शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

Lockdown In Aurangabad : शहरात शुकशुकाट : रस्ते निर्मनुष्य; कॉलनीत सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:40 IST

कोरोनाची साखळी तोडायची, शहराला वाचवायचे असा निर्धार करूनच नागरिक लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करताना दिसून आले. 

औरंगाबाद: प्रशासनाला जनतेची साथ मिळाली तर काय घडू शकते, याची प्रचिती आज औरंगाबादेत आली. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांनी दिवसभर घरातच बसून आपले कर्तव्य पार पाडले. संपूर्ण बाजारपेठ बंद होती, रस्ते, कॉलन्या निर्मनुष्य झाल्या होत्या. कोरोनाची साखळी तोडायची, शहराला वाचवायचे असा निर्धार करूनच नागरिक लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करताना दिसून आले. 

जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८ हजारच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक वसाहतीत रुग्ण सापडत आहेत. यामुळे औरंगाबाद शहरात आजपासून ९ दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी तेवढ्याच कडकपणे केली जात आहे. चौकचौकात पोलीस बंदोबस्त असून येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनतर्फे जाहीर केल्याप्रमाणे आज शहरातील सर्व औषधी दुकाने बंद होती. फक्त हॉस्पिटलमधील औषधी दुकानेच सुरू ठेवण्यात आली होती. 

जाधववाडी धान्य मार्केट यार्ड, जुना मोंढासह, गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज, रोशनगेट, सिडको, हडको, पुंडलिकनगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, उस्मानपुरासह सर्व बाजारपेठेतील दुकाने बंद होती. यामुळे दिवसभरातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प राहिली. शहरातील २ पेट्रोलपंप वगळता बाकीचे सर्व पेट्रोलपंप बंद होते. बँकामध्ये २५ टक्केच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आले होते. बँकांचे शटर बंद होते पण आत कर्मचारी आपले काम करत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद