शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:57 PM

एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.

ठळक मुद्देहैदराबादेत येथील बैठकीत झाला निर्णयमुंबईत निवडणूक लढविणार नाही 

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा घेतला. हैदराबाद येथे पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडणुकीत उमेदवार म्हणून आ. इम्तियाज जलील यांचे नाव निश्चित करण्यात आले. पक्ष मुंबईत एकही जागा लढविणार नसून औरंगाबादमध्ये आपणच उमेदवार असल्याची माहिती आ. जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांचे नाव सर्वात अगोदर जाहीर झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही सुभाष झांबड यांच्या नावाची घोषणा केली. एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. एमआयएमने ही निवडणूक लढविल्यास मुस्लिम, दलित मतांचे विभाजन होईल, याचा थेट फायदा युतीला होईल, असाही सूर होता. औरंगाबाद आणि मुंबई येथील लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढवावी, असे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच जाहीर केले. कारण वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे नाव त्यांनी जाहीर केले होते. या नावाला एमआयएमने विरोध दर्शविला. 

औरंगाबाद, मुंबई येथे लोकसभा निवडणूक लढवावी किंवा नाही याचा अंतिम निर्णय एमआयएमचे प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांच्यावर सोपविण्यात आला. त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील पक्षाच्या ‘दार-उस्स-सलाम’या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत औरंगाबादहून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मत जाणून घेण्यात आले. बहुतांश नगरसेवकांनी लोकसभा निवडणूक लढवावी, उमेदवार म्हणून इम्तियाज जलील योग्य उमेदवार असल्याचे पुन्हा नमूद केले. मात्र, यावेळी अंतिम निर्णय झाला नाही. रात्री ८ वा. बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री ८ वा. बैठकीला सुरुवात झाली. तब्बल तीन तास बैठक सुरू होती. रात्री ११ वा. अंतिम निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्वत: इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’ला दिली. 

कार्यकर्त्यांचा आग्रहऔरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढवावी, असा सूर कार्यकर्त्यांचा होता. यासंदर्भात स्थानिक पातळीवर दोन वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या. लोकसभेसाठी आ. इम्तियाज जलील योग्य उमेदवार असल्याचा निर्वाळाही कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांसमोर दिला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलील