शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसच्या यादीत असू शकते राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:58 IST

तिकीट कुणालाही मिळो आम्ही यावेळी विजयश्री खेचून आणणारच

ठळक मुद्देऔरंगाबाद, जालना लोकसभा काँग्रेसच लढणार!अब्दुल सत्तार यांनी रवींद्र बनसोड शर्यतीतून बाद झाल्याचे सांगितले 

औरंगाबाद : लोकसभेच्या औरंगाबाद व जालना मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार निवडणूक लढतील व उमेदवारीसंबंधीचा पक्षश्रेष्ठी घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य राहील. तसेच  जालना मतदारसंघात मी व डॉ. कल्याण काळे यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही दोघांनी एकमेकांचे प्रचार प्रमुख बनून एकमेकाला निवडून आणण्याची हमी घेत आहोत, असे आज येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले. 

काँग्रेसच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण यांचेही नाव असू शकते, असे सांगायलाही सत्तार विसरले नाहीत. हे नाव चालेल का, असे विचारता पक्षश्रेष्ठींनी त्यांना काँग्रेसचे तिकीट दिल्यास का नाही चालणार, असा सवाल  केला. 

आ. सुभाष झांबड हे माझे चांगले मित्र आहेत. पण मध्यंतरी मी बुथ कमिट्यांच्या प्रश्नावरून नाराज होतो, असे नमूद करून स्पर्धेत त्यांचे नाव पुढे आहे. नामदेव पवार यांचेही नाव आहे, असे त्यांनी नमूद केले. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून प्रा. रवींद्र बनसोड यांचे नाव घेतले जात होते. परंतु आज सत्तार म्हणाले, हे नाव आता मागे पडले आहे. त्यांना गंगापूर विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचे आश्वासन देण्यात आले आहे. 

मला किंवा सत्तार यांच्यापैकी जालन्याचे तिकीट कुणालाही मिळो आम्ही  यावेळी विजयश्री खेचून आणणारच आहोत, अशी ग्वाही दिली. सुभाष झांबड म्हणाले, माझे आणि अब्दुल सत्तार यांचे वैयक्तिक भांडण नाही. औरंगाबादचे तिकीट मला मिळाल्यास जिंकून आणण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून सत्तार यांचीच राहील.नामदेव पवार, किरण पा. डोणगावकर, डॉ.पवन डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते पत्रपरिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जालना लोकसभा यावेळी काँग्रेसच जिंकेलरावसाहेब दानवे यांना आम्ही चकवा देणारच. आम्हाला अर्जुन खोतकर यांचीही साथ मिळेल, असे भविष्य सत्तार यांनी वर्तविले. येत्या १५ मार्चपासून आम्ही सोयगावपासून प्रचारास सुरुवात करीत असल्याचे जाहीर करून सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे लक्षात आले.

मतांपासून वंचित राहीलवंचित बहुजन आघाडीसंदर्भात प्रश्न विचारला असता, अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीच मतांपासून वंचित राहील. काँग्रेस आघाडीवर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. सारे मुस्लिम एमआयएमचे गुलाम नाहीत. औरंगाबादच्या एमआयएमच्या नेत्यांना हैदराबादेत चपराशासारखी वागणूक मिळते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSatish Chavanसतीश चव्हाणChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबाद