छत्रपती संभाजीनगर : सीएसएमआरडीएने (छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरण) पाच तालुक्यांतील २१०० चौ. कि.मी.तील बेस मॅपचे काम हाती घेतले असून, भविष्यात शहरातून लोकल रेल्वे आणि मेट्रो धावेल, असे नियोजन यात असेल. शहर व जिल्ह्याची लोकसंख्या जशी वाढेल, त्यातुलनेत वाहतुकीचे पर्यायदेखील उपलब्ध असावेत. त्यासाठी वाहतूक आराखड्याचा प्रकर्षाने यात विचार केला जाईल. लोकल, मेट्रोचे प्लानिंग प्राधिकरणाच्या मॅपमध्ये असेल. परंतु, त्यासाठी भविष्यातील लोकसंख्या, ट्रॅफिक यांचा विचार करून ते इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जाईल. मनपा हद्दीच्या तुलनेत दहापट जास्तीचा हा आराखडा असेल.
पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, मलनिस्सारण वाहिन्यांची गरज ३१३ गावांत असणार आहे. सध्या बहुतांश प्रमाणात भूजलावर त्या गावांची तहान भागते आहे. त्यामुळे ३१३ गावांसाठी भविष्यात काय नियोजन असावे, यासाठी एक्झिस्टिंग स्टेट्स (विद्यमान स्थिती) काय आहे, यासाठी बेस मॅप तयार करण्यात येत आहे. २१०० स्के.कि.मी.मध्ये ३१३ गावांचा परिसर आहे. या भागासाठी एमएआरडीए ही ॲपेक्स यंत्रणा असेल. बांधकाम परवानग्या देणे एवढे एकच काम प्राधिकरणाकडे नाही. वाहतुकीचे नियोजन, एकात्मिक विकास समोर ठेवून काम होईल, मात्र यासाठी अद्याप डेडलाईन ठरलेली नाही.
बीपीएमएसद्वारे बांधकाम परवानग्या सध्या दिल्या जात आहेत. प्राधिकरणाच्या बाहेर भागासाठी आरडीसी पातळीवर, मनपा, नगरपालिका, सिडको पातळीवरूनही बांधकाम परवानग्या मिळतात. त्यांच्या हद्दीबाहेरील परवानग्या प्राधिकरणातून देण्यात येत आहेत. प्राधिकरण पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यासाठी प्राधिकरण हद्दीमध्ये गुंठेवारी करण्यात येणार आहे. भविष्यात ३१३ पेक्षा जास्त गावे यात येतील. प्लॅनिंग करून स्थिर विकासासाठी प्राधिकरण मॉनिटरिंग करेल. मनपा, जि. प., नगरपालिकांवर नियंत्रण असेल. पर्यटन व औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. पर्यटन आणि उद्योग यांचे क्षेत्र पाहून स्थिर नियाेजन आराखड्यात असेल.
नियोजनात एफएसआयचे नियम वेगळेझालर क्षेत्रातील २६ गावांसाठी सिडको आहे. मनपा हद्दीत महापालिका असेल. नऊ नगरसह प्राधिकरणात ३१३ गावे असतील. मनपा व सिडकोतील एफएसआयचे नियम वेगळे आहेत. प्राधिकरणातील एफएसआयचे नियम वेगळे आहेत.टोलेजंग इमारती बांधणे प्राधिकरणाच्या हद्दीत सध्या शक्य नाही. महापालिकेत बहुमजली इमारती बांधण्यास सुरुवात झाली आहे.
बेस मॅपचे काम सुरूप्राधिकरणाने पाच तालुक्यांतील ३१३ गावांतील बेस मॅपचे काही हाती घेतले आहे. ते झाल्यानंतर विकास आराखड्याचे काम सुरू होईल. त्यात मेट्रो, लोकलसह रस्त्यांचे जाळे, पाणीपुरवठा, मलनिस्सारण वाहिन्या, घनकचरा व्यवस्थापनाचा विचार होईल.- हर्षल बाविस्कर, सहसंचालक, सीएसएमआरडीए
कोणत्या तालुक्यातील किती गावे?गंगापूर : ६७फुलंब्री : १९खुलताबाद : ४१पैठण : ४३छत्रपती संभाजीनगर : १४३एकूण....३१३