शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

औरंगाबादमध्ये ‘लॉकडाउन’मुळे ५,५०० कोटींची उलाढाल ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 05:18 IST

‘कोरोना’चा दणका : उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘लॉकडाउन’मुळे संपूर्ण देशभरातील उद्योग १४ एप्रिलपर्यंत ठप्प राहणार आहेत. या कालावधीत औरंगाबाद परिसरातील उद्योगांची सुमारे ५ हजार ५०० कोटींची उलाढाल ठप्प होणार असून, पुढील किमान सहा महिने तरी या परिस्थितीतून सावरण्यासाठी उद्योगांना संघर्ष करावा लागणार आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २२ मार्चपासून ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आला आहे. एकट्या औरंगाबाद परिसरातील प्रमुख चारही उद्योगनगरींतील जवळपास ३ हजार ५०० उद्योग बंद आहेत. या उद्योगांवर आधारित लघुउद्योग, वाहतूक, कामगार, कर्मचारी आदी सर्वांचेच कंबरडे मोडले आहे.यासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, १४ एप्रिलपर्यंत तीन आठवडे उद्योग बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे उद्योगांना वर्षभराच्या नफ्याला मुकावे लागणार आहे. याचे परिणाम पुढील किमान सहा महिने तरी तीव्रपणे जाणवतील. उद्योगाच्या सर्व साखळीवर हा परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्योग, कामगार, सरकार, बँका, ग्राहक यांनी एकत्रितपणे नियोजन करून पुढे जावे लागणार आहे.सध्याच्या परिस्थितीमुळे उद्योगांचे आर्थिक चक्र कोलमडले आहे. उद्योगात नोकरकपातही अटळ आहे. पुढे काही दिवसांनंतर उद्योग सुरू होतील; परंतु तेव्हा उत्पादनाला मार्केटमध्ये उठाव येईल का, ग्राहकांकडून आॅर्डर्स येतील का, ग्राहकांकडून जुने येणे मिळेलका, ट्रान्सपोर्ट सुरू होईल का आदी चिंता उद्योजकांना भेडसावणार आहेत.सध्या कामगार, कर्मचाऱ्यांचे वेतन बँकेत जमा करण्यासाठी उद्योजकांची लगबग सुरू आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून कारखान्यात जाण्यासाठी परवानगी घेतली जात आहे. उद्योगांमध्ये दरमहा ५ ते १० तारखेला वेतन अदा केले जाते. बहुतांशी उद्योगांत ‘आरटीजीएस’ प्रणालीद्वारेच थेट बँकेत वेतन जमा केले जाते, असे ‘सीएमआयए’चे सचिव शिवप्रसाद जाजू यांनी सांगितले.‘वेट अ‍ॅण्ड वॉच’अशी परिस्थिती-‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, पुढे काय गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, हे आता तरी कोणीच सांगू शकत नाही. सध्या तरी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशीच परिस्थिती आहे. संपूर्ण जग आणि व्यवसायावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी खचून न जाता पुढे काय करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार, उद्योजक, कर्मचारी, ग्राहक आणि बँका या सर्वांनी एकत्र विचार करून या आर्थिक आपत्तीतून बाहेर पडण्याचा विचार करावा लागेल. जे असे एकत्रित विचार करणार नाहीत, त्या व्यवसायांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या