शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसच्या यादीत असू शकते राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:58 IST

तिकीट कुणालाही मिळो आम्ही यावेळी विजयश्री खेचून आणणारच

ठळक मुद्देऔरंगाबाद, जालना लोकसभा काँग्रेसच लढणार!अब्दुल सत्तार यांनी रवींद्र बनसोड शर्यतीतून बाद झाल्याचे सांगितले 

औरंगाबाद : लोकसभेच्या औरंगाबाद व जालना मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार निवडणूक लढतील व उमेदवारीसंबंधीचा पक्षश्रेष्ठी घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य राहील. तसेच  जालना मतदारसंघात मी व डॉ. कल्याण काळे यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही दोघांनी एकमेकांचे प्रचार प्रमुख बनून एकमेकाला निवडून आणण्याची हमी घेत आहोत, असे आज येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले. 

काँग्रेसच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण यांचेही नाव असू शकते, असे सांगायलाही सत्तार विसरले नाहीत. हे नाव चालेल का, असे विचारता पक्षश्रेष्ठींनी त्यांना काँग्रेसचे तिकीट दिल्यास का नाही चालणार, असा सवाल  केला. 

आ. सुभाष झांबड हे माझे चांगले मित्र आहेत. पण मध्यंतरी मी बुथ कमिट्यांच्या प्रश्नावरून नाराज होतो, असे नमूद करून स्पर्धेत त्यांचे नाव पुढे आहे. नामदेव पवार यांचेही नाव आहे, असे त्यांनी नमूद केले. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून प्रा. रवींद्र बनसोड यांचे नाव घेतले जात होते. परंतु आज सत्तार म्हणाले, हे नाव आता मागे पडले आहे. त्यांना गंगापूर विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचे आश्वासन देण्यात आले आहे. 

मला किंवा सत्तार यांच्यापैकी जालन्याचे तिकीट कुणालाही मिळो आम्ही  यावेळी विजयश्री खेचून आणणारच आहोत, अशी ग्वाही दिली. सुभाष झांबड म्हणाले, माझे आणि अब्दुल सत्तार यांचे वैयक्तिक भांडण नाही. औरंगाबादचे तिकीट मला मिळाल्यास जिंकून आणण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून सत्तार यांचीच राहील.नामदेव पवार, किरण पा. डोणगावकर, डॉ.पवन डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते पत्रपरिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जालना लोकसभा यावेळी काँग्रेसच जिंकेलरावसाहेब दानवे यांना आम्ही चकवा देणारच. आम्हाला अर्जुन खोतकर यांचीही साथ मिळेल, असे भविष्य सत्तार यांनी वर्तविले. येत्या १५ मार्चपासून आम्ही सोयगावपासून प्रचारास सुरुवात करीत असल्याचे जाहीर करून सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे लक्षात आले.

मतांपासून वंचित राहीलवंचित बहुजन आघाडीसंदर्भात प्रश्न विचारला असता, अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीच मतांपासून वंचित राहील. काँग्रेस आघाडीवर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. सारे मुस्लिम एमआयएमचे गुलाम नाहीत. औरंगाबादच्या एमआयएमच्या नेत्यांना हैदराबादेत चपराशासारखी वागणूक मिळते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSatish Chavanसतीश चव्हाणChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबाद