शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तारांच्या जवळिकीमुळे भाजपात वाढतेय अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:07 IST

मुख्यमंत्र्यांना वरिष्ठांनी सांगावे; पक्षात घेतल्यास अनेक जण होणार नाराज

औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आ. अब्दुल सत्तार यांची भाजपसोबत जवळीक वाढू लागल्यामुळे पक्षातील अनेकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आ. सत्तार यांना पक्षात घेतल्यास मोठा परिणाम होईल. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन नये, याबाबत मुख्यमंत्र्यांना स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी लेखी कळवावे, असे मत काही संघटन पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे गुरुवारी सकाळी व्यक्त केल्याची माहिती आहे. 

बुधवारी रात्री प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सूतगिरणी चौकातील बंगल्यावर मुकुंदवाडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर ते खाजगी विमानाने मुंबईला एका बैठकीसाठी गेले, त्यांच्यासोबत आ. सत्तार हेदेखील होते. आ. सत्तार आणि खा. दानवे हे एकाच विमानातून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची वार्ता भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. सकाळपासूनच येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांकडे फोनवरून आपापल्या संतप्त भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी किंवा शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांची याप्रकरणी एक गुप्त बैठकदेखील होणे शक्य आहे. दरम्यान, खा. दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आ. सत्तार हे विमानात सोबत नव्हते. त्यांना भाजपचे सर्व दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट केले, तर आ. सत्तार म्हणाले की, खा. दानवे यांनी मला विमानातून मुंबईला का नेले, हे तेच सांगू शकतील, सध्या भाजपमध्ये जाण्याचा विषय नसल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. 

...तर भाजपचे राजकीय नुकसानभाजपमधील एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आ. सत्तार यांचा पक्ष प्रवेश झाल्यास पक्षाला मोठा फटका बसेल. औरंगाबाद आणि जालन्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या त्याचा फायदा होईल. शिवसेनेला आपोआप ताकद मिळेल. त्यामुळे सत्तार यांना पक्षात घेण्यात येऊ नये, असा संदेश भाजप संघटनमंत्र्यांकडे पाठविला आहे. त्यासोबतच इतर नेत्यांनादेखील याबाबत कळविले आहे. त्यामुळे सत्तार यांचा पक्षप्रवेश होईल, अशी शक्यता सध्या तरी नाही. जर प्रवेश झाला, तर भाजपचे राजकीय नुकसान होईल, असे सदरील पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांशी दोन तास झाली चर्चा : अब्दुल सत्तारकाल रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्यासमवेत एकाच विमानात आम्ही मुंबईला गेलो व रात्रीच दोन तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली, असे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. या त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार नाही. कालच सत्तार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. ‘आ. इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा करून मी  मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी हैदराबादेत एमआयएमचे सुप्रिमो असदुद्दीन ओवेसी यांचीही भेट घेणार आहे’ असेही सत्तार यांनी सांगितले. रावसाहेब दानवे यांच्याबरोबर कसे, असे विचारता सत्तार उत्तरले, आता मी अपक्ष आहे. त्यामुळे मी कुणासोबत जावे व कोणाबरोबर राहावे हा माझा प्रश्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Abdul Sattarअब्दुल सत्तारaurangabad-pcऔरंगाबादBJPभाजपा