शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

Lockdown In Aurangabad : नागरिकांनो सावधान; विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या पोलिसांनाही दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:29 IST

ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दंड आकारला आहे.

औरंगाबाद : लॉकडाऊनची शहरात कडक अंमलबजावणी सुरू असताना विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत असल्याचे आपण पाहातच आहोत. मात्र, पोलिसांनी पोलिसांवर कारवाई केल्याचे पाहिलेले नाही; पण हो सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमध्ये वाहनांवरून विनाकारण फिरणाऱ्या तीन पोलिसांवरच कारवाई झाल्याचे रविवारी पाहावयास मिळाले. 

ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दंड आकारला आहे. ही कारवाई रविवारी (दि.१२) दुपारी साडेबाराच्या सुमारास टीव्ही सेंटर परिसरात करण्यात आली. शहरात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने १० ते १८ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले. गेल्या दोन दिवसांपासून शहर पोलीस प्रशासन लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे. सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि त्यांचे पथक हे गेल्या दोन दिवसांपासून सिडको परिसरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोन दिवसांपासून टीव्ही सेंटर, जाधववाडी चौक परिसरात काही ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारीे फिरताना दिसून येत होते. अशोक गिरी हे टीव्ही सेंटर परिसरात गस्त घालत असताना एक जण दुचाकी चालवीत असताना मोबाईलवर बोलताना दिसला. त्याला अडवून गिरी यांनी विचारपूस केली तेव्हा त्याने आपण ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगितले

पोलीस कर्मचारी असताना दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलतो. त्यामुळे गिरी यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला दंड आकारला. त्यानंतर पुन्हा एका दुचाकीवर दोन पोलीस कर्मचारी बसून जाताना दिसले. त्यांना अडविल्यावर त्यांनीही ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगितले. त्या दोघांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांना एक न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा असा दुजाभाव नको, या भावनेतून गिरी यांनी या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. 

१८४४ वाहनधारकांंवर गुन्हे दाखललॉकडाऊन असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर तीन दिवसांत शहरी भागात १८४४ वाहनधारकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.शहर विभाग-  ७३, सिडको विभाग-६९, छावणी विभाग-१७, वाळूज विभाग-३१, असे एकूण १९० गुन्हे दाखल असून, रविवारी सायंकाळपर्यंत कलम १८८ प्रमाणे औरंगाबाद शहरात २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ८१,५०० रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद