शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

Lok Sabha Election 2019 : अब्दुल सत्तार यांनी घेतला समर्थकांचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 20:56 IST

निवडणूक लढवू का?  हो... : काँग्रेसतर्फे की अपक्ष?  काँग्रेसतर्फे...

औरंगाबाद : जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज रात्री आमखास मैदानावर आपल्या समर्थकांचा कौल घेतला. त्यांना तीन प्रश्न विचारले. लोकसभा निवडणूक लढवू का? या प्रश्नावर उत्तर आले, हो... दुसरा प्रश्न विचारला की, काँग्रेसतर्फे लढवू का? यावर उत्तर आले, हो... आणि तिसरा प्रश्न विचारला अपक्ष लढू का? उत्तर आले... नाही, नाही! या प्रश्नांनंतर सत्तार यांनी भाषणच थांबवले. समर्थकांनी जो निर्णय दिला त्यावर कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. इथेच सभा संपवली व शेवटी आभारही कुणी मानले नाहीत.  

गेली अनेक दिवस येणकेण प्रकारेण अब्दुल सत्तार हे माध्यमांमध्ये झळकत आहेत. चर्चेत आहेत; परंतु माझा  बॉल आता समर्थकांच्या कोर्टात गेला आहे. त्यांचा कौल घेऊन व त्यानंतर माझा अंतरात्मा काय बोलतो, त्यानुसार निर्णय घेईन, असे सत्तार यांनी जाहीर केले होते. आता कौल मिळाला आहे.

या सभेत अशोक मगर, संजय जगताप, अफसर खान, दुर्गाबाई शेजवळ, पंकजा माने, गुलाब पटेल, जीतसिंग करकोटक, इलियास किरमाणी, शेख जमील अहमद, मुजाहेद पटेल, प्रा. समाधान गायकवाड, डॉ. शोएब हाशमी आदींची भाषणे झाली. मंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, माजी नगरसेविका मेहरुन्निसाबेगम (मोटेभाभी) यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

जलील यांनी सिल्लोडला येऊन लढावे  एमआयएमचे धोरण नसतानाही इम्तियाज जलील औरंगाबादची लोकसभा कशासाठी लढत आहेत? खैरे जिंकावेत यासाठी का? लोक सर्व समजत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पुढच्या वेळेसची विधानसभा सिल्लोडहून लढवून दाखवावी. नाही तर मी औरंगाबाद मध्यमधून लढून दाखवतो. खैरे आणि संविधानाचा काही संबंध नाही. जाती-धर्माच्या नावावर ते राजकारण करतात. मला जनतेचा सेवक म्हणून काम करायचे आहे. गेल्या वीस वर्षांत केलेली पाच कामे खैरेंनी सांगावीत, असे आव्हान सत्तार यांनी यावेळी दिले.

रामकृष्णबाबांचे बोल...  काँग्रेसने चुकीचा उमेदवार दिला आहे. जिल्ह्यात सत्तार यांच्यामुळे काँग्रेस टिकून आहे. सत्तार यांनी खासदार व्हावे ही जनतेची इच्छा आहे आणि काँग्रेसने त्यांनाच तिकीट द्यावे, जिंकून आणण्याची जबाबदारी माझी राहील. यापूर्वीही मी त्यांना खूप मदत केली आहे, अशा शब्दांत माजी खासदार रामकृष्णबाबा यांनी भावना व्यक्त केली. खैरे काय माणूस आहे का? या त्यांच्या वाक्याने हास्यकल्लोळ झाला. मागील काही निवडणुकांचा आढावा घेत ते इतिहासात रममाण झाले आणि अजूनही माझ्यात तीच धमक आहे, असे बजावले. मागच्या वेळी मी मुस्लिम बांधवांमुळे खासदार झालो होतो, असे त्यांनी नमूद केले. पक्षश्रेष्ठींशीच चर्चा करणार...सभा संपल्यानंतर पत्रकारांनी सत्तार यांना गाठले. ते म्हणाले, मी काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढवावी, असा कौल अधिक असल्याने आता मी काँग्रेसच्या दिल्लीतील व मुंबईतील नेत्यांशी चर्चा करीन. माझा अंत:करणातील नेता, जो नांदेडमध्ये बसला आहे, त्याच्याशी चर्चा करीन आणि मग निर्णय घेईन. 

इम्तियाज जलील व खैरेंवर टीकेची झोड... आजच्या सभेत सत्तार यांनी काँग्रेस पक्ष, काँग्रेसची श्रेष्ठी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण काँग्रेसचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांच्यावर कुठेही टीका केली नाही. उलट एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील व शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांना त्यांनी टीकेचे लक्ष्य केले. पाकिस्तानने भारताचे चाळीस अतिरेकी मारले, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य निषेधार्ह असून, त्यांनी भारतीय सैनिकांचा मोठा अपमान केला आहे; पण ते असे बोलले तरी काही नाही. आम्ही बोललो असतो तर देशद्रोही ठरलो असतो, अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी नोंदवली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तार