शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

lok sabha election 2019 : काँग्रेसचा उमेदवार कोण? याचीच चर्चा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:33 IST

हर्षवर्धन जाधव यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

- नजीर शेख  

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अद्याप कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी आता काँग्रेसकडून आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव समोर आल्याने आणि वंचित आघाडीतर्फे एमआयएमचा उमेदवार मैदानात असेल, या घोषणेमुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चांगलाच रंग भरण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मराठवाडास्तरीय मेळाव्याने युतीच्या प्रचाराची सुरुवात झाली. युतीतर्फे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचे नाव निश्चित आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही. आ. सुभाष झांबड यांचे नाव काँग्रेसतर्फे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. 

काँग्रेस पक्षाने केंद्रीय समितीकडे पाठविलेल्या नावांमध्येदेखील सुभाष झांबड यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. या यादीत काँग्रेसने राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव टाकून काँग्रेस कार्यकर्त्यांना अचंबित करून टाकले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी तिसरे नाव कन्नडचे शिवसेना बंडखोर आमदार हर्षवर्धन पाटील यांचे असल्याचे सांगून आणखी मोठा धक्का दिला. आता जाधव यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

एमआयएममुळे कॉंग्रेसची अडचण

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे हे राजकीयदृष्ट्या प्रबळ आहेत. युती झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु असतानाच एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर करून काँग्रेसची अडचण केली आहे. या मतदारसंघातील दलित आणि मुस्लिम मतांची संख्या पाहता युती आणि काँग्रेस आघाडी या दोन्हींच्या संघर्षात वंचित आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, अशी त्यांची अटकळ आहे. एमआयएमकडून औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांचे नाव सर्वात पुढे आहे. काँग्रेसकडून नावे चर्चेत आहेत. मात्र, कोणता उमेदवार असेल हे निश्चित मानले जाऊ शकत नाही. 

काँग्रेससमोर मोठे आव्हाननगरसेवकपदापासून खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करेपर्यंत पराभव न पाहणारे, तसेच अंतुले यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करण्याची क्षमता असणाऱ्या खैरे यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देणे हे काँग्रेसमोरील मोठे आव्हान आहे. मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये खैरे निवडून आले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच अधिक चर्चा होत असते. यावेळीही ही चर्चा चालूच आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस