शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मोदी-फडणवीसांच्या कामांमुळे महाराष्ट्रात आघाडीचा ‘व्हाईटवॉश’ होणार : शाहनवाज हुसैन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:15 IST

देशात भाजपा ३०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे केले भाकित

ठळक मुद्देमोदी-फडणवीसांच्या कामांचा परिणाम शाहनवाज हुसैन यांचा दावा 

औरंगाबाद : देशातील जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहे. जनतेनेच स्वत: मोदी असल्याचे समजून कामाला सुरुवात केली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर राज्ये आणि केरळमध्ये पक्षाला मोठे यश मिळणार आहे. महाराष्ट्रातही मोदींच्या तोडीचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ‘व्हाईटवॉश’ मिळणार आहे. ४८ जागांवर आघाडीचा सुपडासाफ करत भाजप-शिवसेना मुसंडी मारणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि केंद्रीय निवडणूक मंडळाचे सदस्य शाहनवाज हुसैन यांनी केला.

जालना जिल्ह्यातील युतीचे उमेदवार खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारसभांसाठी शाहनवाज हुसैन औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील विविध राज्यांचा दौरा केला आहे. त्यामध्ये मोदी विरोधात सर्व असाच सामना रंगला आहे. देशातील जनतेला मोदी हवे आहे. विरोधी पक्षांना मोदी नको आहेत. मोदींना जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांनी इव्हीएम मशिनवर राग काढण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आंधप्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांची अवस्था बिकट बनली. ते आता माजी मुख्यमंत्री बनणार आहेत. याशिवाय भाजपच्या पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, पर्वोत्तर राज्यामध्ये भाजपच्या जागा वाढणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मागील वेळा ७३ जागा निवडून आल्या होत्या. यावेळी ७४ जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. देशात सगळीकडे मोदी यांच्याच नावाचा बोलबाला आहे. 

वंचित बहुजन आघाडी सोबत संबंध नाही

महाराष्ट्रात मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकही जागा निवडूण येणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ही भाजपची बी टिम असल्याचा आरोप होत आहे, यावर बोलताना शाहनवाज हुसैन म्हणाले, दोन्ही पक्षांची स्वतंत्र विचारधारा आहे. एमआयएमसोबत भाजप कधीही जाऊ शकत नाही, त्यांच्याशी आमचे कोणतेही संबंध नाही. दोघांचे मार्ग वेगळे असल्यामुळे काँग्रेसकडून होत असलेले आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आझम खान यांनी मर्यादा ओलांडल्याउत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपुर लोकसभाा मतदार संघाचे उमेदवार  आझम खान यांनी भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडणारे आहे. त्यांची विचार करण्याची पद्धतच घाणेरडी आहे. त्यांच्या विचारात व्हायरस आहे. त्या व्हायरसने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता त्यांना रामपूरसह उत्तरप्रदेश आणि देशातील महिला माफ करणार नाहीत. त्यांचा पराभव हा निश्चितच होणार असल्याचेही शाहनवाज हुसैन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपा