत पराभव न पाहणारे, तसेच अंतुले यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करण्याची क्षमता असणाऱ्या खैरे यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देणे हे काँग्रेसमोरील मोठे आव्हान आहे. मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये खैरे निवडून आले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच अधिक चर्चा होत असते. यावेळीही ही चर्चा चालूच आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस