शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : युतीने मराठवाड्यात दोन खासदारांना उमेदवारी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:12 IST

तिकीट न मिळाल्याने खासदार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे.

औरंगाबाद : भाजप आणि शिवसेनेने मराठवाड्यातील उमेदवार यादी प्रसिद्ध केली. यात शिवसेनेने उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड आणि भाजपने लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना उमेदवारी दिली नाही. दोन्ही विद्यमान खासदार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे. दरम्यान, दोघांनीही पक्षाचा निर्णय मान्य असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पडू असे स्पष्ट केले आहे. 

शिवेसनेकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, हिंगोली आणि उस्मानाबाद या मतदारसंघात नवीन चेहरे देण्यात आले आहेत. त्यामध्ये, उस्मानाबादसाठी आमदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने संधी दिली आहे. तर, हिंगोलीतून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली आहे. खा. गायकवाड यांची वाद्ग्रस्थ प्रतिमा यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे.  यासोबतच भाजपने सुद्धा लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना धक्का देत त्यांना उमेदवारी नाकारली. सुनील गायकवाड यांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसोबतचे संबंध सुरळीत नसल्याने त्यांना याचा फटका बसल्याचे बोले जात आहे.    

का कापली उस्मानाबादमधून गायकवाडांची उमेदवारी ?महाराष्ट्र सदनात रोजेकऱ्यासोबत झालेला वाद, त्यानंतर विमान कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर खासदार रवी गायकवाड देशभर चर्चेत आले. मतदारसंघात ‘नॉट रिचेबल खासदार’ अशीच चर्चा त्यांच्या पदरी पडली़ खासदार निधी पूर्ण खर्च केला तरी दृश्यविकास झाला नाही, असाही प्रसार झाला़ याचेच भांडवल करीत सेनेचे उपनेते आ़ तानाजी सावंत यांच्या गटाने ‘मातोश्री’वर फिल्डिंग लावली़ जवळपास आठ-दहा दिवस तेथेच तळ ठोकून या गटाने गायकवाडांचा पत्ता कापत ओमराजेंची उमेदवारी आणली आहे़ 

लातुरात खासदारांचा पालकमंत्र्यांवर ठपकाभाजपा लातूर लोकसभेचा उमेदवार बदलणार ही चर्चा अखेर खरी ठरली. विद्यमान खासदारांना तिकीट नाकारत अपेक्षेप्रमाणे सुधाकर शृंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शेवटपर्यंत आपणाला तिकीट मिळणार, असा विश्वास असणारे खा. गायकवाड यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. ते म्हणाले, माझ्या कामावर मी समाधानी आहे. सरळ राजकारण केले. पक्षात गटबाजी केली नाही. संसदीय कामकाजात सहभाग नोंदविला. अडीच लाखांच्या फरकाने निवडून आलो होतो. शिवाय, माझ्यासारखे काम खुल्या जागेवर करणारा खासदार असता तर त्याचे तिकीट कापले गेले नसते, असे शल्य व्यक्त करीत खा. गायकवाड म्हणाले, स्थानिक नेतृत्वाने विरोध केला. माध्यमे उघडपणे पालकमंत्र्यांचे नाव घेत आहेत. त्यामुळे मला तिकीट मिळाले नाही, यामागे पक्षश्रेष्ठी नसून स्थानिकांचा हातभार आहे. कोणाला कशी उमेदवारी मिळाली, हे सर्वज्ञात आहे.

दरम्यान, उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, उमेदवारीचा निर्णय पक्षाने घेतला. तो सर्वांना मान्य आहे. खा.डॉ. हे माझे मित्र आहेत. त्यांच्याशी कसलेही मतभेद नाहीत. यापुढेही ते पक्षाचे काम आणि प्रचार करतील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा