शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भारनियमन 2 तासांनी घटले; गंगापूर आणि पैठणच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 17:33 IST

भारनियमन विरुद्ध सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश आले आहे.

कायगाव (औरंगाबाद ) : गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू असलेल्या भारनियमन विरुद्ध सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश आले आहे. आता १५ मार्च पर्यंत या भागातील वीजपुरवठा दररोज ६ तास सुरू राहणार आहे. याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता एस.डी. वैद्य यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन स्पष्ट केले आहे. 

मागील आठ दिवसांपासून गोदावरी नदीच्या काठावरील गंगापूर आणि पैठण तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना दिवसातून फक्त चार तास वीजपुरवठा सूरु होता. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन सुरू केले होते. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यानाही याबाबत निवेदन देऊन त्वरित वीस तासांचे भारनियमन बंद करून वीजपुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली होती. नसता उद्योगांना होणारा जायकवाडीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर विभागीय आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी आणि लाभक्षेत्र प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांत याबाबत चर्चा झाली. त्यानुसार १५ मार्चपर्यंत या भागात वीजपुरवठा ६ तास सुरू ठेवण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आदेशीत करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान प्रशासनाने सहा तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी स्वागत केले आहे. मात्र सहा तास वीजपुरवठा होऊनही शेतकऱ्यांना सिंचनाची समस्या कायम राहील त्यामुळे वीजपुरवठा किमान आठ तास सुरू रहावा यासाठी आंदोलन सुरूच राहील असे सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीजgodavariगोदावरी