शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

Lockdown In Aurangabad : नागरिकांनो सावधान; विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या पोलिसांनाही दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:29 IST

ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दंड आकारला आहे.

औरंगाबाद : लॉकडाऊनची शहरात कडक अंमलबजावणी सुरू असताना विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत असल्याचे आपण पाहातच आहोत. मात्र, पोलिसांनी पोलिसांवर कारवाई केल्याचे पाहिलेले नाही; पण हो सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमध्ये वाहनांवरून विनाकारण फिरणाऱ्या तीन पोलिसांवरच कारवाई झाल्याचे रविवारी पाहावयास मिळाले. 

ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दंड आकारला आहे. ही कारवाई रविवारी (दि.१२) दुपारी साडेबाराच्या सुमारास टीव्ही सेंटर परिसरात करण्यात आली. शहरात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने १० ते १८ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले. गेल्या दोन दिवसांपासून शहर पोलीस प्रशासन लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे. सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि त्यांचे पथक हे गेल्या दोन दिवसांपासून सिडको परिसरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोन दिवसांपासून टीव्ही सेंटर, जाधववाडी चौक परिसरात काही ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारीे फिरताना दिसून येत होते. अशोक गिरी हे टीव्ही सेंटर परिसरात गस्त घालत असताना एक जण दुचाकी चालवीत असताना मोबाईलवर बोलताना दिसला. त्याला अडवून गिरी यांनी विचारपूस केली तेव्हा त्याने आपण ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगितले

पोलीस कर्मचारी असताना दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलतो. त्यामुळे गिरी यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला दंड आकारला. त्यानंतर पुन्हा एका दुचाकीवर दोन पोलीस कर्मचारी बसून जाताना दिसले. त्यांना अडविल्यावर त्यांनीही ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगितले. त्या दोघांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांना एक न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा असा दुजाभाव नको, या भावनेतून गिरी यांनी या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. 

१८४४ वाहनधारकांंवर गुन्हे दाखललॉकडाऊन असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर तीन दिवसांत शहरी भागात १८४४ वाहनधारकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.शहर विभाग-  ७३, सिडको विभाग-६९, छावणी विभाग-१७, वाळूज विभाग-३१, असे एकूण १९० गुन्हे दाखल असून, रविवारी सायंकाळपर्यंत कलम १८८ प्रमाणे औरंगाबाद शहरात २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ८१,५०० रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद