शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन 2 तासांनी घटले; गंगापूर आणि पैठणच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 17:33 IST

भारनियमन विरुद्ध सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश आले आहे.

कायगाव (औरंगाबाद ) : गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू असलेल्या भारनियमन विरुद्ध सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अंशतः यश आले आहे. आता १५ मार्च पर्यंत या भागातील वीजपुरवठा दररोज ६ तास सुरू राहणार आहे. याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता एस.डी. वैद्य यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन स्पष्ट केले आहे. 

मागील आठ दिवसांपासून गोदावरी नदीच्या काठावरील गंगापूर आणि पैठण तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना दिवसातून फक्त चार तास वीजपुरवठा सूरु होता. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन सुरू केले होते. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यानाही याबाबत निवेदन देऊन त्वरित वीस तासांचे भारनियमन बंद करून वीजपुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली होती. नसता उद्योगांना होणारा जायकवाडीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर विभागीय आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी आणि लाभक्षेत्र प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांत याबाबत चर्चा झाली. त्यानुसार १५ मार्चपर्यंत या भागात वीजपुरवठा ६ तास सुरू ठेवण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आदेशीत करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान प्रशासनाने सहा तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी स्वागत केले आहे. मात्र सहा तास वीजपुरवठा होऊनही शेतकऱ्यांना सिंचनाची समस्या कायम राहील त्यामुळे वीजपुरवठा किमान आठ तास सुरू रहावा यासाठी आंदोलन सुरूच राहील असे सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीजgodavariगोदावरी