शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

औरंगाबादमध्ये ‘लॉकडाउन’मुळे ५,५०० कोटींची उलाढाल ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 05:18 IST

‘कोरोना’चा दणका : उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘लॉकडाउन’मुळे संपूर्ण देशभरातील उद्योग १४ एप्रिलपर्यंत ठप्प राहणार आहेत. या कालावधीत औरंगाबाद परिसरातील उद्योगांची सुमारे ५ हजार ५०० कोटींची उलाढाल ठप्प होणार असून, पुढील किमान सहा महिने तरी या परिस्थितीतून सावरण्यासाठी उद्योगांना संघर्ष करावा लागणार आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २२ मार्चपासून ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आला आहे. एकट्या औरंगाबाद परिसरातील प्रमुख चारही उद्योगनगरींतील जवळपास ३ हजार ५०० उद्योग बंद आहेत. या उद्योगांवर आधारित लघुउद्योग, वाहतूक, कामगार, कर्मचारी आदी सर्वांचेच कंबरडे मोडले आहे.यासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, १४ एप्रिलपर्यंत तीन आठवडे उद्योग बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे उद्योगांना वर्षभराच्या नफ्याला मुकावे लागणार आहे. याचे परिणाम पुढील किमान सहा महिने तरी तीव्रपणे जाणवतील. उद्योगाच्या सर्व साखळीवर हा परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्योग, कामगार, सरकार, बँका, ग्राहक यांनी एकत्रितपणे नियोजन करून पुढे जावे लागणार आहे.सध्याच्या परिस्थितीमुळे उद्योगांचे आर्थिक चक्र कोलमडले आहे. उद्योगात नोकरकपातही अटळ आहे. पुढे काही दिवसांनंतर उद्योग सुरू होतील; परंतु तेव्हा उत्पादनाला मार्केटमध्ये उठाव येईल का, ग्राहकांकडून आॅर्डर्स येतील का, ग्राहकांकडून जुने येणे मिळेलका, ट्रान्सपोर्ट सुरू होईल का आदी चिंता उद्योजकांना भेडसावणार आहेत.सध्या कामगार, कर्मचाऱ्यांचे वेतन बँकेत जमा करण्यासाठी उद्योजकांची लगबग सुरू आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून कारखान्यात जाण्यासाठी परवानगी घेतली जात आहे. उद्योगांमध्ये दरमहा ५ ते १० तारखेला वेतन अदा केले जाते. बहुतांशी उद्योगांत ‘आरटीजीएस’ प्रणालीद्वारेच थेट बँकेत वेतन जमा केले जाते, असे ‘सीएमआयए’चे सचिव शिवप्रसाद जाजू यांनी सांगितले.‘वेट अ‍ॅण्ड वॉच’अशी परिस्थिती-‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, पुढे काय गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, हे आता तरी कोणीच सांगू शकत नाही. सध्या तरी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशीच परिस्थिती आहे. संपूर्ण जग आणि व्यवसायावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी खचून न जाता पुढे काय करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार, उद्योजक, कर्मचारी, ग्राहक आणि बँका या सर्वांनी एकत्र विचार करून या आर्थिक आपत्तीतून बाहेर पडण्याचा विचार करावा लागेल. जे असे एकत्रित विचार करणार नाहीत, त्या व्यवसायांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या